शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विधेयकाच्या विरोधात नाशकातही एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:40 IST

नाशिक : केंद्र सरकारने आणलेले नवीन कायदे शेतकरीविरोधी असल्याचा आरोप करीत या कायद्यांच्या विरोधात दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला ...

नाशिक : केंद्र सरकारने आणलेले नवीन कायदे शेतकरीविरोधी असल्याचा आरोप करीत या कायद्यांच्या विरोधात दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला नाशिकमधील विविध सामाजिक, राजकीय व सेवाभावी संस्थांनी गुरुवारी (दि.३) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करीत समर्थन देत केंद्र सरकरच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली.

केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी कायद्यांच्या निषेधार्थ दिल्लीत सुरू असलेले शेतकरी आंदोलन पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वातील भाजपा सरकार बळाचा वापर करून दडपून टाकण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करीत अखिल भारतीय किसानसभा, छावा क्रांतिवीर सेना, जनआंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय गट, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी संघर्ष संघटना, राष्ट्र सेवा दल, प्रहार शेतकरी संघटना, आम आदमी शेतकरी संघटना, छत्रपती युवा सेना आदी विविध संघटनांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयसमोर आंदोलन करीत आंदोलन केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी केली. पंजाब, हरियाणासह विविध राज्यांतील शेतकऱ्यांनी आठवडाभरापासून दिल्लीत आंदोलन सुरू केले असून, केंद्र सरकारने आंदोलक शेतकऱ्यांवर केलेला पाण्याचा मारा व अश्रूधुराचा वापरामुळे शंतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे. नाशिकमधूनही या आंदोलनाला समर्थन मिळत असून, गुरुवारी विविध संघनांनी एकत्र येऊन केलेल्या आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे पडसाद नाशकातही पाहालयाल मिळाले. केंद्र सरकारने लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यावरील दडपशाही बंद करावी. शेतकऱ्यांच्या नेतृत्वासोबत बिनशर्त चर्चा करावी. शेतकरीविरोधी कायदे रद्द करावेत, अन्नथा आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही अखिल भारतीय किसान सभेचे सुनील मालुसरे, राजू देसले, छावा क्रांतिवीर सेनेचे करण गायकर, जनआंदोलन राष्ट्रीय समन्वय गटाच्या अनिता पगारे, विजय पाटील, नाना बच्छाव, नितीन मते, अनिल भडांगे, अ‍ॅड. प्रभाकर वायचळे, विजय दराडे, नामदेव बोराडे, गणेश कदम, जगन काकडे, समाधान बागुल, देवीदास हजारे, विराज देवांग, तल्हा शेख आदींनी जिल्हाधिकाऱ्याना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.