शहरं
Join us  
Trending Stories
1
गौतम गंभीरने पिचशी छेडछाड थांबवावी अन् मी सांगतोय ते ऐकावं...; सौरव गांगुलीचा थेट सल्ला
2
ओला ईलेक्ट्रीक गटांगळ्या खाऊ लागली? पुण्यातील सर्व्हिस सेंटर तोडले, अख्ख्या मुंबईत तेही ठाण्यात एकच सर्व्हिस सेंटर...
3
Sheikh Hasina Net Worth: शेख हसीना यांच्या नोकराकडेच होते २८४ कोटी; 'मॅडम'कडील प्रॉपर्टीचा आकडा वाचून तर बघा...
4
'या' एका चुकीमुळे लीक होऊ शकते तुमचे व्हॉट्सअ‍ॅपचे प्रायव्हेट चॅट; तुम्हाला माहीत आहे का?
5
'ऑपरेशन सिंदूर' हा फक्त ट्रेलर होता', लष्करप्रमुखांचा पाकिस्तानला उघड इशारा, दिल्ली स्फोटानंतर लष्कर सज्ज
6
मोबाईलवर मिनिटांत तपासा तुमचा NPS बॅलन्स; पाहा NSDL, उमंग ॲप आणि मिस्ड कॉलची सोपी पद्धत
7
फलटणमध्ये महायुतीतच 'खेळ'! शिंदेंच्या शिवसेनेकडून रामराजेंचा मुलगा, भाजपाकडून माजी खासदारांचा भाऊ मैदानात
8
कमाल! नोकरीसोबतच घरची जबाबदारी, ६ वेळा नापास; २ मुलींची आई ४० व्या वर्षी झाली IAS
9
बांगलादेश कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर शेख हसीना यांची पहिली प्रतिक्रिया; काय म्हणाल्या? 
10
Delhi Blast: दिल्लीत स्फोट घडवण्यासाठी किती पैसे दिले गेले होते, डॉ. शाहीनची काय होती भूमिका?
11
बँकिंग शेअर्समध्ये ऐतिहासिक तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये जोरदार वाढ; 'ही' आहेत प्रमुख ४ कारणं
12
किरकोळ गुंतवणूकदारांनी 'या' १० शेअर्समध्ये टाकले ₹१८,००० कोटी! सुजलॉन त्यापैकी एक, आणखी नावं कोणती?
13
DIY Tips: ड्राय क्लीनिंगचा खर्च वाचवा! कपड्यांवरील चिवट डाग काढण्यासाठी 'हा' घरगुती फॉर्म्युला वापरा 
14
"राहुल गांधी पंतप्रधान होवोत अथवा न होवोत, आमचा हेतू...!" बिहार निवडणुकीसंदर्भात बोलताना काय म्हणाले रॉबर्ट वाड्रा? 
15
क्रिप्टो मार्केटमध्ये हाहाकार! बिटकॉइन १५ लाख तर इथर १.३५ लाखानं कोसळला; ही आहेत कारणं
16
दिल्लीतील स्फोटात बुटाचा वापर, उमरने TATP स्फोटकांचा केला वापर; NIA च्या तपासात खळबळजनक माहिती
17
MLA Disqualification Case: 'आमदारांचं प्रकरण दोन आठवड्यात निकाली काढा, नाहीतर...'; सर्वोच्च न्यायालय विधानसभा अध्यक्षांवर संतापले
18
Gold & Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल; Gold २ हजारांपेक्षा अधिकनं झालं स्वस्त, Silver मध्ये ६५०० ची घसरण
19
दिल्ली स्फोट तपास: कोडवर्ड, 'वुल्फ आवर' आणि महिला दहशतवाद्यांचे 'ऑरोरा-लूना' पथक!
Daily Top 2Weekly Top 5

निवृत्तीच्या निर्णयाबाबत कर्मचारी संघटना समाधानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 00:45 IST

केंद्र शासनाप्रमाणेच राज्यातील कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय ६० वर्ष करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी सूतोवाच केले आहे. त्याबाबतच्या निर्णयाची मागणी बहुतांश शासकीय संघटना प्रदीर्घ काळापासून करीत होत्या.

माझे मतनाशिक : केंद्र शासनाप्रमाणेच राज्यातील कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय ६० वर्ष करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी सूतोवाच केले आहे. त्याबाबतच्या निर्णयाची मागणी बहुतांश शासकीय संघटना प्रदीर्घ काळापासून करीत होत्या. त्यामुळे राज्य शासनाच्या या निर्णयाबाबत शासकीय कर्मचारी संघटनांच्या बहुतांश पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. तर काहींनी या निर्णयाची अंमलबजावणी होईल, तेव्हाच खरे असा सूर व्यक्त केला. सरकारी कर्मचाºयांची ५८ वर्षांनंतरदेखील काम करण्याची कार्यक्षमता असेल, अशा कर्मचाºयांच्या दृष्टीने हा अत्यंत चांगला निर्णय आहे. असे मतही काहींनी व्यक्त केले़ज्या सरकारी कर्मचाºयांची ५८ वर्षांनंतरदेखील काम करण्याची कार्यक्षमता असेल, अशा कर्मचाºयांच्या दृष्टीने हा अत्यंत चांगला निर्णय आहे. त्यांचा अनेक प्रक्रियेत आणि कामकाजात सखोल अनुभव असतो. त्यामुळे या निर्णयामुळे अशा ज्येष्ठ कर्मचाºयांच्या अनुभवाचा फायदा कार्यालयातील अन्य कर्मचाºयांसह एकूणच प्रशासनाला होत असतो.- दिनेश वाघ, जिल्हाध्यक्ष, महसूल कर्मचारी संघटनाया निर्णयाबाबत कर्मचाºयांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया आहेत. शासनाकडून या निर्णयाबाबतची सखोल माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. परंतु, त्यात ३३ वर्ष सेवा किंवा ६० वर्ष असा निकष राहण्याची चिन्हे आहेत. मात्र, उशिराने शासकीय सेवेत लागलेल्या कर्मचाºयांच्या दृष्टीने हा निर्णय नक्कीच चांगला असून त्याचे आम्ही स्वागत करतो.- नरेंद्र जगताप, राज्य सरचिटणीस,राज्य महसूल कर्मचारी संघटनाआमच्या संघटनेच्या वतीने आम्ही प्रदीर्घ काळापासून काही मागण्या लावून धरल्या होत्या. केंद्र सरकारच्या नियमाप्रमाणे राज्य शासन कर्मचाºयांनाही तोच निर्णय लागू व्हावा, अशीच आमची मागणी होती. त्यामुळेच निवृत्तीचे वय ६० करण्याचीही आमची मागणी होती. प्रदीर्घ काळाच्या संघर्षानंतर ही मागणी मान्य झाल्याचे समाधान आहे.- दिलीप थेटे, जिल्हाध्यक्ष, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनाया निर्णयाबाबत आम्हाला वेळोवेळी होकार देत केवळ झुलवण्यात आले आहे. त्यामुळे या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत मला खात्री वाटणार नाही. अनुभवी कर्मचारी निवृत्त झाल्यास राज्य शासनाचे आणि प्रशासनाचे नुकसानच होत असते. त्यामुळे या निर्णयाबरोबरच कर्मचाºयांच्या अन्य निर्णयांवरही त्वरित अंमलबजावणी व्हावी, हीच अपेक्षा आहे.- उत्तम गांगुर्डे, जिल्हा निमंत्रक, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना

टॅग्स :GovernmentसरकारNashikनाशिक