शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
"तुम्हाला अपेक्षित उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
3
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...
4
'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
5
जगातील टेक उद्योगात उलथापालथ: ॲमेझॉन, गूगल नंतर आता 'या' कंपनीच्या हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...
7
Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
8
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे
9
'जप्त केलेल्या मालमत्ता आणि थकीत कर्जाची माहिती द्या,' विजय माल्ल्यानं न्यायालयात काय म्हटलं?
10
Astrology: नशिबात नसलेल्या गोष्टीही स्वामीकृपेने मिळवता येतात का? ज्योतिष शास्त्र काय सांगते? पाहू
11
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
12
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
13
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
14
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
15
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
16
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
17
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
18
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
19
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
20
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!

आज थंडावणार निवडणूक प्रचाराच्या तोफा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:36 IST

नाशिक : नाशिक जिल्ह्यात ६२१ ग्रामपंचायतींसाठी सुरू असलेल्या निवडणूक प्रचाराची बुधवाारी (दि. १३) सायंकाळी सांगता होणार आहे. यंदा ...

नाशिक : नाशिक जिल्ह्यात ६२१ ग्रामपंचायतींसाठी सुरू असलेल्या निवडणूक प्रचाराची बुधवाारी (दि. १३) सायंकाळी सांगता होणार आहे. यंदा उमेदवारांना प्रचारासाठी अवघे आठच दिवस मिळाले. त्यातही पावसामुळे दोन दिवस वाया गेले. त्यामुळे गावागावात प्रचाराची रणधुमाळी उडाली होती. उमेदवारांनी प्रत्यक्ष गाठीभेटीवर भर देत प्रचार यंत्रणा राबविली. जिल्ह्यातील ५८९५पैकी १६२२ जागा बिनविरोध झाल्याने उर्वरित जागांसाठी येत्या १५ तारखेला मतदान होणार आहे.

एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपुष्टात येणाऱ्या जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. कळवण २९, येवला ६९, इगतपुरी ८, दिंडोरी ६०, त्र्यंबकेश्वर ३, सिन्नर १००, निफाड ६५, बागलाण ४०, चांदवड ५३, देवळा ११, नांदगाव ५९, मालेगाव ९९, नाशिक २५ या ग्रामपंचायतींसाठी निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. २१३२ प्रभागात होणाऱ्या निवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणेने तयारी पूर्ण केली आहे. बुधवारी सायंकाळी प्रचार संपुष्टात येताच दुसऱ्या दिवशी निवडणूक कर्मचारी आपापल्या मतदान केंद्रांवर पोहोचणार आहेत.

दिनांक ४ जानेवारीला निवडणूक चिन्हांचे वाटप होताच उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली होती. मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेठी घेण्याबरोबरच ग्रामपंचायतीच्या विकासासाठी करण्यात येणाऱ्या आश्वासनांचीही खैरात करण्यात आली. काही गावांमध्ये पक्षीय राजकारणाचेदेखील पडसाद दिसून आले. यंदा निवडणूक बिनविरोध करण्यासाठी व्यापक प्रयत्न झाले. मात्र, उमेदवारी कायम राखणाऱ्या उमेदवारांमुळे निवडणुकीतील चुरस वाढली आहे. पावसाचा व्यत्यय आणि उर्वरित एका दिवसात प्रचार आणखी शिगेला पोहोचण्याची तसेच शक्तिप्रदर्शनाची तयारी उमेदवारांनी केलेली आहे.

--इन्फो--

प्रशासकीय तयारी

येत्या १५ तारखेला मतदान होणार असल्याने मतदानाच्या एक दिवस आधी मतदान कर्मचारी मतदान केंद्रांवर पोहोचणार आहेत. त्यानुसार तालुका पातळीवर कर्मचारी तसेच त्यांच्यासाठी लागणाऱ्या साहित्यांचे नियोजन करण्यात आले. केंद्रांवर पोहोचण्यासाठी कर्मचाऱ्यांना वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. गुरुवारी कर्मचारी आपापल्या केंद्रांवर पोहोचतील. जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतींमधील १९३३ मतदान केंद्रांवर सुमारे दहा हजारपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.