शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

वाडीवऱ्हेत विजेचा खेळखंडोबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 00:32 IST

वाडीवऱ्हे : वाडीवऱ्हे गावात गेल्या तीन दिवसापासून वीज गायब असून नागरिकांचे पिण्याच्या पाण्याचेदेखील हाल होऊ लागले आहेत. ऐन उन्हाळ्यात वीज गायब असल्याने वाढत्या उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. रोहित्र जळाल्याने ही समस्या उत्पन्न झाली आहे. मात्र वीज वितरण कर्मचारी याकडे डोळेझाक करीत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

ठळक मुद्देदुर्लक्ष : अर्धे गाव तीन दिवसापासून अंधारात

वाडीवऱ्हे : वाडीवऱ्हे गावात गेल्या तीन दिवसापासून वीज गायब असून नागरिकांचे पिण्याच्या पाण्याचेदेखील हाल होऊ लागले आहेत. ऐन उन्हाळ्यात वीज गायब असल्याने वाढत्या उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. रोहित्र जळाल्याने ही समस्या उत्पन्न झाली आहे. मात्र वीज वितरण कर्मचारी याकडे डोळेझाक करीत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.वाडीवऱ्हे गाव बाजारपेठेचे मोठे गाव असून, याठिकाणी सलग तीन दिवस वीज नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत. एकीकडे वीज बिलांची जोरात वसुली मोहीम सुरू आहे, तर दुसरीकडे मात्र नागरिकांना विजेअभावी विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.तीन दिवसात तीन ट्रान्सफार्मर जळाले आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना पिण्याचे पाणीदेखील मिळत नसल्याने गैरसोय होत असून, आधीच अतिशय उष्णता त्यात पाण्यासाठी वणवण होत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. कडक निर्बंधांमुळे नागरिक घरात असल्याने लहान बालके, वृद्धदेखील वाढत्या उकाड्याने घराबाहेर पडत आहेत. विजेअभावी गावातील पीठ गिरण्या बंद आहेत, मोबाईल चार्जिंग होत नाही. वारंवार खंडित होणाऱ्या विजेमुळे नागरिक संतप्त झाले असून वीज वितरण कार्यालयाने त्वरित विजेची समस्या सोडवावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत. (२८ एमएसइबी १)

टॅग्स :talukaतालुकाelectricityवीज