शहरं
Join us  
Trending Stories
1
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
2
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
3
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
4
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
5
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
6
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...
7
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
8
धक्कादायक! राजस्थानमधील झालावाड शाळेतील दुर्घटनेनंतर आणखी एक निष्काळजीपणा, विद्यार्थ्याचे टायर पेटवून अंत्यसंस्कार
9
टेलिव्हिजनवरील या अभिनेत्रीला लागला मोठा जॅकपॉट, रणबीरच्या 'रामायण'मध्ये झाली एन्ट्री
10
हृदयद्रावक! "माझी दोन्ही मुलं गेली, देवाने मला...", आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
11
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
12
Shravan Somvar 2025: श्रावण सोमवारनिमित्त मित्रांना, नातेवाईकांना पाठवा श्लोकरूपी शुभेच्छा संदेश!
13
गृहकर्जावरील व्याज अनुदान; सविस्तर जाणून घ्या, मोदी सरकारची ही खास योजना; पूर्ण होईल घर घेण्याचं स्वप्न!
14
पहिला श्रावणी रविवार: वैभवप्राप्तीसाठी आदित्य राणूबाई व्रत; वाचा व्रतविधी आणि द्या खिरीचा नैवेद्य!
15
NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न  
16
Shravan Somvar 2025: महादेवाला वाहिलेले बेलाचे पान टाकू नका, तेच करेल धनवृद्धी!
17
वर्षभर मसल पॉवर रसेलची बॅट सोबत बाळगली; तो निवृत्त झाल्यावर ती टीम डेविडच्या हाती तळपली
18
ओठ फुटलेत, कोरडे झालेत... ओठांना मॉइश्चरायझ करण्यासाठी लिप बाम की ऑइल काय आहे बेस्ट?
19
"मला दु:ख आहे की मी अशा सरकारला पाठिंबा देतोय जे..."; चिराग पासवान यांची संतप्त प्रतिक्रिया
20
१७ वर्ष जुनी कंपनी आणतेय IPO, SEBI कडे केला अर्ज; BSE आणि NSE मध्ये लिस्टिंगची शक्यता

समाजाशी भावनिक नात्याची गरज : गोगटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 00:04 IST

नवीन समाजरचना घडविण्यासाठी समाजात कार्यरत असताना भावनिकता आणि वैचारिकता यांचा योग्य मिलाफ साधण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन भारतीय शिक्षण मंडळाचे महामंत्री डॉ. वामन गोगटे यांनी केले आहे.

नाशिक : नवीन समाजरचना घडविण्यासाठी समाजात कार्यरत असताना भावनिकता आणि वैचारिकता यांचा योग्य मिलाफ साधण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन भारतीय शिक्षण मंडळाचे महामंत्री डॉ. वामन गोगटे यांनी केले आहे.  यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातील भारतीय शिक्षण मंडळाच्या दोनदिवसीय अधिवेशनाचा रविवारी (दि.१७) सर्वसाधारण सभेने समारोप झाला. तत्पूर्वी संघटनेच्या विस्तारक आणि प्रांत प्रतिनिधींसाठी आयोजित बौद्धिक सत्रात ते बोलत होते. डॉ. वामन गोगटे म्हणाले, भारतीय शिक्षण मंडळाच्या माध्यमातून संघटनेमध्ये कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांनी समाजाशी भावनिक नाते निर्माण केले पाहिजे तसेच सातत्याने अभ्यास आणि चिंतनाच्या माध्यमातून वैचारिकता निर्माण करण्याचे आवाहनही महामंत्री डॉ. वामन गोगटे यांनी कार्यकर्त्यांना केले. तर दुपारच्या सत्रात नाशिकमधील शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांशी भारतीय शिक्षण मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सच्चिदानंद जोशी यांनी संवाद साधला. त्यांनी संघटनेच्या विविध उपक्र मांची माहिती करून देताना शिक्षणात आवश्यक असलेल्या बदलांविषयी तज्ज्ञांचे विचारही जाणून घेतले. समाजाच्या अभिरु ची सध्या वेगाने बदलत आहेत, त्यामुळे संस्काराची जोपासना करणे हे आव्हानात्मक कार्य ठरले आहे. शिक्षणातून संस्काराची समाजात पाखरण करण्याचे काम भारतीय शिक्षण मंडळ सातत्याने पार पाडत असून, त्यासाठी समर्थ मनुष्यबळ तयार करण्याची गरज असल्याचे यावेळी जोशी म्हणाले. डॉ. अश्विनीकुमार भारद्वाज यांनीही उपस्थिताना मार्गदर्शन केले. यावेळी महेश दाबक, डॉ. अस्मिता वैद्य यांच्यासह अधिवेशनास राज्यातून पदाधिकारी व संस्थाचालक उपस्थित होते. पंकज निफाडे यांनी सूत्रसंचालन केले. तर डॉ. विजय अवस्थी यांनी उपस्थितांचे आभार मानले.  मंडळाच्या वार्षिक सभेअंतर्गत रविवारी (दि.१७) सकाळी ९.३० वाजता आगामी नियोजनाबद्दलचे मार्गदर्शन सत्र संपन्न झाले. त्यात दुपारी १२ ते १ या कालावधीत शिक्षण तज्ज्ञ, विद्यापीठाचे कुलगुरू व मान्यवरांशी संवादाचे आयोजन करण्यात आले होते. समारोप समारंभ दुपारी ४ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत विविध विषयावर वक्त्यांनी मार्गदर्शन केले.संघटना बांधणीविषयक मार्गदर्शनअधिवेशनाच्या समारोप सत्रात मुकूल कानिटकर यांनी संघटना बांधणीविषयी उपस्थिताना मार्गदर्शन केले. कानिटकर म्हणाले की, संघटनेची बांधणी करताना कार्यकर्त्यांनी समाजाच्या गरजांचा विचार करणे आवश्यक आहे, तर दुपारच्या सत्रात नाशिकमधील शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांशी भारतीय शिक्षण मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सच्चिदानंद जोशी यांनी संवाद साधला. डॉ. अश्विनीकुमार भारद्वाज यांनीही उपस्थिताना मार्गदर्शन केले.

टॅग्स :Nashikनाशिक