शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
3
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
4
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
5
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
6
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
7
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
8
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
9
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
10
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
11
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
12
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
13
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
14
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
15
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
16
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
17
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
18
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
19
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
20
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'

एका उमेदवारामुळे पाच जागांसाठी निवडणूक

By admin | Updated: September 26, 2015 23:18 IST

जिल्हा कृषी औद्योगिक संघ : ‘त्या’ची माघार नाहीच

नाशिक : अतिशय शेवटच्या क्षणापर्यंत निवडणूक होण्याची चिन्हे असलेल्या जिल्हा कृषी औद्योगिक सहकारी संघाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली, असे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात ३८ (३) या संवर्गासाठी निवडणूक होणे अटळ ठरले आहे.२५ सप्टेंबरपर्यंत जिल्हा कृषी औद्योगिक सहकारी संघाच्या निवडणुकीसाठी माघार घेण्याची अंतिम मुदत होती. या शेवटच्या दिवशी दुपारी तीन वाजेची माघारीची वेळ असताना प्रत्यक्षात माघारी नाट्य मात्र सायंकाळ उशिरापर्यंत चालल्याचे चित्र होते. अगदी शेवटच्या क्षणी सर्व जागांसाठी निवडणूक बिनविरोध झाली, असे सांगत इच्छुकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला खरा, मात्र १५ संचालक असलेल्या जिल्हा कृषी औद्योगिक सहकारी संघाच्या ३८(३) या महत्त्वाच्या संवर्गात पाच जागा असताना प्रत्यक्षात सहा उमेदवारांचे अर्ज असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या पाच जागांसाठी का होईना, निवडणूक होणार आहे. मात्र बिनविरोध निवडून आलेल्या काही संचालकांनी ही निवडणूक बिनविरोधच होणार, असा दावा केला आहे. मात्र माघारीच्या अंतिम दिवसापर्यंत अपेक्षित जागांपेक्षा जास्त अर्ज शिल्लक राहिल्यास त्या जागेसाठी निवडणूक घेणे, हे निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेत नमूद असते. त्यानुसारच आता जिल्हा कृषी औद्योगिक सहकारी संघाच्या ३८(३) या संवर्गासाठी निवडणूक होणार आहे. या संवर्गासाठी पाच जागा असताना प्रत्यक्षात सहा उमेदवारांचे अर्ज शिल्लक असल्याचे कळते. त्यात प्रकाश कवडे, सोमनाथ मोरे, तुकाराम पेखळे, दिलीप मोरे, बाळासाहेब गायकवाड आणि संदीप पानगव्हाणे या सहा उमेदवारांचे अर्ज शिल्लक असल्याचे समजते. या संवर्गात अवघे ५१ मतदार असल्याने मतदारांना सहा पैकी पाच उमेदवारांना निवडून द्यावे लागणार आहे. संघाच्या १०० ते २००० भाग भांडवल असलेल्या मतदारांसाठी ३८ (१) तसेच २०० ते ५००० भाग भांडवल असलेल्या मतदारांसाठी ३८(२), तर पाच हजारांच्या पुढे भाग भांडवल असलेल्या ३८(३) असा गट (संवर्ग)आहे. ३८(१) व ३८(२) या संवर्गात संचालक पदाइतकेच अर्ज आल्याने या दोन्ही संवर्गासाठी निवडणूक बिनविरोध झाल्यासारखी आहे. (प्रतिनिधी)