शहरं
Join us  
Trending Stories
1
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
3
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
4
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
5
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
6
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
7
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
8
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
9
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
10
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
11
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
12
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
13
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
14
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
15
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
16
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
17
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
18
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
19
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
20
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार

एका उमेदवारामुळे पाच जागांसाठी निवडणूक

By admin | Updated: September 26, 2015 23:18 IST

जिल्हा कृषी औद्योगिक संघ : ‘त्या’ची माघार नाहीच

नाशिक : अतिशय शेवटच्या क्षणापर्यंत निवडणूक होण्याची चिन्हे असलेल्या जिल्हा कृषी औद्योगिक सहकारी संघाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली, असे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात ३८ (३) या संवर्गासाठी निवडणूक होणे अटळ ठरले आहे.२५ सप्टेंबरपर्यंत जिल्हा कृषी औद्योगिक सहकारी संघाच्या निवडणुकीसाठी माघार घेण्याची अंतिम मुदत होती. या शेवटच्या दिवशी दुपारी तीन वाजेची माघारीची वेळ असताना प्रत्यक्षात माघारी नाट्य मात्र सायंकाळ उशिरापर्यंत चालल्याचे चित्र होते. अगदी शेवटच्या क्षणी सर्व जागांसाठी निवडणूक बिनविरोध झाली, असे सांगत इच्छुकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला खरा, मात्र १५ संचालक असलेल्या जिल्हा कृषी औद्योगिक सहकारी संघाच्या ३८(३) या महत्त्वाच्या संवर्गात पाच जागा असताना प्रत्यक्षात सहा उमेदवारांचे अर्ज असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या पाच जागांसाठी का होईना, निवडणूक होणार आहे. मात्र बिनविरोध निवडून आलेल्या काही संचालकांनी ही निवडणूक बिनविरोधच होणार, असा दावा केला आहे. मात्र माघारीच्या अंतिम दिवसापर्यंत अपेक्षित जागांपेक्षा जास्त अर्ज शिल्लक राहिल्यास त्या जागेसाठी निवडणूक घेणे, हे निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेत नमूद असते. त्यानुसारच आता जिल्हा कृषी औद्योगिक सहकारी संघाच्या ३८(३) या संवर्गासाठी निवडणूक होणार आहे. या संवर्गासाठी पाच जागा असताना प्रत्यक्षात सहा उमेदवारांचे अर्ज शिल्लक असल्याचे कळते. त्यात प्रकाश कवडे, सोमनाथ मोरे, तुकाराम पेखळे, दिलीप मोरे, बाळासाहेब गायकवाड आणि संदीप पानगव्हाणे या सहा उमेदवारांचे अर्ज शिल्लक असल्याचे समजते. या संवर्गात अवघे ५१ मतदार असल्याने मतदारांना सहा पैकी पाच उमेदवारांना निवडून द्यावे लागणार आहे. संघाच्या १०० ते २००० भाग भांडवल असलेल्या मतदारांसाठी ३८ (१) तसेच २०० ते ५००० भाग भांडवल असलेल्या मतदारांसाठी ३८(२), तर पाच हजारांच्या पुढे भाग भांडवल असलेल्या ३८(३) असा गट (संवर्ग)आहे. ३८(१) व ३८(२) या संवर्गात संचालक पदाइतकेच अर्ज आल्याने या दोन्ही संवर्गासाठी निवडणूक बिनविरोध झाल्यासारखी आहे. (प्रतिनिधी)