शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

जिल्हा परिषदेतील बदल्यांविषयी कर्मचाऱ्यांची परस्परविरोधी भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 01:35 IST

जिल्हा परिषदेच्या नियमित बदल्या करण्याची तयारी प्रशासनाने सुरू केलेली असताना, या बदल्यांचे वेळापत्रक आचारसंहिता संपल्यानंतरही पुन्हा रखडल्याचे समोर आले आहे. तर, दुसरीकडे कर्मचारी बदल्यांबाबत कर्मचारी संघटनांनी विरोध दर्शविला असला तरी, या बदल्या झाल्याच पाहिजे, अशी भूमिका कर्मचारी वर्गाने घेतली आहे.

नाशिक : जिल्हा परिषदेच्या नियमित बदल्या करण्याची तयारी प्रशासनाने सुरू केलेली असताना, या बदल्यांचे वेळापत्रक आचारसंहिता संपल्यानंतरही पुन्हा रखडल्याचे समोर आले आहे. तर, दुसरीकडे कर्मचारी बदल्यांबाबत कर्मचारी संघटनांनी विरोध दर्शविला असला तरी, या बदल्या झाल्याच पाहिजे, अशी भूमिका कर्मचारी वर्गाने घेतली आहे. त्यामुळे संघटनांचे पदाधिकारी आणि कर्मचारी यांच्यातील परस्परविरोधी भूमिका समोर आल्या आहेत.जिल्हा परिषदेतील बदल्यांची कार्यवाही दरवर्षी मे अखेरपर्यंतच पूर्ण करण्याचे शासन आदेश आहेत. मात्र यंदा विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहितेमुळे नियमित बदली प्रक्रि या झालेली नाही. निवडणुकीच्या निकालानंतर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. दरम्यान, प्रशासनाने शासनाकडे धाव घेत बदल्यांबाबत मार्गदर्शन मागविले होते. शासनाने आचारसंहिता संपुष्टात आल्यावर बदल्या करण्याचे सुचविल्याने आचारसंहिता संपल्यानंतर प्रशासनाने बदल्यांची कार्यवाही सुरू करत, बदल्यांचे वेळापत्रक तयार करून अध्यक्षांच्या मान्यतेसाठी पाठविले. मात्र या वेळापत्रकास मान्यता मिळालेली नसल्याने ते रखडले असताना या बदल्यांना आता विविध संवर्गातील कर्मचारी संघटनांनी विरोध केला आहे. परंतु, कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी ही मागणी करत असताना प्रत्यक्षात काही कर्मचाºयांनी या बदल्या झाल्या पाहिजे, अशी ठाम भूमिका घेतली आहे.त्यामुळे सामान्य कर्मचारी व संघटनांमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद