शहरं
Join us  
Trending Stories
1
"धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा
2
"लोकसंख्या धोरण लवकरात लवकर लागू करणे आवश्यक, तरच..."; RSS ची सरकारकडे मागणी, होसबळे म्हणाले...
3
उद्धव ठाकरेंचा मराठवाड्यात ४ दिवस "दगाबाज रे" संवाद दौरा, शेतकऱ्यांशी साधणार संवाद
4
डोक्यात रॉड मारून मोठ्या भावाची हत्या, मग गर्भवती वहिनीवर बलात्कार, नंतर तिलाही संपवलं...
5
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
6
५,८०० कोटींच्या २००० रुपयांच्या नोटा अजूनही लोकांकडे पडून! अजूनही बदलण्याची संधी
7
तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपुरात होणार दर्शन मंडप; वारकऱ्यांना मिळणार कमी वेळेत विठ्ठलाचे दर्शन
8
King Title Reveal: वाढदिवशी शाहरुखचं चाहत्यांना सरप्राईज! 'किंग'चा पहिला प्रोमो रिलीज, व्हिडीओ बघाच
9
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
10
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: महादेव पूजनासह ‘या’ ७ गोष्टी आवर्जून करा; काही कमी पडणार नाही!
11
"ख्रिश्चनांचं हत्याकांड थांबवलं गेलं नाही तर...!"; डोनाल्ड ट्रम्प यांची आता ‘या’ देशाला थेट हल्ल्याची धमकी
12
"लेकाच्या कठीण प्रसंगी देश विरोधात असताना...", शाहरुखबद्दल हिमानी शिवपुरी काय म्हणाल्या?
13
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: केवळ लाभ होईल, नशीब साथ देईल; प्रभावी शिव मंत्रांचा नक्की जप करा!
14
९ वर्षांच्या मुलीने मारली चौथ्या मजल्यावरून उडी, शाळेने पुरावे केले नष्ट; धक्कादायक Video
15
EMI वर 'श्रीमंती'चा देखावा! ७०% आयफोन, ८०% गाड्या कर्जावर; सीए नितीन कौशिक यांचा गंभीर इशारा
16
ब्रिटनमध्ये धावत्या ट्रेनमध्ये हल्ला, अनेकांवर चाकूने वार, प्रवाशांमध्ये घबराट, दोन संशयित अटकेत  
17
कार्तिक सोमप्रदोष व्रत २०२५: महादेव प्रसन्न होतील, सर्व मनोकामना पूर्ण करतील; ‘असे’ करा व्रत!
18
शिरोळमध्ये ऊस आंदोलनाचा भडका; ऊस वाहनांचे टायर पेटवले, हवा काढली
19
शाहरुख खानचा वाढदिवस, 'मन्नत'बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; युके-जपानवरुनही आले फॅन्स
20
"मी अवतारात आले आहे...'; शर्ट परिधान करुन रेड कार्पेटवर आली प्राजक्ता माळी, व्हिडीओ व्हायरल

शहरात उच्चांकी ११ जणांचे बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 01:58 IST

नाशिक शहरात कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे प्रमाण कमी होण्याऐवजी वाढतच असून, शनिवारी (दि.११) विक्रमी ११ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात प्रथमच चोवीस तासांत मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आल्याने शहरवासीयांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे

ठळक मुद्देधक्कादायक । मृत्युदर कमी होण्याऐवजी वाढच; नागरिकांत चिंता

नाशिक : शहरात कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे प्रमाण कमी होण्याऐवजी वाढतच असून, शनिवारी (दि.११) विक्रमी ११ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात प्रथमच चोवीस तासांत मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आल्याने शहरवासीयांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तथापि, महापालिकेच्या वतीने युद्धपातळीवर उपाययोजना करण्यात येत असून, आॅक्सिजन पुरवठ्याबरोबरच रेमिडीसीवर इंजेक्शनवर भर देण्यात येत आहेत. रेमिडीसीवर इंजेक्शन थेट मुंबईहून मागविण्यात आले आहेत.शहरात कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येबरोबरच मृतांची संख्यादेखील वाढतच आहे. महापालिकेने मृत्युदर कमी करण्यासाठी अनेक प्रकारच्या उपाययोजना केल्या आहेत. नियमित चाचण्या तर वाढविल्या आहेच, परंतु अ‍ॅँटिजेन चाचण्यादेखील करणे वाढविल्या आहेत. त्याचप्रमाणे उपचार पद्धतीतदेखील करण्यात आला आहे. मात्र, मध्यंतरी तीन ते चार दिवस कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या घटली आणि त्यानंतर मात्र ती पुन्हा वाढत गेली.शनिवारी (दि.११) एकाच दिवसात ११ जणांचा बळी गेला आहे. यात मुंबईनाका येथील भाभानगर येथील ७७ वर्षीय वृद्ध, वडाळारोडवरील जयदीपनगर येथील ७० वर्षीय वृद्ध, गंजमाळ येथील उर्दू शाळे जवळ राहणारी ६० वर्षीय महिला, बुधवार पेठ येथील ७२ वर्षीय पुरुष त्याचबरोबर पाथर्डी फाटा येथील वासननगर परिसरातील ६७ वर्षीय पुरुष रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला, तर टाकळी येथील भीमशक्तीनगर येथे राहणारा ७० वर्षीय वृद्ध, गांधीनगर येथील ७७ वर्षीय वृद्ध, एकलहरेरोडवरील भोर मळा परिसरातील ७२ वर्षीय वृद्ध पुरुष तसेच पंचवटीतील आरटीओ आॅफिस परिसरातील ६४ वर्षीय वृद्ध महिलेचाही मृत्यू झाला आहे. सिडकोतील कामटवाडे येथील डीजीपीनगरातील ४६ वर्षीय महिला तर सातपूर येथील शिवाजीनगर येथील ३४ वर्षीय रुग्णाचादेखील कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाल्याची माहिती महापालिकेच्या सूत्रांनी दिली.शहरात एकाच दिवसात ११ जणांचा मृत्यू झाल्याने आत्तापर्यंतच्या कोरोना बळींची संख्या १६५ झाली आहे. तर चोवीस तासात आढळले १६५ बाधित आढळल्याने ही संख्या ३ हजार ९२९ झाली आहे. अर्थात, शहरातील बाधितांच्या संख्येपैकी १ हजार ४९८ रुग्ण उपचार घेत आहेत, तर २ हजार २६४ रुग्णच कोरोनामुक्त झाले आहेत.सध्या कोरोनाबाधितांचा मृत्युदर कमी करण्यासाठी महापालिकेच्या वतीने मध्यवर्ती आॅक्सिजन सिस्टीम सुरू करण्यात आली असून, हे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आले आहे, तर दुसरीकडे औषधांचा पुरेसा वापर करताना सध्या प्रभावी म्हणून गणल्या जाणाºया रेमिडीसीवर इंजेक्शनावर भर दिला जात आहे. सध्या या इंजेक्शनची सर्वत्र टंचाई असल्याने थेट मुंबईहून इंजेक्शन मागविले जात असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र त्र्यंबके यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू