शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
2
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
3
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
4
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
5
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
6
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
7
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
8
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
9
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
10
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
11
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
12
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
13
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
14
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
15
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
16
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
17
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
18
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
19
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
20
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला

नामपूरला आठ दिवसाआड पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 22:34 IST

नामपूर : मोसम नदीपात्रातून सतत होणारा वाळू उपसा अन् तपमानाच्या वाढलेल्या पाऱ्यामुळे भूजल पातळीत कमालीची घट होऊन विहिरी आटल्याने शहराला तब्बल आठ ते नऊ दिवसांआड पाणीपुरवठा होत असल्याने नामपूरकरांना भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. पाण्यासाठी दाहीदिशा वणवण भटकण्याची वेळ महिलांवर येऊन ठेपली आहे.एकेकाळचा सुजलाम सुफलाम मोसम पट्टा आज प्रचंड ...

ठळक मुद्देभीषण पाणीटंचाई पाण्यासाठी महिलांची दूरवर भटकंती

नामपूर : मोसम नदीपात्रातून सतत होणारा वाळू उपसा अन् तपमानाच्या वाढलेल्या पाऱ्यामुळे भूजल पातळीत कमालीची घट होऊन विहिरी आटल्याने शहराला तब्बल आठ ते नऊ दिवसांआड पाणीपुरवठा होत असल्याने नामपूरकरांना भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. पाण्यासाठी दाहीदिशा वणवण भटकण्याची वेळ महिलांवर येऊन ठेपली आहे.एकेकाळचा सुजलाम सुफलाम मोसम पट्टा आज प्रचंड वाळू उपशामुळे रख्ख वाळवंटात रूपांतरित होताना दिसत असून, सुपीक जमीन पाण्याअभावी नापेर होत आहे. या प्रचंड वाळू उपशाचा परिणाम म्हणजे शेतमालक आता शेतमजूर झालेले दिसत आहेत. मोसम नदीपात्रातून होणारा बेसुमार अवैध वाळू उपसा शहरातील पाणीटंचाईचे प्रमुख कारण आहे. प्रशासन वाळूचोरी रोखण्यात अपयशी ठरल्याने पाणीटंचाईची धग दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत प्रशासनाने शहरात टँकर्सद्वारा पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.मोसम खोºयाची प्रमुख व्यापारी बाजारपेठ असल्याने शहराच्या लोकसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. वाढत्या लोकसंख्येनुसार पाण्याची समस्याही दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. सार्वजनिक पाणीपुरवठा वितरणासाठी आजही १९७२च्या कालबाह्य अशा जुन्या पाणीपुरवठा योजनेचा आधार घ्यावा लागत आहे. सार्वजनिक पाणीपुरवठा करणाºया बहुतांश विहिरी मोसम नदीपात्रालगत आहेत. परंतु महसूल व पोलीस प्रशासनाच्या मैत्रीमुळे रात्रीच्या वेळी येथीलनदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असल्याने भूजल पातळीत कमालीची घट झाली आहे. विशेषत: सार्वजनिक पाणीपुरवठा करणाºया विहिरीजवळ वाळूचा उपसा होत असल्याने नामपूरकरांना भीषण पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत.मोसम नदीपात्रातून वाळू उपसण्याचा परिणामनामपूर शहर हे नवीन तालुका निर्मितीत वेटिंग लिस्टला अग्रक्र मातील गाव. येथे पाणीप्रश्नातील तीव्रतेत वाळू उपसा हे मुख्य कारण आहे. द्यानेकरांनी आंदोलन केले तेव्हापासून वाळू उपसून ट्रॅक्टरने वाहतूक करणे काही प्रमाणात कमी झाले असले, तरी आता यासाठी गाढवांचा वापर सुरू आहे. अजूनही प्रचंड प्रमाणात वाळू उपसा होऊन शेकडोंच्या संख्येने असलेल्या या गाढवांद्वारे या वाळूची वाहतूक केली जाते. भल्या पहाटेपासून सुरू होणारा हा प्रकार रात्री उशिरापर्यंत सुरू असतो. नदीपात्रात उघडे खडक व मोठाले खड्डे हे वाळू उपशाचे नदीपात्रातील पुरावे आहेत. गावातील बांधकामांसाठी वाळू लागते या कारणातून रात्री-अपरात्री ही वाळू बाहेरगावीही पाठविली जाते. वाळूच्या चोरट्या वाहतुकीमुळे सर्वत्र खडकांचे साम्राज्य पाहायला मिळते. वाळूचोरट्यांनी मोसम नदी अक्षरश: बकाल करून टाकली आहे. साक्री रस्त्यालगत असलेल्या पुलाखालची वाळूदेखील या चोरांच्या नजरेतून सुटलेली नाही. पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर २०१६ मध्ये आमदार दीपिका चव्हाण यांनी जीवन प्राधिकरणच्या अधिकाºयांसोबत बैठक घेऊन हरणबारी धरणातून टँकर्सद्वारा शहराला पाणीपुरवठा केला होता. त्या धर्तीवर यंदाही हरणबारी धरणातून टँकर्सद्वारा पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.