शहरं
Join us  
Trending Stories
1
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
2
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
3
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
4
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
5
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
6
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
7
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
8
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
9
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
10
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
11
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
12
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
13
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
14
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
15
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
16
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
17
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
18
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
19
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
20
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट

शहरात विजेचा खेळखंडोबा

By admin | Updated: September 14, 2015 23:42 IST

पावसाचे निमित्त : कर्मचाऱ्यांची कमतरता; अभियंत्यांना नाही वेळ

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात शहरातील वीजपुरवठा खंडित होणार नसल्याचे नियोजन करण्यात आल्याचा दावा महावितरणने केला असला तरी शहरवासीय मात्र खंडित वीजपुरवठ्याने हैराण झाले आहेत. कुणी पावसाचे निमित्त करीत आहे, तर काही अभियंते सिंंहस्थ कुंभमेळ्याचे कारण पुढे करीत सर्व लाइनस्टाफ सिंहस्थ कामात अडकले असल्याचे सांगत आहेत. सलग वीजपुरवठा करणे ही महावितरणची जबाबदारी असतानाही गेल्या महिनाभरापासून नाशिककर खंडित वीजपुरवठ्याचा अनुभव घेत आहेत. गेल्या एप्रिल-मेमध्ये पाण्याअभावी राज्यातील काही विद्युत निर्मिती संच बंद झाल्याने तातडीचे भारनियमन करण्यात आले होते. शहर आणि ग्रामीण भागातील ग्राहकांनी पंधरादिवस महावितरणला या काळात सहकार्य केले होते, परंतु गेल्या जुलैपासून कोणतेही भारनियमन नसताना आणि पावसाळापूर्व सर्व दुरुस्तीची कामे झालेली असतानाही सातत्याने वीजपुरवठा खंडित होत आहे. एव्हढे सगळे होऊनही महावितरणचे अभियंते मात्र असा कोणताही प्रकार होत नसल्याचे सांगत आहेत. परंतु दिवसातून अनेकदा वीजप्रवाह खंडित होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. या संदर्भात ज्या अभियंत्यांशी संपर्क होऊ शकला त्यांनीही वीजप्रवास सुरळीत असल्याचे सांगून दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे काही ठिकाणचा वीजपुरवठा खंडित झाला होता, असे सांगितले. मात्र महिनाभरापासून विजेचा लपंडाव सुरू असल्याबाबत त्यांनी कानावर हात ठेवले. (प्रतिनिधी)