शहरं
Join us  
Trending Stories
1
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
2
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
5
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
6
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
7
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
8
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
9
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
10
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
11
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
12
मृणाल ठाकूरच नाही धनुषचं 'या' अभिनेत्रींसोबतही जोडलं होतं नाव, एक तर सुपरस्टारची लेक
13
Asia Cup 2025 : 'विराट' स्वप्न साकार करणाऱ्या या भिडूवर गंभीर भरवसा दाखवणार?
14
मुकेश अंबानींचा पगार किती? आकडा वाचून विश्वास बसणार नाही, ५ वर्षांपासून एकदाही बदल नाही!
15
बापरे! आई-वडिलांच्या एका छोट्याशा चुकीचा मुलांना त्रास, चेहऱ्यावर पडतात पांढरे डाग
16
Video: २५ हजार कमावतो, १० तर भाडेच भरतो...; सैयाराच्या गाण्याचे कार्पोरेट व्हर्जन लोकांच्या काळजाला भिडले...
17
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
18
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
19
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
20
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली

सेंद्रिय पद्धतीने घेतले भरघोस डाळिंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 00:26 IST

​​​​​​​जिरायत शेती, पारंपरिक पिकांचा वर्षानुवर्षे पगडा, उत्पादन कमी अन् खर्च अधिक अशा प्रतिकूल परिस्थितीत नियोजन करून व आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत येवला तालुक्यातील आडगाव रेपाळ येथील ज्ञानेश्वर महाले व आनंदराव महाले या पितापुत्रांनी कृषी अधिकाºयांच्या मार्गदर्शनातून सेंद्रिय पद्धतीने दीड एकर डाळिंब बागाची जोपासना करून भरपूर उत्पन्न घेत वर्षाकाठी सात ते आठ लाखाचा निव्वळ नफा कमवून परिसरातील शेतकºयांपुढे नवा पर्याय उभा केला आहे.

गोरख घुसळेजिरायत शेती, पारंपरिक पिकांचा वर्षानुवर्षे पगडा, उत्पादन कमी अन् खर्च अधिक अशा प्रतिकूल परिस्थितीत नियोजन करून व आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत येवला तालुक्यातील आडगाव रेपाळ येथील ज्ञानेश्वर महाले व आनंदराव महाले या पितापुत्रांनी कृषी अधिकाºयांच्या मार्गदर्शनातून सेंद्रिय पद्धतीने दीड एकर डाळिंब बागाची जोपासना करून भरपूर उत्पन्न घेत वर्षाकाठी सात ते आठ लाखाचा निव्वळ नफा कमवून परिसरातील शेतकºयांपुढे नवा पर्याय उभा केला आहे.  आनंदराव महाले यांनी २०१० मध्ये आपल्या शेतात दीड एकर सेंद्र्या जातीच्या डाळिंब बागाची लागवड केली. त्यात सुमारे ४५० झाडे आहेत. त्यापूर्वी महाले आपल्या शेतात हंगामी पिके घेत असत. डाळिंबबाग लावण्याचा निर्णय घेतल्यानंतर महाले यांनी कृषी अधिकारी हितेंद्र पगार यांचे मार्गदर्शन घेतले. त्यांनी केलेल्या मार्गदर्शनातून ही सेंद्रिय पद्धतीची बाग उभी राहिली. दोन वर्षानंतर प्रत्यक्ष उत्पन्न सुरू झाले. पहिल्यावर्षी खर्च वजा जाता दोन लाख, दुसºया वर्षी तीन लाख, तिसºया वर्षी तीन लाख, चौथ्या वर्षी एक लाख, पाचव्या वर्षी पाच लाख असा नफा महाले यांना झाला आहे. मागील वर्षी परिसरातील शेकडो एकर डाळिंबबागांवर तेल्या रोगाचे अतिक्रमण झाल्याने परिसरातील शेतकºयांनी बागा तोडून टाकल्या आहे. मात्र अशाही परिस्थितीत महाले यांनी जैविक खते, गोमूत्र, जीव अमृत यांची फवारणी करून बाग सुस्थितीत ठेवून खर्च वजा जाता एक लाखाचा नफा मिळवला आहे.  महाले हे आपल्या दीड एकर डाळिंबबागेसाठी सुमारे १५ शेणखत, जैविक खते, निंबोळी पेंड १५० किलो, जीव अमृत म्हणजेच शेणाची रबडी व गोमूत्र एकत्र करून दर पंधरा दिवसांनी झाडांना टाकले जाते. तसेच दशपर्णी अर्क, गोमूत्र व गूळ यांची फवारणी केली जाते. यामुळे फळाची फुगवन होते. सुरुवातीस पानगळ करण्यासाठी दशपर्णी अर्क, गोमूत्र व गूळ नंतर बोर्डोची फवारणी दर पंधरा दिवसांनी केली. यामुळे तेल्या व बुरशीजन्य रोग नष्ट करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. त्याचप्रमाणे निमतेल, करंज तेल यांची दर पंधरा दिवसांनी फवारणी केली जाते.  महाले हे मजुरांवर अवलंबून न राहता घरातील सदस्यांना सोबत घेऊन स्वत: कष्ट करीत आहेत. मागील वर्षी परिसरात भयाण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने बागेला पाणी देणे अवघड होऊन बसले होते. अशाही परिस्थितीत महाले यांनी सुमारे चार - पाच महिने सुमारे पंधरा - वीस किलोमीटरवरून विकत पाणी आणून बाग जगविली आहे.

 

टॅग्स :Farmerशेतकरी