शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

क्रशरच्या खाणपट्ट्यांची इलेक्ट्रॉनिक मोजणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 15:18 IST

नाशिक जिल्ह्यात यंदा गौणखनिजापोटी २४ कोटी रूपये वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले असले तरी, गेल्या काही महिन्यांपासून गौणखनिजाच्या बेकायदेशीर वाहतुकीच्या विरोधातील कारवाई मंदावल्याने कारवाईपोटी मिळणा-या उत्पन्नातही घट झाली आहे.

ठळक मुद्देवसुलीसाठी धावाधाव : पंधरा वर्षाचे होणार मोजमापसारूळ व राजुर बहुला येथे जवळपास ३० खाणपट्टे

नाशिक : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपुर खंडपीठाने राज्यातील वाळू लिलावास स्थगिती दिल्यामुळे नाशिक जिल्ह्यात गौणखनिज वसुलीपोटी मिळणाºया महसुलात घट होण्याची शक्यता निर्माण झाल्याने आता गौणखनिज विभागाने जिल्ह्यातील खडी क्रशरसाठी दगडाचा पुरवठा करणा-या खाणपट्ट्यांची ‘इलेक्ट्रॉनिक टोटल स्टेशन’ प्रणालीच्या माध्यमातून मोजमाप घेण्यात येणार असून, साधारणत: पंधरा वर्षात खाणमालकांनी किती उत्खनन केले याचा अंदाज बांधून त्या आधारे स्वामीत्वधन आकारणी करण्यात येणार आहे.नाशिक जिल्ह्यात यंदा गौणखनिजापोटी २४ कोटी रूपये वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले असले तरी, गेल्या काही महिन्यांपासून गौणखनिजाच्या बेकायदेशीर वाहतुकीच्या विरोधातील कारवाई मंदावल्याने कारवाईपोटी मिळणा-या उत्पन्नातही घट झाली आहे. त्याची भर काढण्यासाठी गौणखनिज विभागाने वाळूचे लिलाव करण्याची प्रक्रिया पार पाडली परंतु अवघ्या चार ठिय्यांचे लिलाव होऊ शकले आहेत. अन्य २४ ठिय्यांच्या लिलावासाठी प्रशासनाने दोन वेळा फेर लिलाव जाहीर करूनही ठेकेदारांनी त्याकडे पाठ फिरविली आहे. अशा परिस्थितीत गौणखनिज विभाग आर्थिक अडचणीत सापडला असता, त्यांनी पुन्हा लिलावाची तयारी सुरू करताच, न्यायालयाने वाळू ठिय्यांच्या लिलावाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे मार्च अखेर वसुलीचे उद्दिष्ट गाठायचे कसे असा प्रश्न पडलेल्या गौणखनिज विभागाने आता जिल्ह्यातील खाण पट्ट्यांची ‘इलेक्ट्रॉनिक टोटल स्टेशन’ प्रणालीचा वापर करून मोजणी करण्याचे ठरविले आहे. त्याची सुरूवात नाशिक तालुक्यातील सारूळ व राजुर बहुला येथील खाणपट्ट्यापासून केली जाणार आहे. गेल्या पंधरा वर्षात या खाणींमधून किती उत्खनन करण्यात आले व त्यापोटी खाण मालकांनी शासनाकडे किती स्वामीत्वधन (रॉयल्टी) भरली याचा ताळामेळ त्याआधारे घेतला जाणार असून, खाणीतून अतिरीक्त उपसा झाला असेल तर पाच पट दंडाची आकारणी करून त्याची वसुली केली जाणार आहे. सारूळ व राजुर बहुला येथे जवळपास ३० खाणपट्टे असून, गेल्या अनेक वर्षापासून ते अविरत सुरू आहेत. विशेषत: रात्रीच्या वेळी डोंगर पोखरण्याचे काम केले जाते व त्यासाठी स्फोटकांचा वापर केला जातो. त्याविरूद्ध वेळोवेळी कारवाईही करण्यात आली परंतु खाणपट्टे मालक महसुल प्रशासनालाही जुमानत नाहीत.

टॅग्स :GovernmentसरकारNashikनाशिक