शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज पहिले विमान झेपावणार! पहिल्या दिवशी किती फ्लाईट्स उडणार?
3
संतापजनक! लग्नाला नकार दिल्याने भाडेकरूने तरुणीच्या आईला जिवंत जाळले; प्रकृती चिंताजनक
4
धुळे महापालिका निवडणुकीत महायुती अन् मविआत जागावाटपाचा तिढा; 'स्वबळा'ची तयारी जोरात
5
महापालिका निवडणूक २०२६ : 'एमआयएम'ची वाढती ताकद काँग्रेससाठी डोकेदुखी, संख्याबळासह मतांच्या टक्केवारीतही वाढ
6
क्रॉस व्होटिंग नको, 'एक पॅनल, एकच चिन्ह'; महायुतीची नवी रणनीती, दगाफटका टाळण्यासाठी खबरदारी
7
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
8
अमेरिकेत ३० भारतीयांना अटक, शिक्षाही होणार! पण नेमका गुन्हा तरी काय केला?
9
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
10
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
11
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
12
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
13
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
14
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
15
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
16
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
17
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
18
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
19
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
20
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

खून प्रकरणी आठ संशयितांना अटक

By admin | Updated: April 29, 2017 02:04 IST

पंचवटी : सराईत गुन्हेगार अजित शशिकांत खिच्ची (२८) याची पूर्ववैमनस्यातून धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याची घटना घडली़.

 पंचवटी : दिंडोरीरोडवरील अवधूतवाडी (गजानन चौक) परिसरात गुरुवारी (दि. २७) सराईत गुन्हेगार अजित शशिकांत खिच्ची (२८) याची पूर्ववैमनस्यातून धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याची घटना घडली़ याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी आठ संशयितांना ताब्यात घेतले असून, त्यामध्ये पाच विधिसंघर्षित बालकांचा समावेश आहे. गजानन प्रिंटर्ससमोर गुरुवारी रात्री संशयितांनी सराईत खिच्ची याच्यावर धारदार शस्त्राने वार केले़ खिच्ची याच्या अंगावर, पोटावर जखमा झाल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडला़ या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी खिच्ची यास उपचारासाठी शासकीय रुग्णालयात हलविले़ मात्र, उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला़ या घटनेनंतर पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक पोलीस आयुक्त विजयकुमार चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.खिच्ची याच्यावर हल्ला करणारे संशयित पसार झाल्याने गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार आप्पा गवळी, मोतीराम चव्हाण, सतीश वसावे, सचिन म्हस्दे, जितू जाधव यांनी तपासचक्रे फिरवून संशयित आकाश प्रभाकर मोहिते (१९, रा़ अंबिकानगर), सागर पवार (१९, फुलेनगर), अक्षय राजेंद्र निकम (२१, गजानन चौक, अवधूतवाडी) यांच्यासह पाच विधिसंघर्षित बालकांसह आठ संशयितांना अटक केली़संशयित व खिच्ची यांच्यात काही दिवसांपूर्वी वाद झाले होते. या वादानंतर गुरुवारी भराडवाडीत पुन्हा खिच्ची व संशयित यांच्यात वाद झाले व त्यांनी खिच्चीवर धारदार शस्त्राने वार करून हत्या केली़ याप्रकरणी मंगेश बागुल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयितांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुनील पुजारी, सहायक पोलीस निरीक्षक कैलास वाघ तपास करीत आहेत.दरम्यान, पंचवटी परिसरातील झोपडपट्टीमधील गुन्हेगारीने पुन्हा एकदा गंभीर घटनांचा कळस गाठल्याने परिसरातील नागरिकांमध्ये अजूनही भीतीचे वातावरण आहे. मागील काही महिन्यांपासून पंचवटीत सराईत गुन्हेगारांच्या झालेल्या हत्यांमुळे टोळ्यांमधील अंतर्गत संघर्ष उफाळून आल्याचे दिसून येते. याचे गंभीर परिणाम आगामी काळात होऊ शकतात अशी भीती परिसरातील नागरिक व्यक्त करीत आहेत. रेकॉर्डवरील गुन्हेगार खुलेआम परिसरात फिरत असतानाही पोलिसांकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप येथील नागरिक करीत आहेत. (वार्ताहर)