शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
3
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
4
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
5
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
6
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
7
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
8
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
9
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
10
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
11
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
12
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
13
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
14
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
15
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
16
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
17
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
18
उल्हासनगर महापालिका कलानी मुक्त करणार; भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश वधारियांचा इशारा
19
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
20
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल

कत्तलीपेक्षा गुन्हेगारांचीच ‘दक्षता’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 00:26 IST

‘खैर’ तोडीचा तपास भरकटला; पथकाला लागेना तस्करांचा सुगावा नाशिक : मालेगाव उपवनविभागाच्या हद्दीतील ८० ते ९० हजार हेक्टरवरील जंगलात मोठ्या प्रमाणात ‘खैर’च्या वृक्षांची तस्करांच्या टोळीकडून कत्तल करण्यात आल्याचा गंभीर प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणला. यानंतर वनविभागाला खडबडून जाग आली. या गुन्ह्याच्या तपासासाठी स्वतंत्र दक्षता पथकाची नियुक्ती करण्यात आली; मात्र पंचनाम्यानंतर हे पथक भरकटले असून, अद्याप तस्करांचा सुगावा पथकाला लागलेला नाही. वृक्षांच्या कत्तलीमागे असलेल्या गुन्हेगारांची उपवनविभागाच्या अधिकाºयांकडून जणू ‘दक्षता’ घेतली जात असल्याची चर्चा सुरू आहे.

‘खैर’ तोडीचा तपास भरकटला; पथकाला लागेना तस्करांचा सुगावा

नाशिक : मालेगाव उपवनविभागाच्या हद्दीतील ८० ते ९० हजार हेक्टरवरील जंगलात मोठ्या प्रमाणात ‘खैर’च्या वृक्षांची तस्करांच्या टोळीकडून कत्तल करण्यात आल्याचा गंभीर प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणला. यानंतर वनविभागाला खडबडून जाग आली. या गुन्ह्याच्या तपासासाठी स्वतंत्र दक्षता पथकाची नियुक्ती करण्यात आली; मात्र पंचनाम्यानंतर हे पथक भरकटले असून, अद्याप तस्करांचा सुगावा पथकाला लागलेला नाही. वृक्षांच्या कत्तलीमागे असलेल्या गुन्हेगारांची उपवनविभागाच्या अधिकाºयांकडून जणू ‘दक्षता’ घेतली जात असल्याची चर्चा सुरू आहे.मालेगाव तालुक्यातील गाळणा, नागझिरी, पोहाणे, चिंचवे, तळवाडे, रामपुरा या गावांच्या शिवारात मोठ्या प्रमाणात जंगलाचे क्षेत्र आहे. या जंगलातील वृक्षसंपदा धोक्यात आली असून, गुजरातच्या गुटखा व्यवसायाशी खैर वृक्षांची कत्तल करणाºया टोळीचा या धुमाकूळ वाढला आहे. टोळीने काही नागरिकांना व वन कर्मचाºयांना हाताशी धरून खैर इलेक्ट्रॉनिक कटरने कापल्याचे उघडकीस आले आहे. पन्नास, शंभर नव्हे तर तब्बल पाचशेपेक्षा अधिक खैरांची झाडे कापून गुजरातमध्ये पाठविली. या गुन्ह्याचा तपास दक्षता पथकाकडून गुरुवारपासून (दि. १२) सुरू आहे. पथकाने दोन दिवसांमध्ये पंचनामा पूर्ण केला आणि अहवाल तयार केला; मात्र या गुन्ह्यात ज्यांचा सहभाग आहे अशा तस्करांच्या मुसक्या आवळण्यात अद्याप यश आले नाही. याबाबत तपास भरकटला असून, अद्याप एकालाही या गुन्ह्यात ताब्यात घेतलेले नाही.कापलेले बुंधे वनकर्मचाºयांनी बुजविल्याचा संशयकापलेल्या खैराच्या झाडांचे जमिनीपासूनचे बुंधे माती टाकून वन कर्मचाºयांनीच बुजविल्याचा संशय आहे. पंचनामा सुरू असताना सदर प्रकार तपास पथकाच्या निदर्शनास आल्याचेही बोलले जात आहे. मात्र ‘आपलेच दात आपलेच ओठ’ या म्हणीनुसार सध्या वनविभागाची अवस्था झाली आहे.पंचनाम्याच्या अहवालानंतर अद्याप मुख्य वनसंरक्षकांकडूनदेखील कुठल्याही प्रकारची ठोस कारवाई या प्रकरणी झाली नसून त्यांच्या कारवाईकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.