शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

अकरा गाव पाणीपुरवठा योजना ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 00:22 IST

वावीसह अकरा गाव पाणीपुरवठा योजनेचा विद्युत जलपंप जळाल्याने व तो दुरुस्तीसाठी निधी नसल्याने गेल्या आठ दिवसांपासून योजना ठप्प आहे. योजनेत समाविष्ट गावांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

ठळक मुद्देनागरिक वेठीला : जिल्हा परिषदेकडून निधी वर्ग होत नसल्याने विद्युत जलपंप दुरुस्ती रखडल्याचे कारण

सिन्नर : वावीसह अकरा गाव पाणीपुरवठा योजनेचा विद्युत जलपंप जळाल्याने व तो दुरुस्तीसाठी निधी नसल्याने गेल्या आठ दिवसांपासून योजना ठप्प आहे. योजनेत समाविष्ट गावांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.पाणीपुरवठा समिती, पंचायत समिती प्रशासन व योजनेत समाविष्ट ग्रामपंचायती हे सर्व एकमेकांवर जबाबदारी ढकलून देण्यात धन्यता मानत असून, नागरिकांना हाल सहन करावे लागत आहे. नादुरुस्त विद्युत जलपंप दुरुस्तीची जबाबदारी नेमकी कोणाची? असा सवाल उपस्थित झाला आहे. योजनेत वावी, पाथरे बुद्रुक, पाथरे खुर्द, वारेगाव, सायाळे, मीरगाव, कहांडळवाडी, दुशिंगपूर, शहा, मिठसागरे व मलढोण या गावांचा समावेश आहे. विद्युत जलपंप दुरुस्तीसाठी सुमारे ४० ते ४५ हजार रुपये खर्च अपेक्षित असून एवढा निधी उपलब्ध होत नसल्याने योजना बंद आहे.वावीसह अकरा गावांसाठी गोदावरी उजव्या कालव्यावर कोळगावमाळ शिवारात तलाव करून मजिप्राने पाणीयोजना राबविली आहे. सदर पाणीयोजना या दुष्काळी गावांसाठी वरदान ठरली आहे, मात्र थकीत वीजबिल, पाणीपट्टी वसुली, जलशुद्धीकरण केंद्राचा मेंटेनन्स व साहित्य खरेदी, वारंवार होणारा तांत्रिक बिघाड, गळती अशा अनेक कारणांमुळे योजनेला नेहमी ग्रहण लागलेले असते. गेल्या आठ दिवसांपूर्वी कोळगावमाळ येथील जलशुद्धीकरण केंद्रात असलेला ४० हॉर्सपॉवरचा विद्युत जलपंप जळाला आहे.तलावात भरपूर पाणी असूनही वावीच्या संतुलित जलकुंभापर्यंत पाणी पोहोचू शकत नसल्याने योजनेतील समाविष्ट गावांना कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तलावात पाणी असूनही नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आल्याने संताप व्यक्त केला जात आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीकडून आपला हिश्श्याचा निधी ग्रामपंचायतीला मिळणाऱ्या मुद्रांक शुल्काचा निधीतून वर्ग केल्याचे सांगितले जात आहे, मात्र जिल्हा परिषदेकडून सदर निधी पाणीपुरवठा समितीच्या खात्यावर वर्ग न झाल्याने समितीच्या खात्यावर निधीचा खडखडाट आहे. विद्युत जलपंप दुरुस्तीला पैसे नसल्याने योजना बंद आहे. पाणी असूनही नळांना पाणी येत नसल्याने योजनेत समाविष्ट गावांतील नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.ग्रामपंचायतींना मिळणारा मुद्रांक शुल्कचा निधी पाणीपुरवठा समितीच्या खात्यांवर वर्ग करण्यासाठी पत्र देण्यात आले होते. ग्रामपंचायतींच्या खात्यावरून सदर निधी कटिंग करण्यात आला आहे, मात्र जिल्हा परिषदेकडून सदर निधी पाणीपुरवठा समितीच्या खात्यावर वर्ग होण्यास उशीर झाला आहे. पुढच्या आठवड्यात पाणीपुरवठा समितीच्या खात्यावर सदर निधी वर्ग होण्याची अपेक्षा आहे. जानेवारी महिन्यात आपण सर्वच प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या समितींचा आढावा घेणार आहे.- डॉ. लता गायकवाड, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, सिन्नरपाणीयोजना चांगली आहे, पण पाणीपुरवठा योजना सुरळीत चालविण्यासाठी विद्यमान कार्यकारिणी सक्षम नाही. समितीची दोन वर्षांची मुदत संपली आहे. समिती बरखास्त करून नवीन समिती गठीत करण्याची गरज आहे. वसुलीचे कारण सांगून योजनेत समाविष्ट गावांना वेठीस धरण्यात येते. योजनेचा पाणीपुरवठा तत्काळ सुरू करावा. या आधी पदरमोड करून स्वत: खिशातून पैसे घालून योजना सुरळीत चालविली जात होती. आता कोणाकडून तरी अनामत घेऊन निधी येण्याची अधिक वाट न पाहता विद्युत जलपंप तातडीने दुरुस्त करुन नागरिकांना दिलासा द्यावा. जनतेला वेठीस धरू नये.- विजय काटे, उपसरपंच वावी व माजी अध्यक्ष, पाणीपुरवठा समिती.‘समितीकडे निधी शिल्लक नाही. गेल्या वर्षापासून वसुली होत नाही. उधारीत साहित्य खरेदी चालू आहे. मुद्रांक शुल्कचे पैसे पंचायत समितीकडून पाणीपुरवठा समितीच्या खात्यावर वर्ग होणार होते, मात्र अद्याप ते वर्ग झाले नाही. ग्रामपंचायतींकडे वसुलीला गेल्यानंतर मुद्रांक शुल्क निधीचे पैसे पंचायत समितीकडून कपात करून घेतले असल्याचे सांगून आपल्याकडे थकबाकी नसल्याचे कारण सांगितले जाते. वसुलीचा चकरा मारून उपयोग होत नाही. पंचायत समितीत चकरा मारण्यात आल्या, पण अधिकारी गांभीर्याने लक्ष देत नाही. निधी नसल्याने विद्युत जलपंप दुुरस्ती करता येत नाही.- किरण घेगडमल, अध्यक्ष, वावीसह अकरा गाव पाणीपुरवठा समिती.

टॅग्स :sinnar-acसिन्नरWaterपाणी