शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

सेंद्रिय पद्धतीने घेतले भरघोस डाळिंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 00:26 IST

​​​​​​​जिरायत शेती, पारंपरिक पिकांचा वर्षानुवर्षे पगडा, उत्पादन कमी अन् खर्च अधिक अशा प्रतिकूल परिस्थितीत नियोजन करून व आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत येवला तालुक्यातील आडगाव रेपाळ येथील ज्ञानेश्वर महाले व आनंदराव महाले या पितापुत्रांनी कृषी अधिकाºयांच्या मार्गदर्शनातून सेंद्रिय पद्धतीने दीड एकर डाळिंब बागाची जोपासना करून भरपूर उत्पन्न घेत वर्षाकाठी सात ते आठ लाखाचा निव्वळ नफा कमवून परिसरातील शेतकºयांपुढे नवा पर्याय उभा केला आहे.

गोरख घुसळेजिरायत शेती, पारंपरिक पिकांचा वर्षानुवर्षे पगडा, उत्पादन कमी अन् खर्च अधिक अशा प्रतिकूल परिस्थितीत नियोजन करून व आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत येवला तालुक्यातील आडगाव रेपाळ येथील ज्ञानेश्वर महाले व आनंदराव महाले या पितापुत्रांनी कृषी अधिकाºयांच्या मार्गदर्शनातून सेंद्रिय पद्धतीने दीड एकर डाळिंब बागाची जोपासना करून भरपूर उत्पन्न घेत वर्षाकाठी सात ते आठ लाखाचा निव्वळ नफा कमवून परिसरातील शेतकºयांपुढे नवा पर्याय उभा केला आहे.  आनंदराव महाले यांनी २०१० मध्ये आपल्या शेतात दीड एकर सेंद्र्या जातीच्या डाळिंब बागाची लागवड केली. त्यात सुमारे ४५० झाडे आहेत. त्यापूर्वी महाले आपल्या शेतात हंगामी पिके घेत असत. डाळिंबबाग लावण्याचा निर्णय घेतल्यानंतर महाले यांनी कृषी अधिकारी हितेंद्र पगार यांचे मार्गदर्शन घेतले. त्यांनी केलेल्या मार्गदर्शनातून ही सेंद्रिय पद्धतीची बाग उभी राहिली. दोन वर्षानंतर प्रत्यक्ष उत्पन्न सुरू झाले. पहिल्यावर्षी खर्च वजा जाता दोन लाख, दुसºया वर्षी तीन लाख, तिसºया वर्षी तीन लाख, चौथ्या वर्षी एक लाख, पाचव्या वर्षी पाच लाख असा नफा महाले यांना झाला आहे. मागील वर्षी परिसरातील शेकडो एकर डाळिंबबागांवर तेल्या रोगाचे अतिक्रमण झाल्याने परिसरातील शेतकºयांनी बागा तोडून टाकल्या आहे. मात्र अशाही परिस्थितीत महाले यांनी जैविक खते, गोमूत्र, जीव अमृत यांची फवारणी करून बाग सुस्थितीत ठेवून खर्च वजा जाता एक लाखाचा नफा मिळवला आहे.  महाले हे आपल्या दीड एकर डाळिंबबागेसाठी सुमारे १५ शेणखत, जैविक खते, निंबोळी पेंड १५० किलो, जीव अमृत म्हणजेच शेणाची रबडी व गोमूत्र एकत्र करून दर पंधरा दिवसांनी झाडांना टाकले जाते. तसेच दशपर्णी अर्क, गोमूत्र व गूळ यांची फवारणी केली जाते. यामुळे फळाची फुगवन होते. सुरुवातीस पानगळ करण्यासाठी दशपर्णी अर्क, गोमूत्र व गूळ नंतर बोर्डोची फवारणी दर पंधरा दिवसांनी केली. यामुळे तेल्या व बुरशीजन्य रोग नष्ट करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. त्याचप्रमाणे निमतेल, करंज तेल यांची दर पंधरा दिवसांनी फवारणी केली जाते.  महाले हे मजुरांवर अवलंबून न राहता घरातील सदस्यांना सोबत घेऊन स्वत: कष्ट करीत आहेत. मागील वर्षी परिसरात भयाण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने बागेला पाणी देणे अवघड होऊन बसले होते. अशाही परिस्थितीत महाले यांनी सुमारे चार - पाच महिने सुमारे पंधरा - वीस किलोमीटरवरून विकत पाणी आणून बाग जगविली आहे.

 

टॅग्स :Farmerशेतकरी