शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

नामपूरला आठ दिवसाआड पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 22:34 IST

नामपूर : मोसम नदीपात्रातून सतत होणारा वाळू उपसा अन् तपमानाच्या वाढलेल्या पाऱ्यामुळे भूजल पातळीत कमालीची घट होऊन विहिरी आटल्याने शहराला तब्बल आठ ते नऊ दिवसांआड पाणीपुरवठा होत असल्याने नामपूरकरांना भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. पाण्यासाठी दाहीदिशा वणवण भटकण्याची वेळ महिलांवर येऊन ठेपली आहे.एकेकाळचा सुजलाम सुफलाम मोसम पट्टा आज प्रचंड ...

ठळक मुद्देभीषण पाणीटंचाई पाण्यासाठी महिलांची दूरवर भटकंती

नामपूर : मोसम नदीपात्रातून सतत होणारा वाळू उपसा अन् तपमानाच्या वाढलेल्या पाऱ्यामुळे भूजल पातळीत कमालीची घट होऊन विहिरी आटल्याने शहराला तब्बल आठ ते नऊ दिवसांआड पाणीपुरवठा होत असल्याने नामपूरकरांना भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. पाण्यासाठी दाहीदिशा वणवण भटकण्याची वेळ महिलांवर येऊन ठेपली आहे.एकेकाळचा सुजलाम सुफलाम मोसम पट्टा आज प्रचंड वाळू उपशामुळे रख्ख वाळवंटात रूपांतरित होताना दिसत असून, सुपीक जमीन पाण्याअभावी नापेर होत आहे. या प्रचंड वाळू उपशाचा परिणाम म्हणजे शेतमालक आता शेतमजूर झालेले दिसत आहेत. मोसम नदीपात्रातून होणारा बेसुमार अवैध वाळू उपसा शहरातील पाणीटंचाईचे प्रमुख कारण आहे. प्रशासन वाळूचोरी रोखण्यात अपयशी ठरल्याने पाणीटंचाईची धग दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत प्रशासनाने शहरात टँकर्सद्वारा पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.मोसम खोºयाची प्रमुख व्यापारी बाजारपेठ असल्याने शहराच्या लोकसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. वाढत्या लोकसंख्येनुसार पाण्याची समस्याही दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. सार्वजनिक पाणीपुरवठा वितरणासाठी आजही १९७२च्या कालबाह्य अशा जुन्या पाणीपुरवठा योजनेचा आधार घ्यावा लागत आहे. सार्वजनिक पाणीपुरवठा करणाºया बहुतांश विहिरी मोसम नदीपात्रालगत आहेत. परंतु महसूल व पोलीस प्रशासनाच्या मैत्रीमुळे रात्रीच्या वेळी येथीलनदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असल्याने भूजल पातळीत कमालीची घट झाली आहे. विशेषत: सार्वजनिक पाणीपुरवठा करणाºया विहिरीजवळ वाळूचा उपसा होत असल्याने नामपूरकरांना भीषण पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत.मोसम नदीपात्रातून वाळू उपसण्याचा परिणामनामपूर शहर हे नवीन तालुका निर्मितीत वेटिंग लिस्टला अग्रक्र मातील गाव. येथे पाणीप्रश्नातील तीव्रतेत वाळू उपसा हे मुख्य कारण आहे. द्यानेकरांनी आंदोलन केले तेव्हापासून वाळू उपसून ट्रॅक्टरने वाहतूक करणे काही प्रमाणात कमी झाले असले, तरी आता यासाठी गाढवांचा वापर सुरू आहे. अजूनही प्रचंड प्रमाणात वाळू उपसा होऊन शेकडोंच्या संख्येने असलेल्या या गाढवांद्वारे या वाळूची वाहतूक केली जाते. भल्या पहाटेपासून सुरू होणारा हा प्रकार रात्री उशिरापर्यंत सुरू असतो. नदीपात्रात उघडे खडक व मोठाले खड्डे हे वाळू उपशाचे नदीपात्रातील पुरावे आहेत. गावातील बांधकामांसाठी वाळू लागते या कारणातून रात्री-अपरात्री ही वाळू बाहेरगावीही पाठविली जाते. वाळूच्या चोरट्या वाहतुकीमुळे सर्वत्र खडकांचे साम्राज्य पाहायला मिळते. वाळूचोरट्यांनी मोसम नदी अक्षरश: बकाल करून टाकली आहे. साक्री रस्त्यालगत असलेल्या पुलाखालची वाळूदेखील या चोरांच्या नजरेतून सुटलेली नाही. पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर २०१६ मध्ये आमदार दीपिका चव्हाण यांनी जीवन प्राधिकरणच्या अधिकाºयांसोबत बैठक घेऊन हरणबारी धरणातून टँकर्सद्वारा शहराला पाणीपुरवठा केला होता. त्या धर्तीवर यंदाही हरणबारी धरणातून टँकर्सद्वारा पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.