शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

अवघ्या सेाळा दिवसात अठराशे कोरोनाबाधितांवर अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:13 IST

कोराेनामुळे शहरात बाधितांची संख्या वाढते आहे, तसे मृत्यू पावणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. १ एप्रिल पासूनचा आढावा घेतला तर सरासरी ...

कोराेनामुळे शहरात बाधितांची संख्या वाढते आहे, तसे मृत्यू पावणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. १ एप्रिल पासूनचा आढावा घेतला तर सरासरी तीस जणांचे बळी जात आहेत त्यात नाशिक शहरातील बळींची संख्या काही प्रमाणात कमी असली तरी नाशिक जिल्ह्यात ग्रामीण भागातून तसेच धुळे, जळगाव, नगर, नंदूरबार तसेच पालघरसारख्या ठिकाणहून रूग्ण येतात. येथील आरोग्य सुविधा तेथील सुविधांच्या तुलनेत जास्त असल्याने दीडशे- दोनशे किलोमीटर लांब जाऊनही आपल्या कुटूंबातील व्यक्ती वाचला पाहिजे या अपेक्षेने ते येतात आणि रूग्णाचा मृत्यू झाला तर संसर्ग वाढू नये यासाठी नाशिकमध्येच अंत्यसंस्कार करतात. नाशिकमधून पुणे किंवा मुंबईला उपचारासाठी नेलेल्या रूग्णाचा तेथे मृत्यू झाला तरी त्या व्यक्तीला देखील नाशिकमध्येच आणून अंत्यसंस्कार केलेे जातात. त्यामुळे नाशिक शहरातील चारही अमरधामचे बेड फुल असतात. सहाजिकच वेटिंग सुध्दा कायम असते.

नाशिक महापालिकेच्या पाच विभागातील अमरधामचा विचार केला तर १ ते १६ एप्रिल या कालावधीत २ हजार ३६० मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. यात १ हजार ७९३ कोरोना बाधीत तर ५६७ अन्य आजाराने मृत्यू पावलेल्यांचा समावेश आहे.

इन्फो..

नाशिक शहरातील चारही अमरधाममध्ये १६ दिवसात करण्यात आलेले अंत्यसंस्कार

(ग्राफसाठी)

नाशिक पूर्व

कोरोना बाधितांचे मृत्यू- ५४५

अन्य आजाराने मृत्यू- १०८

--

पंचवटी विभाग

काेरोना बाधितांचे मृत्यू- ४९४

अन्य आजाराने मृत्यू- १८६

--

नाशिकरोड विभाग

कोरोना बाधितांचे मृत्यू- ३९०

सामान्य आजाराने मृत्यू- ४४

----

सिडको विभाग

केारोना बाधितांचे मृत्यू- ३१२

---

सातपूर विभाग

कोरोना बाधितांचे मृत्यू- ५२

अन्य आजाराने मृत्यू- ५१

...कोट...

नाशिक शहराबरोबरच अन्य ग्रामीण भागातील मृतदेह देखील नाशिकमध्ये अंत्यसंस्कारासाठी येतात. ग्रामीण भागात स्मशानभूमी असूनही तेथे विद्युत किंवा गॅस दाहीनी नसल्याने अनेक गावातून मृतदेह नाशिकमध्ये अंत्यसंस्कारासाठी आणले जात आहेत. त्यामुळे नाशिक आणि पंचवटी अमरधामवर प्रचंड ताण येत आहे.

- डॉ. कल्पना कुटे, संचालक घनकचरा व्यवस्थापन विभाग

अन्य आजाराने मृत्यू- १७८