शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

सेंद्रिय पद्धतीने घेतले भरघोस डाळिंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 00:26 IST

​​​​​​​जिरायत शेती, पारंपरिक पिकांचा वर्षानुवर्षे पगडा, उत्पादन कमी अन् खर्च अधिक अशा प्रतिकूल परिस्थितीत नियोजन करून व आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत येवला तालुक्यातील आडगाव रेपाळ येथील ज्ञानेश्वर महाले व आनंदराव महाले या पितापुत्रांनी कृषी अधिकाºयांच्या मार्गदर्शनातून सेंद्रिय पद्धतीने दीड एकर डाळिंब बागाची जोपासना करून भरपूर उत्पन्न घेत वर्षाकाठी सात ते आठ लाखाचा निव्वळ नफा कमवून परिसरातील शेतकºयांपुढे नवा पर्याय उभा केला आहे.

गोरख घुसळेजिरायत शेती, पारंपरिक पिकांचा वर्षानुवर्षे पगडा, उत्पादन कमी अन् खर्च अधिक अशा प्रतिकूल परिस्थितीत नियोजन करून व आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत येवला तालुक्यातील आडगाव रेपाळ येथील ज्ञानेश्वर महाले व आनंदराव महाले या पितापुत्रांनी कृषी अधिकाºयांच्या मार्गदर्शनातून सेंद्रिय पद्धतीने दीड एकर डाळिंब बागाची जोपासना करून भरपूर उत्पन्न घेत वर्षाकाठी सात ते आठ लाखाचा निव्वळ नफा कमवून परिसरातील शेतकºयांपुढे नवा पर्याय उभा केला आहे.  आनंदराव महाले यांनी २०१० मध्ये आपल्या शेतात दीड एकर सेंद्र्या जातीच्या डाळिंब बागाची लागवड केली. त्यात सुमारे ४५० झाडे आहेत. त्यापूर्वी महाले आपल्या शेतात हंगामी पिके घेत असत. डाळिंबबाग लावण्याचा निर्णय घेतल्यानंतर महाले यांनी कृषी अधिकारी हितेंद्र पगार यांचे मार्गदर्शन घेतले. त्यांनी केलेल्या मार्गदर्शनातून ही सेंद्रिय पद्धतीची बाग उभी राहिली. दोन वर्षानंतर प्रत्यक्ष उत्पन्न सुरू झाले. पहिल्यावर्षी खर्च वजा जाता दोन लाख, दुसºया वर्षी तीन लाख, तिसºया वर्षी तीन लाख, चौथ्या वर्षी एक लाख, पाचव्या वर्षी पाच लाख असा नफा महाले यांना झाला आहे. मागील वर्षी परिसरातील शेकडो एकर डाळिंबबागांवर तेल्या रोगाचे अतिक्रमण झाल्याने परिसरातील शेतकºयांनी बागा तोडून टाकल्या आहे. मात्र अशाही परिस्थितीत महाले यांनी जैविक खते, गोमूत्र, जीव अमृत यांची फवारणी करून बाग सुस्थितीत ठेवून खर्च वजा जाता एक लाखाचा नफा मिळवला आहे.  महाले हे आपल्या दीड एकर डाळिंबबागेसाठी सुमारे १५ शेणखत, जैविक खते, निंबोळी पेंड १५० किलो, जीव अमृत म्हणजेच शेणाची रबडी व गोमूत्र एकत्र करून दर पंधरा दिवसांनी झाडांना टाकले जाते. तसेच दशपर्णी अर्क, गोमूत्र व गूळ यांची फवारणी केली जाते. यामुळे फळाची फुगवन होते. सुरुवातीस पानगळ करण्यासाठी दशपर्णी अर्क, गोमूत्र व गूळ नंतर बोर्डोची फवारणी दर पंधरा दिवसांनी केली. यामुळे तेल्या व बुरशीजन्य रोग नष्ट करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. त्याचप्रमाणे निमतेल, करंज तेल यांची दर पंधरा दिवसांनी फवारणी केली जाते.  महाले हे मजुरांवर अवलंबून न राहता घरातील सदस्यांना सोबत घेऊन स्वत: कष्ट करीत आहेत. मागील वर्षी परिसरात भयाण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने बागेला पाणी देणे अवघड होऊन बसले होते. अशाही परिस्थितीत महाले यांनी सुमारे चार - पाच महिने सुमारे पंधरा - वीस किलोमीटरवरून विकत पाणी आणून बाग जगविली आहे.

 

टॅग्स :Farmerशेतकरी