शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
3
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
4
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
5
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
6
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
7
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
8
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
9
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
10
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
11
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
12
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
13
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
14
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
15
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
17
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
18
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
19
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
20
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
Daily Top 2Weekly Top 5

कत्तलीपेक्षा गुन्हेगारांचीच ‘दक्षता’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 00:26 IST

‘खैर’ तोडीचा तपास भरकटला; पथकाला लागेना तस्करांचा सुगावा नाशिक : मालेगाव उपवनविभागाच्या हद्दीतील ८० ते ९० हजार हेक्टरवरील जंगलात मोठ्या प्रमाणात ‘खैर’च्या वृक्षांची तस्करांच्या टोळीकडून कत्तल करण्यात आल्याचा गंभीर प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणला. यानंतर वनविभागाला खडबडून जाग आली. या गुन्ह्याच्या तपासासाठी स्वतंत्र दक्षता पथकाची नियुक्ती करण्यात आली; मात्र पंचनाम्यानंतर हे पथक भरकटले असून, अद्याप तस्करांचा सुगावा पथकाला लागलेला नाही. वृक्षांच्या कत्तलीमागे असलेल्या गुन्हेगारांची उपवनविभागाच्या अधिकाºयांकडून जणू ‘दक्षता’ घेतली जात असल्याची चर्चा सुरू आहे.

‘खैर’ तोडीचा तपास भरकटला; पथकाला लागेना तस्करांचा सुगावा

नाशिक : मालेगाव उपवनविभागाच्या हद्दीतील ८० ते ९० हजार हेक्टरवरील जंगलात मोठ्या प्रमाणात ‘खैर’च्या वृक्षांची तस्करांच्या टोळीकडून कत्तल करण्यात आल्याचा गंभीर प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणला. यानंतर वनविभागाला खडबडून जाग आली. या गुन्ह्याच्या तपासासाठी स्वतंत्र दक्षता पथकाची नियुक्ती करण्यात आली; मात्र पंचनाम्यानंतर हे पथक भरकटले असून, अद्याप तस्करांचा सुगावा पथकाला लागलेला नाही. वृक्षांच्या कत्तलीमागे असलेल्या गुन्हेगारांची उपवनविभागाच्या अधिकाºयांकडून जणू ‘दक्षता’ घेतली जात असल्याची चर्चा सुरू आहे.मालेगाव तालुक्यातील गाळणा, नागझिरी, पोहाणे, चिंचवे, तळवाडे, रामपुरा या गावांच्या शिवारात मोठ्या प्रमाणात जंगलाचे क्षेत्र आहे. या जंगलातील वृक्षसंपदा धोक्यात आली असून, गुजरातच्या गुटखा व्यवसायाशी खैर वृक्षांची कत्तल करणाºया टोळीचा या धुमाकूळ वाढला आहे. टोळीने काही नागरिकांना व वन कर्मचाºयांना हाताशी धरून खैर इलेक्ट्रॉनिक कटरने कापल्याचे उघडकीस आले आहे. पन्नास, शंभर नव्हे तर तब्बल पाचशेपेक्षा अधिक खैरांची झाडे कापून गुजरातमध्ये पाठविली. या गुन्ह्याचा तपास दक्षता पथकाकडून गुरुवारपासून (दि. १२) सुरू आहे. पथकाने दोन दिवसांमध्ये पंचनामा पूर्ण केला आणि अहवाल तयार केला; मात्र या गुन्ह्यात ज्यांचा सहभाग आहे अशा तस्करांच्या मुसक्या आवळण्यात अद्याप यश आले नाही. याबाबत तपास भरकटला असून, अद्याप एकालाही या गुन्ह्यात ताब्यात घेतलेले नाही.कापलेले बुंधे वनकर्मचाºयांनी बुजविल्याचा संशयकापलेल्या खैराच्या झाडांचे जमिनीपासूनचे बुंधे माती टाकून वन कर्मचाºयांनीच बुजविल्याचा संशय आहे. पंचनामा सुरू असताना सदर प्रकार तपास पथकाच्या निदर्शनास आल्याचेही बोलले जात आहे. मात्र ‘आपलेच दात आपलेच ओठ’ या म्हणीनुसार सध्या वनविभागाची अवस्था झाली आहे.पंचनाम्याच्या अहवालानंतर अद्याप मुख्य वनसंरक्षकांकडूनदेखील कुठल्याही प्रकारची ठोस कारवाई या प्रकरणी झाली नसून त्यांच्या कारवाईकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.