शहरं
Join us  
Trending Stories
1
भगुर नगरपरिषद निवडणुकीत मोठा गोंधळ! शिवसेनेच्या उमेदवाराचे नावच मतदार यादीत सापडेना, डोके पकडायची वेळ...
2
'किमान पुढच्या वेळी तरी...'; निकालाची तारीख पुढे ढकलल्याने CM फडणवीसांनी व्यक्त केली तीव्र नाराजी
3
Municipal Election Result 2025 Date: राज्यातील सर्व नगरपरिषदांची मतमोजणी एकत्रच होणार; आता २१ डिसेंबरला निकाल लागणार
4
SMAT 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचं आणखी एक विक्रमी शतक! महाराष्ट्र संघाविरुद्ध तळपली बॅट
5
पहिल्या दिवशीच जोरदार आपटला; शेअर बाजारात उतरताच 'धडाम'; १२१ रुपयांचा शेअर आला ७३ वर
6
कुठे EVM मशिन बंद, कुठे बोगस मतदार, तर कुठे लांबच लांब रांग; नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू
7
HCL Tech-एअरटेलसह 'या' ५ कंपन्या देणार मोठा परतावा; ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइस
8
"सॉरी पप्पा, 'त्या' मुलीनं माझ्या भावनांचा खेळ केला..."; २६ वर्षीय युवकानं केला आयुष्याचा शेवट
9
जग हादरलं! भीषण पाणी टंचाईमुळे 'या' देशाची राजधानी रिकामी करावी लागणार? दीड कोटी जनतेवर होणार परिणाम!
10
आमदार संतोष बांगरांनी नियम बसवले धाब्यावर; महिलेला बटन दाबण्यास सांगितले, मोबाईल घेऊन केंद्रात गेले
11
चंद्रपूर: EVMचे बटण दाबूनही लाईट लागेना, तांत्रिक कारणामुळे काही केंद्रांवर प्रक्रिया थांबली
12
"मला iPhone 17 Pro Max हवाय"; तरुणाचा भाजपा खासदाराला फोन, मजेदार ऑडिओ व्हायरल
13
Bus Fire: ट्रकला धडकल्यानंतर बस पेटली; ३ जणांचा होरपळून मृत्यू, २३ जण जखमी
14
Mumbai Hit And Run: मैत्रिणीला ढकलून वाचवला जीव; पोलिस व्हॅनच्या धडकेत आयटीआय विद्यार्थी जखमी
15
SMAT 2025 : अर्जुन तेंडुलकरनं IPL इतिहासातील महागड्या गड्याला स्वस्तात तंबूत धाडलं; पण...
16
Video - संतापजनक! "म्हातारे, मी तुझं बुटाने तोंड फोडेन, तू..."; वृद्ध महिलेला पोलिसाची धमकी
17
तात्पुरत्या शिक्षकांना पेन्शन, अन्य सेवा लाभ नाकारू नयेत; उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल
18
महिला पोलीस कॉन्स्टेबलचा संशयास्पद मृत्यू; Whatsapp स्टेटसमुळे घटना उघडकीस, हत्येचा दावा
19
दिल्ली बॉम्बस्फोटाचं हमास कनेक्शन! हल्ल्यासाठी ड्रोन वापरायचा कट; दहशतवादी दानिशच्या फोनमधून मोठा खुलासा
20
IPL 2026: ग्लेन मॅक्सवेलची कारकीर्द धोक्यात? पंजाबने सोडलं, आता लिलावातून बाहेर, कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सरकारकडून आर्थिक धोरणांची प्रभावी अंमलबजावणी- गोविलकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 20:35 IST

नाशिक : सत्ताधारी सरकारकडून अर्थव्यवस्थेच्य बळकटीकरणाकडे आणि विकासाकडे विशेष लक्ष पुरविले जात आहे. आर्थिक धोरणांची प्रभावी अंमलबजावणी होत असल्याने देशाचे राष्ट्रीय उत्पनात वाढ झाली आहे. तसेच अर्थव्यवस्था वेगाने विकसीत होत असल्याचा निर्वाळा जागतिक बॅँके ने अहवालात दिला आहे, असे प्रतिपादन अर्थतज्ज्ञ विनायक गोविलकर यांनी केले.आयमा नाशिक व लघुउद्योग भारती यांच्या ...

