शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
"खोलीत बोलवायचे, घाणेरड्या नजरेने बघायचे, रात्री व्हिडीओ..."; IAS अधिकाऱ्याविरोधात महिलांचे गंभीर आरोप 
3
"आपली ही तक्रार मी..."; अभिनेते किशोर कदम यांच्या पोस्टला मुख्यमंत्री फडणवीसांचा 'रिप्लाय'
4
शेअर बाजारात आधी घसरण मग तेजी; 'या' स्टॉक्सनं घसरणीसह सुरू केला व्यवहार
5
भिवंडीत भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षासह दोन जणांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; परिसरात तणावाचे वातावरण 
6
आसिम मुनीरनंतर बिलावल भुट्टोंची फडफड; भारताला दिली युद्धाची धमकी! म्हणाले... 
7
“राहुल गांधी म्हणजे फेक नॅरेटीव्हची फॅक्टरीच, फेक न्यूजचे बादशाह”; भाजपाने पुरावेच दिले!
8
अंगारकी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळेत भाविकांचा महासागर
9
बँका आपल्या मनमर्जीनं मिनिमम अकाऊंट बॅलन्स ठरवू शकतात का? RBI गव्हर्नरांनी सांगितला नियम
10
'उत्पन्नावर आधारित' आरक्षण व्यवस्था असावी; जनहित याचिकेवर विचार करण्यास सुप्रीम कोर्टाने दर्शवली तयारी
11
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण: सरकारी वकील प्रदीप घरत यांना खटल्यातून हटवल्याने न्यायालय नाराज
12
Post Office च्या MIS स्कीममध्ये ₹१,००,००० जमा कराल तर महिन्याला किती मिळेल व्याज, पाहा कॅलक्युलेशन
13
दोन मुलांची आई, १३ वर्षांनंतर कमबॅक करणार अभिनेत्री; मराठी बिझनेसमॅनसोबत बांधलेली लग्नगाठ
14
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
15
आजचे राशीभविष्य : मंगळवार १२ ऑगस्ट २०२५; आज शक्यतो प्रवास टाळावा, अचानक खर्च उदभवण्याची शक्यता
16
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
17
दुचाकीला बांधून पत्नीचा मृतदेह नेताना चार पोलिस ठाणी झोपेत होती का? चार मोठी, १५ छोटी गावे ओलांडली, पण...
18
लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता २५ टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान १५ डब्यांची गाडी धावणार
19
हत्तीचं ॲक्युपंक्चर, बिबट्याचं रूट कॅनल अन् ICU मधील माकड
20
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी

अकरा गाव पाणीपुरवठा योजना ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 00:22 IST

वावीसह अकरा गाव पाणीपुरवठा योजनेचा विद्युत जलपंप जळाल्याने व तो दुरुस्तीसाठी निधी नसल्याने गेल्या आठ दिवसांपासून योजना ठप्प आहे. योजनेत समाविष्ट गावांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

ठळक मुद्देनागरिक वेठीला : जिल्हा परिषदेकडून निधी वर्ग होत नसल्याने विद्युत जलपंप दुरुस्ती रखडल्याचे कारण

