शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
3
नेपाळमध्ये लष्कराने कमान सांभाळली, एअर इंडिया-इंडिगोच्या विमान उड्डाणे रद्द
4
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
5
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
6
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
7
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
8
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
9
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
10
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
11
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
12
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
13
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर
14
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
15
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
16
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
17
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
18
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
19
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
20
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?

शहरात उच्चांकी ११ जणांचे बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 01:58 IST

नाशिक शहरात कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे प्रमाण कमी होण्याऐवजी वाढतच असून, शनिवारी (दि.११) विक्रमी ११ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात प्रथमच चोवीस तासांत मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आल्याने शहरवासीयांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे

ठळक मुद्देधक्कादायक । मृत्युदर कमी होण्याऐवजी वाढच; नागरिकांत चिंता

नाशिक : शहरात कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे प्रमाण कमी होण्याऐवजी वाढतच असून, शनिवारी (दि.११) विक्रमी ११ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात प्रथमच चोवीस तासांत मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आल्याने शहरवासीयांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तथापि, महापालिकेच्या वतीने युद्धपातळीवर उपाययोजना करण्यात येत असून, आॅक्सिजन पुरवठ्याबरोबरच रेमिडीसीवर इंजेक्शनवर भर देण्यात येत आहेत. रेमिडीसीवर इंजेक्शन थेट मुंबईहून मागविण्यात आले आहेत.शहरात कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येबरोबरच मृतांची संख्यादेखील वाढतच आहे. महापालिकेने मृत्युदर कमी करण्यासाठी अनेक प्रकारच्या उपाययोजना केल्या आहेत. नियमित चाचण्या तर वाढविल्या आहेच, परंतु अ‍ॅँटिजेन चाचण्यादेखील करणे वाढविल्या आहेत. त्याचप्रमाणे उपचार पद्धतीतदेखील करण्यात आला आहे. मात्र, मध्यंतरी तीन ते चार दिवस कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या घटली आणि त्यानंतर मात्र ती पुन्हा वाढत गेली.शनिवारी (दि.११) एकाच दिवसात ११ जणांचा बळी गेला आहे. यात मुंबईनाका येथील भाभानगर येथील ७७ वर्षीय वृद्ध, वडाळारोडवरील जयदीपनगर येथील ७० वर्षीय वृद्ध, गंजमाळ येथील उर्दू शाळे जवळ राहणारी ६० वर्षीय महिला, बुधवार पेठ येथील ७२ वर्षीय पुरुष त्याचबरोबर पाथर्डी फाटा येथील वासननगर परिसरातील ६७ वर्षीय पुरुष रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला, तर टाकळी येथील भीमशक्तीनगर येथे राहणारा ७० वर्षीय वृद्ध, गांधीनगर येथील ७७ वर्षीय वृद्ध, एकलहरेरोडवरील भोर मळा परिसरातील ७२ वर्षीय वृद्ध पुरुष तसेच पंचवटीतील आरटीओ आॅफिस परिसरातील ६४ वर्षीय वृद्ध महिलेचाही मृत्यू झाला आहे. सिडकोतील कामटवाडे येथील डीजीपीनगरातील ४६ वर्षीय महिला तर सातपूर येथील शिवाजीनगर येथील ३४ वर्षीय रुग्णाचादेखील कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाल्याची माहिती महापालिकेच्या सूत्रांनी दिली.शहरात एकाच दिवसात ११ जणांचा मृत्यू झाल्याने आत्तापर्यंतच्या कोरोना बळींची संख्या १६५ झाली आहे. तर चोवीस तासात आढळले १६५ बाधित आढळल्याने ही संख्या ३ हजार ९२९ झाली आहे. अर्थात, शहरातील बाधितांच्या संख्येपैकी १ हजार ४९८ रुग्ण उपचार घेत आहेत, तर २ हजार २६४ रुग्णच कोरोनामुक्त झाले आहेत.सध्या कोरोनाबाधितांचा मृत्युदर कमी करण्यासाठी महापालिकेच्या वतीने मध्यवर्ती आॅक्सिजन सिस्टीम सुरू करण्यात आली असून, हे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आले आहे, तर दुसरीकडे औषधांचा पुरेसा वापर करताना सध्या प्रभावी म्हणून गणल्या जाणाºया रेमिडीसीवर इंजेक्शनावर भर दिला जात आहे. सध्या या इंजेक्शनची सर्वत्र टंचाई असल्याने थेट मुंबईहून इंजेक्शन मागविले जात असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र त्र्यंबके यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू