शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

अतिदुर्गम भागात वीजपुरवठ्याचा खेळखंडोबा सुरु जयदर परिसरात २२ तास वीज गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 00:49 IST

कळवण : तालुक्यातील आदिवासी, दुर्गम व अतिदुर्गम भागात वीजपुरवठ्याचा खेळखंडोबा सुरु आहे.

ठळक मुद्देमहावितरणच्या कार्यपद्धतीवर नाराजीसध्या रब्बीचा हंगाम सुरु

कळवण : तालुक्यातील आदिवासी, दुर्गम व अतिदुर्गम भागात वीजपुरवठ्याचा खेळखंडोबा सुरु असून, जयदर वीज उपकेंद्रात्ांर्गत असलेल्या गावामध्ये सलग २२ तास वीज गायब राहत असल्याने आदिवासी बांधवांनी महावितरणच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे. दिवसातून फक्त २ तास वीजपुरवठा होत असल्याने शेतपिकाला पाणी देणे शक्य होत नाही. त्यामुळे पुनंद खोºयातील वीजपुरवठा तत्काळ सुरळीत करावा अन्यथा सोमवारी (दि.५) जयदर वीज उपकेंद्रावर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा सुळेचे सरपंच चंद्रकांत गवळी यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. जयदर व परिसरातील शेतकरी बांधवासह सरपंच चंद्रकांत गवळी, अर्जुन बागुल, पंडीत पवार, मन्साराम ठाकरे, देवराम महाजन, पंडीत गायकवाड, चंद्रकांत गवळी, रामा गायकवाड, लक्क्ष्मण गांगुर्डे, तुळशीराम चौधरी, उत्तम बागुल, सदू महाजन, काशिनाथ महाले यांच्या शिष्टमंडळाने उपमुख्यकार्यकारी अभियंता ॠषीकेश खैरनार यांची भेट घेऊन निवेदन दिले. वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. सध्या रब्बीचा हंगाम सुरु असून कळवण तालुक्यात गहू, कांदा भाजीपाला ही पिके घेतली जातात. तालुक्यात कांदा लागवड मोठ्याप्रमाणात झाली असून काही भागात लागवड सुरु आहे.कांदा पिकाला पाणी देण्यासाठी दिवसातून आठ तास विजेची गरज आहे. परंतु पुनंद खोºयातील जयदर वीज उपकेंद्रांतर्गत परिसरातील गावात वीजेचा लपंडाव सुरु आहे. २४ तासात फक्त दोनच तास अनिश्चित वेळेत वीज मिळत असल्याने शेती पिकाला पाणी दिले जात नाही. सोमवारपर्यंत वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास जयदर वीज उपकेंद्रावर ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे दिला असून ठिय्या आंदोलन काळात कोणतीही दुर्दैवी घटना घडल्यास यास महावितरण प्रशासन जबाबदार राहील असा इशाराही देण्यात आला आहे. शिष्टमंडळात गणपत खांडवी, भावराव चौधरी, गोविंदा पवार, शिवाजी बागुल, लक्ष्मण पवार काशिनाथ भोये, उत्तम भोये, मन्साराम गायकवाड, सीताराम गायकवाड, परशराम भोये, गुलाब गांगुर्डे, राजाराम महाजन, रामदास महाजन, सखाराम ठाकरे, मणिराम बागुल, शिवराम खांडवी, भागवत जगताप, रामदास बागुल, सखाराम देहमुख, राजाराम गवळी, लक्ष्मण गवळी, धनराज गांगुर्डे, यशवंत भोये, मन्साराम बर्डे, शिवाजी चौधरी, महादू गायकवाड, दिनकर भोये आदी शेतकरी उपस्थित होते.