शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

आयटीआय निदेशकांचा सरकारविरोधात एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 00:34 IST

आयटीआयमध्ये रिक्त पदे भरण्यात यावीत यासह गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य आयटीआय निदेशक संघटनेने शासनाविरुद्ध मंगळवारी (दि.२७) एल्गार पुकारला आहे.

सातपूर : आयटीआयमध्ये रिक्त पदे भरण्यात यावीत यासह गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य आयटीआय निदेशक संघटनेने शासनाविरुद्ध मंगळवारी (दि.२७) एल्गार पुकारला आहे. मुंबईच्या आझाद मैदानावर निदर्शने आणि धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे सचिव संतोष बोराडे यांनी दिली आहे. शासनाबरोबर अनेक प्रलंबित प्रश्नांवर वारंवार चर्चा करून फक्त आश्वासने मिळाली आहेत. शासन व प्रशासन प्रभावी प्रशिक्षणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याची भावना निर्माण झाली आहे. गेल्या १२ वर्षांपासून पदभरती नाही. सद्यस्थितीत ५० टक्के पदे रिक्त आहेत. त्याचा अतिरिक्त पदभार अन्य सहकाऱ्यांना उचलावा लागत आहे. अपुरा कच्चा माल, कालबाह्य हत्यारे, जुनाट यंत्रसामग्री, अपुºया सुविधा अशा परिस्थितीत जागतिक पातळीवरचे प्रशिक्षण देण्याचे शासनाच्या अपेक्षांचे ओझे निदेशकांच्या माथी मारत प्रशासन केवळ प्रवेश, निकाल यांच्या आधारे कागदोपत्री ही योजना सुरळीत सुरू असल्याचे भासवित आहे. शासनाने यात लक्ष घालण्याची गरज आहे. प्रशिक्षणाबरोबरच निदेशकांच्या प्रश्नांवरही शासन व प्रशासन गंभीर नसल्याने अखेर राज्य सरकारच्या विरोधात राज्य निदेशक संघटनेच्या वतीने आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.दोन बोगी आरक्षितमंगळवारी (दि.२७) सकाळी दहा वाजता महाराष्ट्र राज्य आयटीआय निदेशक संघटनेने शासनाविरु द्ध मुंबईत एल्गार आंदोलन पुकारले आहे. यादिवशी राज्यातील सर्व आयटीआय बंद ठेवण्यात येणार आहे. आंदोलनात सहभागी होणाºया नाशिक जिल्ह्यातील निदेशकांसाठी पंचवटी एक्स्प्रेसच्या दोन बोगी आरक्षित करण्यात आल्याची माहिती श्रीरत्न बरडे यांनी दिली.

टॅग्स :iti collegeआयटीआय कॉलेजGovernmentसरकार