शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

आठ हजार क्विंटल बियाणे पडून

By admin | Updated: July 2, 2014 00:30 IST

आठ हजार क्विंटल बियाणे पडून

 

सुनील थोरात

सिन्नरजून महिना उलटला आहे. पावसाचे वातावरणही दिसत नाही. केवळ जोरदार झटक्याचा वारा सुटल्याने हे दुष्काळाचे लक्षण शेतकऱ्यांची चिंता वाढवणारे आहे. बाजारपेठेत शुकशुकाट असून, तालुक्यात विविध पिकांचे विक्रीसाठी उपलब्ध झालेले सुमारे आठ हजार क्विंटल बियाणे, तर सुमारे बारा हजार ३३८ मेट्रिक टन खते विक्रीअभावी पडून आहेत. खते, बी-बियाणे व औषधांच्या विक्रीतून होणारी कोट्यवधींची उलाढाल पावसाअभावी ठप्प झाली आहे.दुष्काळाची चिन्हे वाढल्याने अन्य दुकानांतील खरेदीवरही त्याचा परिणाम झाल्याचे जाणवत आहे. तालुक्यात ६४ हजार पाचशे हेक्टर क्षेत्रावर कृषी विभागाने पेरणीचे उद्दिष्ट ठेवले होते. मात्र हे नियोजन कोलमडले असून, भात, भूईमुगासह अन्य कडधान्याच्या पिकांच्या पेरणीचा कालावधी जवळपास संपला आहे. त्यामुळे या पिकांच्या पेरण्या अशक्य असून, केवळ बाजरी, मका, सोयाबीन आदि पिकांच्या पेरण्या १५ जुलैपर्यंत करता येणे शक्य असल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे, तर कृषी विभागाकडून हा कालावधी २१ जुलैपर्यंत सांगितला जात आहे. साधारण आषाढी एकादशीपर्यंत पेरणीयोग्य पाऊस झाला तर सर्वच पिकांच्या पेरा होऊ शकतात, असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. कडधान्य गटातील मठ, मूग, तूर, कुळीद, उडीद तेलबिया वर्गातील भूईमूग, सोयाबीन, तीळ, हौरी, खुरसणी यांच्या उत्पादनात लांबलेल्या पावसाने व उशिराच्या पेऱ्यामुळे मोठी होण्याची शक्यता आहे.खरीप हंगामातील तृणधान्य पिकांमधील बाजरी, मका, खरीप ज्वारी व नागली यापैकी बाजरी व मका पिकांची पेरणी १५ ते २० जुलै कालावधीत होऊ शकते. त्यामुळे या पिकांवर शेतकऱ्यांची मदार आहे. सपाटून पाऊस झाल्यास भाजीपालावर्गीय व नगदी पिकांतून उत्पादनवाढीसाठी शेतकरी प्रयत्न करतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. यापुढेही पावसामध्ये सातत्य राहिले तरच उत्पादन हाती लागेल अन्यथा खरीप हंगाम वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे. कृषी विभागाने केलेले पिकांच्या पेरणीचे नियोजन. त्यात तृणधान्य पिकांतील बाजरी पिकाच्या पेरणीचा २० हजार २५० हेक्टर क्षेत्राचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, मका १९ हजार २५०, सोयाबीन- आठ हजार या पिकांची पेरणी १५ ते २० जुलैपर्यंत झाल्यास उद्दिष्टापर्यंत पोहोचू शकले. मात्र भूईमूग- चार हजार १५०, खरीप ज्वारी ५०० हेक्टर, नागली ५०, तूर, मूग, मठ व कुळीद- प्रत्येकी एक हजार ५०० हेक्टर, सूर्यफूल, खुरासणी - प्रत्येकी १०० हेक्टर, ऊस- ८५० हेक्टर या पिकांच्या पेरणीचे नियोजन कोलमडले आहे. कापूस पिकालाही अधिक कालावधी लागत असल्याने त्याच्या एक हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर पेरणीच्या उद्दिष्टापर्यंत पोहोचणेही शक्य नसल्याचा अंदाज आहे. यापुढील नियोजन पावसाच्या हाती असल्याने तो पडावा म्हणून सगळचे आराधना करू लागले आहेत.