शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
3
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
4
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
5
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
6
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
7
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
8
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
9
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
10
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
11
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
12
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
13
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
14
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
15
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
16
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
17
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
18
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
19
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
20
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...

समाजाशी भावनिक नात्याची गरज : गोगटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 00:04 IST

नवीन समाजरचना घडविण्यासाठी समाजात कार्यरत असताना भावनिकता आणि वैचारिकता यांचा योग्य मिलाफ साधण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन भारतीय शिक्षण मंडळाचे महामंत्री डॉ. वामन गोगटे यांनी केले आहे.

नाशिक : नवीन समाजरचना घडविण्यासाठी समाजात कार्यरत असताना भावनिकता आणि वैचारिकता यांचा योग्य मिलाफ साधण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन भारतीय शिक्षण मंडळाचे महामंत्री डॉ. वामन गोगटे यांनी केले आहे.  यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातील भारतीय शिक्षण मंडळाच्या दोनदिवसीय अधिवेशनाचा रविवारी (दि.१७) सर्वसाधारण सभेने समारोप झाला. तत्पूर्वी संघटनेच्या विस्तारक आणि प्रांत प्रतिनिधींसाठी आयोजित बौद्धिक सत्रात ते बोलत होते. डॉ. वामन गोगटे म्हणाले, भारतीय शिक्षण मंडळाच्या माध्यमातून संघटनेमध्ये कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांनी समाजाशी भावनिक नाते निर्माण केले पाहिजे तसेच सातत्याने अभ्यास आणि चिंतनाच्या माध्यमातून वैचारिकता निर्माण करण्याचे आवाहनही महामंत्री डॉ. वामन गोगटे यांनी कार्यकर्त्यांना केले. तर दुपारच्या सत्रात नाशिकमधील शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांशी भारतीय शिक्षण मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सच्चिदानंद जोशी यांनी संवाद साधला. त्यांनी संघटनेच्या विविध उपक्र मांची माहिती करून देताना शिक्षणात आवश्यक असलेल्या बदलांविषयी तज्ज्ञांचे विचारही जाणून घेतले. समाजाच्या अभिरु ची सध्या वेगाने बदलत आहेत, त्यामुळे संस्काराची जोपासना करणे हे आव्हानात्मक कार्य ठरले आहे. शिक्षणातून संस्काराची समाजात पाखरण करण्याचे काम भारतीय शिक्षण मंडळ सातत्याने पार पाडत असून, त्यासाठी समर्थ मनुष्यबळ तयार करण्याची गरज असल्याचे यावेळी जोशी म्हणाले. डॉ. अश्विनीकुमार भारद्वाज यांनीही उपस्थिताना मार्गदर्शन केले. यावेळी महेश दाबक, डॉ. अस्मिता वैद्य यांच्यासह अधिवेशनास राज्यातून पदाधिकारी व संस्थाचालक उपस्थित होते. पंकज निफाडे यांनी सूत्रसंचालन केले. तर डॉ. विजय अवस्थी यांनी उपस्थितांचे आभार मानले.  मंडळाच्या वार्षिक सभेअंतर्गत रविवारी (दि.१७) सकाळी ९.३० वाजता आगामी नियोजनाबद्दलचे मार्गदर्शन सत्र संपन्न झाले. त्यात दुपारी १२ ते १ या कालावधीत शिक्षण तज्ज्ञ, विद्यापीठाचे कुलगुरू व मान्यवरांशी संवादाचे आयोजन करण्यात आले होते. समारोप समारंभ दुपारी ४ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत विविध विषयावर वक्त्यांनी मार्गदर्शन केले.संघटना बांधणीविषयक मार्गदर्शनअधिवेशनाच्या समारोप सत्रात मुकूल कानिटकर यांनी संघटना बांधणीविषयी उपस्थिताना मार्गदर्शन केले. कानिटकर म्हणाले की, संघटनेची बांधणी करताना कार्यकर्त्यांनी समाजाच्या गरजांचा विचार करणे आवश्यक आहे, तर दुपारच्या सत्रात नाशिकमधील शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांशी भारतीय शिक्षण मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सच्चिदानंद जोशी यांनी संवाद साधला. डॉ. अश्विनीकुमार भारद्वाज यांनीही उपस्थिताना मार्गदर्शन केले.

टॅग्स :Nashikनाशिक