शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

शहरात उच्चांकी ११ जणांचे बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 01:58 IST

नाशिक शहरात कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे प्रमाण कमी होण्याऐवजी वाढतच असून, शनिवारी (दि.११) विक्रमी ११ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात प्रथमच चोवीस तासांत मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आल्याने शहरवासीयांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे

ठळक मुद्देधक्कादायक । मृत्युदर कमी होण्याऐवजी वाढच; नागरिकांत चिंता

नाशिक : शहरात कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे प्रमाण कमी होण्याऐवजी वाढतच असून, शनिवारी (दि.११) विक्रमी ११ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात प्रथमच चोवीस तासांत मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आल्याने शहरवासीयांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तथापि, महापालिकेच्या वतीने युद्धपातळीवर उपाययोजना करण्यात येत असून, आॅक्सिजन पुरवठ्याबरोबरच रेमिडीसीवर इंजेक्शनवर भर देण्यात येत आहेत. रेमिडीसीवर इंजेक्शन थेट मुंबईहून मागविण्यात आले आहेत.शहरात कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येबरोबरच मृतांची संख्यादेखील वाढतच आहे. महापालिकेने मृत्युदर कमी करण्यासाठी अनेक प्रकारच्या उपाययोजना केल्या आहेत. नियमित चाचण्या तर वाढविल्या आहेच, परंतु अ‍ॅँटिजेन चाचण्यादेखील करणे वाढविल्या आहेत. त्याचप्रमाणे उपचार पद्धतीतदेखील करण्यात आला आहे. मात्र, मध्यंतरी तीन ते चार दिवस कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या घटली आणि त्यानंतर मात्र ती पुन्हा वाढत गेली.शनिवारी (दि.११) एकाच दिवसात ११ जणांचा बळी गेला आहे. यात मुंबईनाका येथील भाभानगर येथील ७७ वर्षीय वृद्ध, वडाळारोडवरील जयदीपनगर येथील ७० वर्षीय वृद्ध, गंजमाळ येथील उर्दू शाळे जवळ राहणारी ६० वर्षीय महिला, बुधवार पेठ येथील ७२ वर्षीय पुरुष त्याचबरोबर पाथर्डी फाटा येथील वासननगर परिसरातील ६७ वर्षीय पुरुष रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला, तर टाकळी येथील भीमशक्तीनगर येथे राहणारा ७० वर्षीय वृद्ध, गांधीनगर येथील ७७ वर्षीय वृद्ध, एकलहरेरोडवरील भोर मळा परिसरातील ७२ वर्षीय वृद्ध पुरुष तसेच पंचवटीतील आरटीओ आॅफिस परिसरातील ६४ वर्षीय वृद्ध महिलेचाही मृत्यू झाला आहे. सिडकोतील कामटवाडे येथील डीजीपीनगरातील ४६ वर्षीय महिला तर सातपूर येथील शिवाजीनगर येथील ३४ वर्षीय रुग्णाचादेखील कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाल्याची माहिती महापालिकेच्या सूत्रांनी दिली.शहरात एकाच दिवसात ११ जणांचा मृत्यू झाल्याने आत्तापर्यंतच्या कोरोना बळींची संख्या १६५ झाली आहे. तर चोवीस तासात आढळले १६५ बाधित आढळल्याने ही संख्या ३ हजार ९२९ झाली आहे. अर्थात, शहरातील बाधितांच्या संख्येपैकी १ हजार ४९८ रुग्ण उपचार घेत आहेत, तर २ हजार २६४ रुग्णच कोरोनामुक्त झाले आहेत.सध्या कोरोनाबाधितांचा मृत्युदर कमी करण्यासाठी महापालिकेच्या वतीने मध्यवर्ती आॅक्सिजन सिस्टीम सुरू करण्यात आली असून, हे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आले आहे, तर दुसरीकडे औषधांचा पुरेसा वापर करताना सध्या प्रभावी म्हणून गणल्या जाणाºया रेमिडीसीवर इंजेक्शनावर भर दिला जात आहे. सध्या या इंजेक्शनची सर्वत्र टंचाई असल्याने थेट मुंबईहून इंजेक्शन मागविले जात असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र त्र्यंबके यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू