शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
5
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
6
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
7
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
8
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
9
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
10
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
11
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
12
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
13
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
14
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
15
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
16
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
17
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
18
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
19
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
20
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण

जिल्ह्यातील आठ धरणे ओव्हरफ्लो!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 01:22 IST

नाशिक : शनिवारपासून पुनरागमन झालेल्या पावसामुळे जिल्ह्णातील आठ धरणे ओव्हरफ्लो झाली असून, गंगापूर, दारणा, वाघाड, भावली या धरणांमधून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. जिल्ह्णातील अन्य धरणांमध्ये सरासरी ७८ टक्के पाणीसाठा झाला असला तरी, गेल्या वर्षाच्या तुलनेत तो कमीच आहे.गेल्या दोन दिवसांत जिल्ह्णात सर्व दूर पावसाने हजेरी लावल्यामुळे  शेतकरी वर्गात आनंद ...

नाशिक : शनिवारपासून पुनरागमन झालेल्या पावसामुळे जिल्ह्णातील आठ धरणे ओव्हरफ्लो झाली असून, गंगापूर, दारणा, वाघाड, भावली या धरणांमधून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. जिल्ह्णातील अन्य धरणांमध्ये सरासरी ७८ टक्के पाणीसाठा झाला असला तरी, गेल्या वर्षाच्या तुलनेत तो कमीच आहे.गेल्या दोन दिवसांत जिल्ह्णात सर्व दूर पावसाने हजेरी लावल्यामुळे  शेतकरी वर्गात आनंद व्यक्त केला जात असून, नदी, नाले दुथडी भरून वाहू लागले आहे. काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाल्याने धोक्याचा इशाराही देण्यात आला आहे. विशेष करून त्र्यंबकेश्वर येथे तुफान पर्जन्यवृष्टी झाल्याने गोदावरीचे पाणी शहरात शिरून जनजीवन विस्कळीत झाले तसेच नदी काठच्या व्यावसायिकांनाही नुकसान सोसावे लागले आहे. त्र्यंबकेश्वरच्या पावसामुळे नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरणाच्या साठ्यात पाच टक्क्याने वाढ झाली आहे. त्याचबरोबर कश्यपी, गौतमी गोदावरी हे धरणेही काठोकाठ भरली असून, आळंदी धरणात शंभर टक्के साठा झाल्याने त्यातून पाणी सोडण्यात येत आहे. गंगापूर धरण समुहात ९५ टक्के पाणीसाठा आहे. या पावसामुळे जिल्ह्णातील लहान-मोठे अशा २४ धरणांपैकी आठ धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. त्यात आळंदी, वाघाड, ओझरखेड, भावली, वालदेवी, भोजापूर, हरणबारी, केळझर या धरणांचा समावेश आहे. धरणे भरल्यामुळे नद्यांमध्ये त्याचे पाणी सोडण्यात आले आहे. पालखेड धरण समूहात ९६ टक्के, तर गिरणा धरण समूहात ७८ टक्के पाणी साठले आहे. जिल्ह्णातील अन्य धरणांमध्ये ८० ते ९० टक्के पाणी असले तरी, पूर्व भागाकडे पावसाने वक्रदृष्टी केल्याने गिरणा धरणात ५२ टक्केच पाणी शिल्लक आहे. गेल्या वर्षी जिल्ह्णातील धरणांमध्ये ५२,१७७ दशलक्ष घनफूट इतके म्हणजे ७९ टक्के पाणी होते, यंदा ५१,५९९ दशलक्ष घनफूट इतके पाणी साठले असून, त्याची टक्केवारी ७८ इतकी आहे.सात धरणांतून विसर्गपावसाच्या संततधारेमुळे व धरण साठ्यात कमालीची वाढ झाल्याने जिल्ह्णातील गंगापूरसह सात धरणांमधून विसर्ग करण्यात येत आहे. त्यात गंगापूरमधून ३२१४, दारणा- १८५०, वालदेवी- १०५०, कडवा- २३२८, आळंदी- ६८७, पालखेड- १२०० क्यूसेक पाणी सोडण्यात आले असून, नांदूरमधमेश्वरमधून ३२,६९० क्यूसेक इतका विसर्ग मराठवाडा, नगरकडे सुरू आहे.जायकवाडीला ४५ टीएमसी पाणीनाशिक जिल्ह्णात जून व जुलै या दोन महिन्यांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने धरणे चांगली भरली. गोदावरी, दारणा, कडवा या धरणांचा संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रशासनाने वेळोवेळी पाणी सोडण्यात आल्याने आजपावेतो मराठवाड्यातील जायकवाडी धरणासाठी ४५ टीएमसी इतके पाणी पोहोचले आहे. रविवारी सकाळपासून गंगापूरमधून पाणी सोडल्याने तीन टीएमसी पाणी सोमवारी दुपारपर्यंत रवाना करण्यात आले आहे. जायकवाडी धरणाची क्षमता ८० टीएमसी इतकी असून, त्यापैकी निम्म्याहून अधिक पाणी नाशिक जिल्ह्णातूनच रवाना झाल्याने धरणात ५६ टक्के पाणी साठा आहे.