शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
2
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
3
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
4
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
5
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
6
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
7
प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...  
8
Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 
9
आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा
10
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका
11
नवऱ्यापासून सुटका झाली, पण घटस्फोटानंतर थायरॉइड कॅन्सरने जखडलं; अभिनेत्रीने सांगितला कठीण काळ
12
पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली, पण...
13
मध्यरात्री प्रियकरासोबत गुपचूप पळून चालली होती पत्नी, आवाज झाला अन् पती उठला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण... 
14
शिवसेना कुणाची? अखेर तारीख ठरली; सुप्रीम कोर्टात 'या' दिवशी होणार अंतिम सुनावणी
15
जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळणार? सरन्यायाधीश म्हणाले- पहलगामकडे दुर्लक्ष करू शकत नाही
16
अर्जुन तेंडुलकरची होणारी पत्नी चालवते आलिशान पेट सलून, कुत्र्यांना आंघोळ घालण्यासाठी घेते एवढे पैसे 
17
रॉकेट बनले Muthoot Finance कंपनीचे शेअर्स, १० टक्क्यांपेक्षा अधिक तेजी; टार्गेट प्राईजही वाढवली
18
छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी
19
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
20
कर भरण्याचे टेन्शन सोडा! आता फक्त २४ रुपयांमध्ये भरा इन्कम टॅक्स, कोणी आणली खास ऑफर?

कत्तलीपेक्षा गुन्हेगारांचीच ‘दक्षता’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 00:26 IST

‘खैर’ तोडीचा तपास भरकटला; पथकाला लागेना तस्करांचा सुगावा नाशिक : मालेगाव उपवनविभागाच्या हद्दीतील ८० ते ९० हजार हेक्टरवरील जंगलात मोठ्या प्रमाणात ‘खैर’च्या वृक्षांची तस्करांच्या टोळीकडून कत्तल करण्यात आल्याचा गंभीर प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणला. यानंतर वनविभागाला खडबडून जाग आली. या गुन्ह्याच्या तपासासाठी स्वतंत्र दक्षता पथकाची नियुक्ती करण्यात आली; मात्र पंचनाम्यानंतर हे पथक भरकटले असून, अद्याप तस्करांचा सुगावा पथकाला लागलेला नाही. वृक्षांच्या कत्तलीमागे असलेल्या गुन्हेगारांची उपवनविभागाच्या अधिकाºयांकडून जणू ‘दक्षता’ घेतली जात असल्याची चर्चा सुरू आहे.

‘खैर’ तोडीचा तपास भरकटला; पथकाला लागेना तस्करांचा सुगावा

नाशिक : मालेगाव उपवनविभागाच्या हद्दीतील ८० ते ९० हजार हेक्टरवरील जंगलात मोठ्या प्रमाणात ‘खैर’च्या वृक्षांची तस्करांच्या टोळीकडून कत्तल करण्यात आल्याचा गंभीर प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणला. यानंतर वनविभागाला खडबडून जाग आली. या गुन्ह्याच्या तपासासाठी स्वतंत्र दक्षता पथकाची नियुक्ती करण्यात आली; मात्र पंचनाम्यानंतर हे पथक भरकटले असून, अद्याप तस्करांचा सुगावा पथकाला लागलेला नाही. वृक्षांच्या कत्तलीमागे असलेल्या गुन्हेगारांची उपवनविभागाच्या अधिकाºयांकडून जणू ‘दक्षता’ घेतली जात असल्याची चर्चा सुरू आहे.मालेगाव तालुक्यातील गाळणा, नागझिरी, पोहाणे, चिंचवे, तळवाडे, रामपुरा या गावांच्या शिवारात मोठ्या प्रमाणात जंगलाचे क्षेत्र आहे. या जंगलातील वृक्षसंपदा धोक्यात आली असून, गुजरातच्या गुटखा व्यवसायाशी खैर वृक्षांची कत्तल करणाºया टोळीचा या धुमाकूळ वाढला आहे. टोळीने काही नागरिकांना व वन कर्मचाºयांना हाताशी धरून खैर इलेक्ट्रॉनिक कटरने कापल्याचे उघडकीस आले आहे. पन्नास, शंभर नव्हे तर तब्बल पाचशेपेक्षा अधिक खैरांची झाडे कापून गुजरातमध्ये पाठविली. या गुन्ह्याचा तपास दक्षता पथकाकडून गुरुवारपासून (दि. १२) सुरू आहे. पथकाने दोन दिवसांमध्ये पंचनामा पूर्ण केला आणि अहवाल तयार केला; मात्र या गुन्ह्यात ज्यांचा सहभाग आहे अशा तस्करांच्या मुसक्या आवळण्यात अद्याप यश आले नाही. याबाबत तपास भरकटला असून, अद्याप एकालाही या गुन्ह्यात ताब्यात घेतलेले नाही.कापलेले बुंधे वनकर्मचाºयांनी बुजविल्याचा संशयकापलेल्या खैराच्या झाडांचे जमिनीपासूनचे बुंधे माती टाकून वन कर्मचाºयांनीच बुजविल्याचा संशय आहे. पंचनामा सुरू असताना सदर प्रकार तपास पथकाच्या निदर्शनास आल्याचेही बोलले जात आहे. मात्र ‘आपलेच दात आपलेच ओठ’ या म्हणीनुसार सध्या वनविभागाची अवस्था झाली आहे.पंचनाम्याच्या अहवालानंतर अद्याप मुख्य वनसंरक्षकांकडूनदेखील कुठल्याही प्रकारची ठोस कारवाई या प्रकरणी झाली नसून त्यांच्या कारवाईकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.