ठळक मुद्दे ‘मोदिनॉमिक्स’ पुस्तकामधील आढावा अर्थव्यवस्था विकसीत करण्यावर भर

नाशिक : सत्ताधारी सरकारकडून अर्थव्यवस्थेच्य बळकटीकरणाकडे आणि विकासाकडे विशेष लक्ष पुरविले जात आहे. आर्थिक धोरणांची प्रभावी अंमलबजावणी होत असल्याने देशाचे राष्ट्रीय उत्पनात वाढ झाली आहे. तसेच अर्थव्यवस्था वेगाने विकसीत होत असल्याचा निर्वाळा जागतिक बॅँके ने अहवालात दिला आहे, असे प्रतिपादन अर्थतज्ज्ञ विनायक गोविलकर यांनी केले.आयमा नाशिक व लघुउद्योग भारती यांच्या संयुक्त विद्यमाने गंगापुररोडवरील शंकराचार्य संकु लात बुधवारी (दि.२९) आयोजित व्याख्यानात ‘मोदिनॉमिक्स...आर्थिक दृष्टिकोनातील स्थित्यंतर’ या विषयावर गोविलकर बोलत होते. यावेळी व्यासपिठावर लघुउद्योग भारतीचे विभागीय अध्यक्ष एम.जी.कुलकर्णी, शहराध्यक्ष संजय महाजन, निमाचे हरिशंकर बॅनर्जी उपस्थित होते. यावेळी गोविलकर यांनी आपल्या ‘मोदिनॉमिक्स’ पुस्तकामधील आढावा सादर करताना देशाची अर्थव्यवस्था आणि त्यामध्ये होत गेलेले सकारात्मक बदल याविषयी चर्चा केली. ते म्हणाले, १९७७-१९९१ या कालखंडात सरकार स्थिर न राहिल्यामुळे देशाच्या आर्थिक धोरणांकडे दुर्लक्ष झाले. देशावर मोठे आर्थिक संकट ओढावले. २००८साली आलेल्या जागतिक मंदीच्या संकटातून सावरण्यासाठी अर्थतज्ज्ञांनी लोकांची क्रयशक्ती वाढवावी, सरकारने खर्च करावा, असा पर्याय सुचविला. तो आजतागायत लागू आहे. तेव्हा सरकारने खर्च करण्यास सुरूवात केली; मात्र हा खर्च सर्वाधिक कल्याणकारी कामांवर करण्यात आला हे दुर्दैव. कारण कल्याणकारी कामांवर खर्च होऊ लागल्याने भ्रष्टाचाराला मोठा वाव मिळाला आणि २०१४पर्यंत वित्तीय शिस्तीकडेही दुर्लक्ष झाले. २जी, ३जी, कॉमनवेल्थसारखे घोटाळे उघडकीस आले. देशाचे माजी पंतप्रधान व अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहनसिंग यांच्या काळात आर्थिक धोरणांची अंमलबजावणी प्रभावीपणे झाली नाही. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था मजबूत होऊ शकली नाही. केवळ धोरणे दर्जेदार असून चालत नाही तर त्यांच्या अंमलबजावणीकडेही लक्ष दिले गेले पाहिजे, असे यावेळी गोविलकर यांनी सांगितले.अर्थव्यवस्था विकसीत करण्यावर भर२०१४ पासून आजपर्यंत राष्ट्रीय अर्थव्यवस्था अधिक विकसीत करण्यावर या सरकारने भर दिला. शेतीच्या तीन प्रश्नांपैकी उत्पादनवाढीचा प्रश्न मार्गी लावण्यास सरकारला यश आल्याचे त्यांनी यावेळक्ष अधोरेखित केले. याप्रसंगी त्यांनी बोलताना सरकारच्या विविध योजनांचा आढावा घेतला.

टॅग्स :BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीEconomyअर्थव्यवस्था