शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

भरणा केंद्र बंद असल्याने वीजबिले थकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 00:12 IST

कळवण : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने वीजबिलांचे भरणा केंद्रे बंद केल्याने मोठ्या प्रमाणात बिले थकली आहेत. यामुळे महावितरणचे नुकसान होत आहे. ग्राहकांच्या सुविधेचा विचार करून तालुक्यातील बिल भरणा केंद्रे सुरू करण्याची मागणी ग्राहकांनी केली आहे.

ठळक मुद्देकळवण : महावितरणचे नुकसान; केंद्र सुरू करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्ककळवण : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने वीजबिलांचे भरणा केंद्रे बंद केल्याने मोठ्या प्रमाणात बिले थकली आहेत. यामुळे महावितरणचे नुकसान होत आहे. ग्राहकांच्या सुविधेचा विचार करून तालुक्यातील बिल भरणा केंद्रे सुरू करण्याची मागणी ग्राहकांनी केली आहे.महावितरणच्या आॅनलाइन बिले भरण्याच्या आवाहनाला प्रतिसाद दिला गेला तर बिले रीपिट आली. मीटर नोंद न करता बिले भरणे योग्य नसल्याने ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे. कळवण तालुका आदिवासीबहुल असून, आॅनलाइन बिले भरण्याबाबत जनता अनभिज्ञ आहे. महावितरण अ‍ॅप असो किंवा अन्य आॅनलाइन सुविधा गोरगरीब व आदिवासी जनतेला याबाबत अपेक्षित ज्ञान नाही व ते हाताळताही येत नाही. कळवण शहरातील धनलक्ष्मी पतसंस्था व कळवण मर्चंट बँकेत सर्व प्रकारचे वीजबिल अधिकृत भरणा केंद्र सुरू असताना शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही भरणा केंदे्र तात्पुरती बंद केली आहेत. त्यामुळे ग्रामीण व आदिवासी भागातील नागरिकांकडून वीजबिलांचा भरणा झालेला नाही.आॅनलाइन भरणा करताना उपलब्ध साधनांअभावी ग्राहकांना बिले भरता आली नाहीत. दर महिन्याला मीटर रिडिंग घेत बिले येत असतात. ती बिले शेकडो ग्राहक या दोन्ही संस्थांमध्ये भरण्यासाठी जात होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षितता म्हणून महावितरण कंपनीने ही दोन्ही केंद्रे पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवली आहेत. यामुळे कळवण तालुक्यातील बिल भरणा मोठ्या प्रमाणात ठप्प असून, आॅनलाइन बिल भरणा करण्याबाबत ग्रामीण भागातील अज्ञानामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव मिटल्यानंतर एकदम तीन ते चार महिन्यांची बिले भरणार तरी कसे, असा प्रश्न तालुक्यातील ग्राहकांना पडला आहे.कळवण शहरातील महावितरण बिल भरणा केंदे्र पुन्हा सुरू करण्यात यावे व सुरक्षित अंतर व अन्य काळजी घेण्याच्या नियम व अटी यांची पूर्तता या संस्थांकडून करून घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येतआहे.कोरोनाची साथ सुरू असताना बँक व पतसंस्थांची अन्य कामे सकाळी ११ ते दुपारी ३ या कालावधीत सुरू आहे. अन्य सेवा बंद नसताना बील भरणा केंद्रे बंद करून शासनानेग्रामीण व आदिवासी जनतेवर अन्यायाची भूमिका घेतली आहे, अशी भावना ग्राहकांची झाली आहे.कळवण तालुक्यातील परिस्थिती पूर्वपदावर येत असून, अनेक व्यापारी दुकाने खुली करण्यात आली आहेत. अत्यावश्यक सुविधा समजून लवकरात लवकर वीजबिल भरणा केंद्रं सुरू करण्यात यावीत, अशी मागणी ग्राहकांकडून करण्यात येत आहे.महावितरण कंपनीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तात्पुरत्या स्वरूपात संस्थेतील अधिकृत बिल भरणा केंद्र बंद केले आहे. ग्राहकांच्या सुविधेसाठी शासनाचे सर्व नियम-निकष पाळून पतसंस्थेत भरणा केंद्र पुन्हा सुरू करण्याची आमची तयारी आहे.- दीपक महाजन, कळवणबिल भरणा केंद्र बंद असल्यामुळे बिले थकत आहेत. मीटर रिडिंग न घेता बिले भरावीत कशी व कुठे, हा प्रश्न आहे. आदिवासी व ग्रामीण जनतेला मोबाइल अ‍ॅप व अन्य आॅनलाइन सेवेचा वापर करताना अडचणी येतात. भरणा केंद्र पुन्हा सुरू करावीत.- प्रभाकर गावित, ग्राहक, कळवण

टॅग्स :kalwan-acकळवणMSRDCराज्य रस्ते विकास महामंडळ