शहरं
Join us  
Trending Stories
1
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
3
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
4
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
5
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
6
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
7
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न
8
Road Rage Case: ट्रक चालकाचे अपहरण; पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक, आई- वडील फरार
9
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
10
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
11
सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 
12
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
13
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
14
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
15
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
16
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
17
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
18
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
19
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
20
ठाण्यातील अवजड वाहन बंदीचा ताप! मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील अवजड वाहनांना बंदी

अतिदुर्गम भागात वीजपुरवठ्याचा खेळखंडोबा सुरु जयदर परिसरात २२ तास वीज गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 00:49 IST

कळवण : तालुक्यातील आदिवासी, दुर्गम व अतिदुर्गम भागात वीजपुरवठ्याचा खेळखंडोबा सुरु आहे.

ठळक मुद्देमहावितरणच्या कार्यपद्धतीवर नाराजीसध्या रब्बीचा हंगाम सुरु

कळवण : तालुक्यातील आदिवासी, दुर्गम व अतिदुर्गम भागात वीजपुरवठ्याचा खेळखंडोबा सुरु असून, जयदर वीज उपकेंद्रात्ांर्गत असलेल्या गावामध्ये सलग २२ तास वीज गायब राहत असल्याने आदिवासी बांधवांनी महावितरणच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे. दिवसातून फक्त २ तास वीजपुरवठा होत असल्याने शेतपिकाला पाणी देणे शक्य होत नाही. त्यामुळे पुनंद खोºयातील वीजपुरवठा तत्काळ सुरळीत करावा अन्यथा सोमवारी (दि.५) जयदर वीज उपकेंद्रावर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा सुळेचे सरपंच चंद्रकांत गवळी यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. जयदर व परिसरातील शेतकरी बांधवासह सरपंच चंद्रकांत गवळी, अर्जुन बागुल, पंडीत पवार, मन्साराम ठाकरे, देवराम महाजन, पंडीत गायकवाड, चंद्रकांत गवळी, रामा गायकवाड, लक्क्ष्मण गांगुर्डे, तुळशीराम चौधरी, उत्तम बागुल, सदू महाजन, काशिनाथ महाले यांच्या शिष्टमंडळाने उपमुख्यकार्यकारी अभियंता ॠषीकेश खैरनार यांची भेट घेऊन निवेदन दिले. वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. सध्या रब्बीचा हंगाम सुरु असून कळवण तालुक्यात गहू, कांदा भाजीपाला ही पिके घेतली जातात. तालुक्यात कांदा लागवड मोठ्याप्रमाणात झाली असून काही भागात लागवड सुरु आहे.कांदा पिकाला पाणी देण्यासाठी दिवसातून आठ तास विजेची गरज आहे. परंतु पुनंद खोºयातील जयदर वीज उपकेंद्रांतर्गत परिसरातील गावात वीजेचा लपंडाव सुरु आहे. २४ तासात फक्त दोनच तास अनिश्चित वेळेत वीज मिळत असल्याने शेती पिकाला पाणी दिले जात नाही. सोमवारपर्यंत वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास जयदर वीज उपकेंद्रावर ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे दिला असून ठिय्या आंदोलन काळात कोणतीही दुर्दैवी घटना घडल्यास यास महावितरण प्रशासन जबाबदार राहील असा इशाराही देण्यात आला आहे. शिष्टमंडळात गणपत खांडवी, भावराव चौधरी, गोविंदा पवार, शिवाजी बागुल, लक्ष्मण पवार काशिनाथ भोये, उत्तम भोये, मन्साराम गायकवाड, सीताराम गायकवाड, परशराम भोये, गुलाब गांगुर्डे, राजाराम महाजन, रामदास महाजन, सखाराम ठाकरे, मणिराम बागुल, शिवराम खांडवी, भागवत जगताप, रामदास बागुल, सखाराम देहमुख, राजाराम गवळी, लक्ष्मण गवळी, धनराज गांगुर्डे, यशवंत भोये, मन्साराम बर्डे, शिवाजी चौधरी, महादू गायकवाड, दिनकर भोये आदी शेतकरी उपस्थित होते.