शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

कत्तलीपेक्षा गुन्हेगारांचीच ‘दक्षता’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 00:26 IST

‘खैर’ तोडीचा तपास भरकटला; पथकाला लागेना तस्करांचा सुगावा नाशिक : मालेगाव उपवनविभागाच्या हद्दीतील ८० ते ९० हजार हेक्टरवरील जंगलात मोठ्या प्रमाणात ‘खैर’च्या वृक्षांची तस्करांच्या टोळीकडून कत्तल करण्यात आल्याचा गंभीर प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणला. यानंतर वनविभागाला खडबडून जाग आली. या गुन्ह्याच्या तपासासाठी स्वतंत्र दक्षता पथकाची नियुक्ती करण्यात आली; मात्र पंचनाम्यानंतर हे पथक भरकटले असून, अद्याप तस्करांचा सुगावा पथकाला लागलेला नाही. वृक्षांच्या कत्तलीमागे असलेल्या गुन्हेगारांची उपवनविभागाच्या अधिकाºयांकडून जणू ‘दक्षता’ घेतली जात असल्याची चर्चा सुरू आहे.

‘खैर’ तोडीचा तपास भरकटला; पथकाला लागेना तस्करांचा सुगावा

नाशिक : मालेगाव उपवनविभागाच्या हद्दीतील ८० ते ९० हजार हेक्टरवरील जंगलात मोठ्या प्रमाणात ‘खैर’च्या वृक्षांची तस्करांच्या टोळीकडून कत्तल करण्यात आल्याचा गंभीर प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणला. यानंतर वनविभागाला खडबडून जाग आली. या गुन्ह्याच्या तपासासाठी स्वतंत्र दक्षता पथकाची नियुक्ती करण्यात आली; मात्र पंचनाम्यानंतर हे पथक भरकटले असून, अद्याप तस्करांचा सुगावा पथकाला लागलेला नाही. वृक्षांच्या कत्तलीमागे असलेल्या गुन्हेगारांची उपवनविभागाच्या अधिकाºयांकडून जणू ‘दक्षता’ घेतली जात असल्याची चर्चा सुरू आहे.मालेगाव तालुक्यातील गाळणा, नागझिरी, पोहाणे, चिंचवे, तळवाडे, रामपुरा या गावांच्या शिवारात मोठ्या प्रमाणात जंगलाचे क्षेत्र आहे. या जंगलातील वृक्षसंपदा धोक्यात आली असून, गुजरातच्या गुटखा व्यवसायाशी खैर वृक्षांची कत्तल करणाºया टोळीचा या धुमाकूळ वाढला आहे. टोळीने काही नागरिकांना व वन कर्मचाºयांना हाताशी धरून खैर इलेक्ट्रॉनिक कटरने कापल्याचे उघडकीस आले आहे. पन्नास, शंभर नव्हे तर तब्बल पाचशेपेक्षा अधिक खैरांची झाडे कापून गुजरातमध्ये पाठविली. या गुन्ह्याचा तपास दक्षता पथकाकडून गुरुवारपासून (दि. १२) सुरू आहे. पथकाने दोन दिवसांमध्ये पंचनामा पूर्ण केला आणि अहवाल तयार केला; मात्र या गुन्ह्यात ज्यांचा सहभाग आहे अशा तस्करांच्या मुसक्या आवळण्यात अद्याप यश आले नाही. याबाबत तपास भरकटला असून, अद्याप एकालाही या गुन्ह्यात ताब्यात घेतलेले नाही.कापलेले बुंधे वनकर्मचाºयांनी बुजविल्याचा संशयकापलेल्या खैराच्या झाडांचे जमिनीपासूनचे बुंधे माती टाकून वन कर्मचाºयांनीच बुजविल्याचा संशय आहे. पंचनामा सुरू असताना सदर प्रकार तपास पथकाच्या निदर्शनास आल्याचेही बोलले जात आहे. मात्र ‘आपलेच दात आपलेच ओठ’ या म्हणीनुसार सध्या वनविभागाची अवस्था झाली आहे.पंचनाम्याच्या अहवालानंतर अद्याप मुख्य वनसंरक्षकांकडूनदेखील कुठल्याही प्रकारची ठोस कारवाई या प्रकरणी झाली नसून त्यांच्या कारवाईकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.