शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

खून प्रकरणी आठ संशयितांना अटक

By admin | Updated: April 29, 2017 02:04 IST

पंचवटी : सराईत गुन्हेगार अजित शशिकांत खिच्ची (२८) याची पूर्ववैमनस्यातून धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याची घटना घडली़.

 पंचवटी : दिंडोरीरोडवरील अवधूतवाडी (गजानन चौक) परिसरात गुरुवारी (दि. २७) सराईत गुन्हेगार अजित शशिकांत खिच्ची (२८) याची पूर्ववैमनस्यातून धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याची घटना घडली़ याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी आठ संशयितांना ताब्यात घेतले असून, त्यामध्ये पाच विधिसंघर्षित बालकांचा समावेश आहे. गजानन प्रिंटर्ससमोर गुरुवारी रात्री संशयितांनी सराईत खिच्ची याच्यावर धारदार शस्त्राने वार केले़ खिच्ची याच्या अंगावर, पोटावर जखमा झाल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडला़ या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी खिच्ची यास उपचारासाठी शासकीय रुग्णालयात हलविले़ मात्र, उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला़ या घटनेनंतर पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक पोलीस आयुक्त विजयकुमार चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.खिच्ची याच्यावर हल्ला करणारे संशयित पसार झाल्याने गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार आप्पा गवळी, मोतीराम चव्हाण, सतीश वसावे, सचिन म्हस्दे, जितू जाधव यांनी तपासचक्रे फिरवून संशयित आकाश प्रभाकर मोहिते (१९, रा़ अंबिकानगर), सागर पवार (१९, फुलेनगर), अक्षय राजेंद्र निकम (२१, गजानन चौक, अवधूतवाडी) यांच्यासह पाच विधिसंघर्षित बालकांसह आठ संशयितांना अटक केली़संशयित व खिच्ची यांच्यात काही दिवसांपूर्वी वाद झाले होते. या वादानंतर गुरुवारी भराडवाडीत पुन्हा खिच्ची व संशयित यांच्यात वाद झाले व त्यांनी खिच्चीवर धारदार शस्त्राने वार करून हत्या केली़ याप्रकरणी मंगेश बागुल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयितांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुनील पुजारी, सहायक पोलीस निरीक्षक कैलास वाघ तपास करीत आहेत.दरम्यान, पंचवटी परिसरातील झोपडपट्टीमधील गुन्हेगारीने पुन्हा एकदा गंभीर घटनांचा कळस गाठल्याने परिसरातील नागरिकांमध्ये अजूनही भीतीचे वातावरण आहे. मागील काही महिन्यांपासून पंचवटीत सराईत गुन्हेगारांच्या झालेल्या हत्यांमुळे टोळ्यांमधील अंतर्गत संघर्ष उफाळून आल्याचे दिसून येते. याचे गंभीर परिणाम आगामी काळात होऊ शकतात अशी भीती परिसरातील नागरिक व्यक्त करीत आहेत. रेकॉर्डवरील गुन्हेगार खुलेआम परिसरात फिरत असतानाही पोलिसांकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप येथील नागरिक करीत आहेत. (वार्ताहर)