सिन्नर : वावीसह अकरा गाव पाणीपुरवठा योजनेचा विद्युत जलपंप जळाल्याने व तो दुरुस्तीसाठी निधी नसल्याने गेल्या आठ दिवसांपासून योजना ठप्प आहे. योजनेत समाविष्ट गावांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.पाणीपुरवठा समिती, पंचायत समिती प्रशासन व योजनेत समाविष्ट ग्रामपंचायती हे सर्व एकमेकांवर जबाबदारी ढकलून देण्यात धन्यता मानत असून, नागरिकांना हाल सहन करावे लागत आहे. नादुरुस्त विद्युत जलपंप दुरुस्तीची जबाबदारी नेमकी कोणाची? असा सवाल उपस्थित झाला आहे. योजनेत वावी, पाथरे बुद्रुक, पाथरे खुर्द, वारेगाव, सायाळे, मीरगाव, कहांडळवाडी, दुशिंगपूर, शहा, मिठसागरे व मलढोण या गावांचा समावेश आहे. विद्युत जलपंप दुरुस्तीसाठी सुमारे ४० ते ४५ हजार रुपये खर्च अपेक्षित असून एवढा निधी उपलब्ध होत नसल्याने योजना बंद आहे.वावीसह अकरा गावांसाठी गोदावरी उजव्या कालव्यावर कोळगावमाळ शिवारात तलाव करून मजिप्राने पाणीयोजना राबविली आहे. सदर पाणीयोजना या दुष्काळी गावांसाठी वरदान ठरली आहे, मात्र थकीत वीजबिल, पाणीपट्टी वसुली, जलशुद्धीकरण केंद्राचा मेंटेनन्स व साहित्य खरेदी, वारंवार होणारा तांत्रिक बिघाड, गळती अशा अनेक कारणांमुळे योजनेला नेहमी ग्रहण लागलेले असते. गेल्या आठ दिवसांपूर्वी कोळगावमाळ येथील जलशुद्धीकरण केंद्रात असलेला ४० हॉर्सपॉवरचा विद्युत जलपंप जळाला आहे.तलावात भरपूर पाणी असूनही वावीच्या संतुलित जलकुंभापर्यंत पाणी पोहोचू शकत नसल्याने योजनेतील समाविष्ट गावांना कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तलावात पाणी असूनही नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आल्याने संताप व्यक्त केला जात आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीकडून आपला हिश्श्याचा निधी ग्रामपंचायतीला मिळणाऱ्या मुद्रांक शुल्काचा निधीतून वर्ग केल्याचे सांगितले जात आहे, मात्र जिल्हा परिषदेकडून सदर निधी पाणीपुरवठा समितीच्या खात्यावर वर्ग न झाल्याने समितीच्या खात्यावर निधीचा खडखडाट आहे. विद्युत जलपंप दुरुस्तीला पैसे नसल्याने योजना बंद आहे. पाणी असूनही नळांना पाणी येत नसल्याने योजनेत समाविष्ट गावांतील नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.ग्रामपंचायतींना मिळणारा मुद्रांक शुल्कचा निधी पाणीपुरवठा समितीच्या खात्यांवर वर्ग करण्यासाठी पत्र देण्यात आले होते. ग्रामपंचायतींच्या खात्यावरून सदर निधी कटिंग करण्यात आला आहे, मात्र जिल्हा परिषदेकडून सदर निधी पाणीपुरवठा समितीच्या खात्यावर वर्ग होण्यास उशीर झाला आहे. पुढच्या आठवड्यात पाणीपुरवठा समितीच्या खात्यावर सदर निधी वर्ग होण्याची अपेक्षा आहे. जानेवारी महिन्यात आपण सर्वच प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या समितींचा आढावा घेणार आहे.- डॉ. लता गायकवाड, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, सिन्नरपाणीयोजना चांगली आहे, पण पाणीपुरवठा योजना सुरळीत चालविण्यासाठी विद्यमान कार्यकारिणी सक्षम नाही. समितीची दोन वर्षांची मुदत संपली आहे. समिती बरखास्त करून नवीन समिती गठीत करण्याची गरज आहे. वसुलीचे कारण सांगून योजनेत समाविष्ट गावांना वेठीस धरण्यात येते. योजनेचा पाणीपुरवठा तत्काळ सुरू करावा. या आधी पदरमोड करून स्वत: खिशातून पैसे घालून योजना सुरळीत चालविली जात होती. आता कोणाकडून तरी अनामत घेऊन निधी येण्याची अधिक वाट न पाहता विद्युत जलपंप तातडीने दुरुस्त करुन नागरिकांना दिलासा द्यावा. जनतेला वेठीस धरू नये.- विजय काटे, उपसरपंच वावी व माजी अध्यक्ष, पाणीपुरवठा समिती.‘समितीकडे निधी शिल्लक नाही. गेल्या वर्षापासून वसुली होत नाही. उधारीत साहित्य खरेदी चालू आहे. मुद्रांक शुल्कचे पैसे पंचायत समितीकडून पाणीपुरवठा समितीच्या खात्यावर वर्ग होणार होते, मात्र अद्याप ते वर्ग झाले नाही. ग्रामपंचायतींकडे वसुलीला गेल्यानंतर मुद्रांक शुल्क निधीचे पैसे पंचायत समितीकडून कपात करून घेतले असल्याचे सांगून आपल्याकडे थकबाकी नसल्याचे कारण सांगितले जाते. वसुलीचा चकरा मारून उपयोग होत नाही. पंचायत समितीत चकरा मारण्यात आल्या, पण अधिकारी गांभीर्याने लक्ष देत नाही. निधी नसल्याने विद्युत जलपंप दुुरस्ती करता येत नाही.- किरण घेगडमल, अध्यक्ष, वावीसह अकरा गाव पाणीपुरवठा समिती.

टॅग्स :sinnar-acसिन्नरWaterपाणी