शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
4
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
5
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
6
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
7
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
8
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
9
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
10
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
11
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
12
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
13
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
14
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
16
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
17
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
18
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
19
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
20
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे

ग्रामीण भागात नवीन रुग्णवाहिकांसाठी प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2020 11:32 PM

नाशिक : जिल्ह्यातील ग्रामीण भागात वेळेवर डॉक्टर तसेच रुग्णवाहिका उपलब्ध नसणे, औषध उपचार न होणे या विषयावर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत गरमागरम चर्चा झाली. त्यावर मानव विकास व नावीन्यपूर्ण योजनेतून ग्रामीण भागासाठी नवीन रुग्णवाहिका घेण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिले. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत आरोग्य विभागासाठी औषध खरेदीच्या विषयावर चर्चेत सहभागी होताना अनेक सदस्यांनी आरोग्य विभागाच्या कामकाजावर तक्रारी केल्या.

ठळक मुद्देलीना बनसोड : जिल्हा परिषद सदस्यांनी वाचला गाºहाण्यांचा पाढा

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्ह्यातील ग्रामीण भागात वेळेवर डॉक्टर तसेच रुग्णवाहिका उपलब्ध नसणे, औषध उपचार न होणे या विषयावर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत गरमागरम चर्चा झाली. त्यावर मानव विकास व नावीन्यपूर्ण योजनेतून ग्रामीण भागासाठी नवीन रुग्णवाहिका घेण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिले. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत आरोग्य विभागासाठी औषध खरेदीच्या विषयावर चर्चेत सहभागी होताना अनेक सदस्यांनी आरोग्य विभागाच्या कामकाजावर तक्रारी केल्या.रुग्णालयातील डॉक्टर स्वत: क्वारंटाइन झाल्यावर पर्यायी वैद्यकीय अधिकारी नेमला जात नाही, उलट आरोग्य केंद्र बंद ठेवण्यात येते, त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असल्याची तक्रार करण्यात आली.रुपांजली माळेकर, आत्माराम कुंभारडे, भास्कर गावित, नूतन आहेर आदींनी एनआरएचएमवर झालेल्या खर्चाची माहिती मिळत नसल्याचे सांगून, सर्व कामांची चौकशी करावी व मगच देयके अदा करावी, अशी मागणी केली. यावेळी सदस्यांच्या भावना लक्षात घेऊन, मुख्य कार्यकारी अधिकारी बनसोड यांनी १०८ रुग्णवाहिकेचे नियंत्रण जिल्हाधिकारी यांच्याकडे आहे व त्यांना त्यांचा मार्ग ठरवून देण्यात आला आहे. जिल्ह्यासाठी ४३ रुग्णवाहिका असल्या तरी त्या अपुऱ्या पडत असल्याने त्यावर उपाय म्हणून काही खासगी रुग्णालयाच्या रुग्णवाहिका अधिग्रहित करण्यात येतील तसेच, मानव विकास व नावीन्यपूर्ण योजनेतून नवीन रुग्णवाहिका घेण्याचा प्रस्ताव सादर केला जाईल असे सांगितले. राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या कामाबाबत सदस्यांच्या असलेल्या तक्रारी विचारात घेऊन, लवकरच आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येईल व त्यात ज्या सदस्यांची तक्रार आहे त्यांना पाचारण करण्यात येणार असल्याचे सांगितले.लॉकडाऊनच्या काळात ५० लाखांची कामे या सभेत नूतन आहेर, सिद्धार्थ वणारसे यांनी मार्च महिन्यात लॉकडाऊन असताना एका विशिष्ट गटात ५० लाखांची सेस निधीचे कामे कशी केली गेली असा प्रश्न विचारला. या कामांना कोणी मंजुरी दिली, कोणाच्या परवानगीने कामे झाली आणि एका महिन्यात ५० लाखांची कामे लॉकडाऊनमध्ये सर्व बंद असताना कसे पूर्ण झाले अशा प्रश्नांची सरबत्ती केली. याच अनुषंगाने आहेर यांनी देवळा नगर पंचायत क्षेत्रात काम सुरू असताना सदस्य म्हणून आपल्याला काहीच माहिती देण्यात आली नसल्याचे सांगून या सर्व कामांची चौकशी करावी, अशी मागणी केली सर्पदंश झालेल्या रुग्णावर उपचार करण्यास नकार देणे, कोरोनाबाधित रुग्णाला नेण्यासाठी रुग्णवाहिका नसणे हे प्रकार सातत्याने घडत असून, १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका संपर्क करूनही मिळत नसल्याची तक्रारही करण्यात आली. राष्ट्रीय हेल्थ मिशन व आरोग्यवर्धिनीअंतर्गत सारखेच कामे केली जात असून, दोन्ही कामांचे देयके काढली जात असल्याची तक्रार यावेळी अनेक सदस्यांनी केली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल