शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

सरकारकडून आर्थिक धोरणांची प्रभावी अंमलबजावणी- गोविलकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 20:35 IST

नाशिक : सत्ताधारी सरकारकडून अर्थव्यवस्थेच्य बळकटीकरणाकडे आणि विकासाकडे विशेष लक्ष पुरविले जात आहे. आर्थिक धोरणांची प्रभावी अंमलबजावणी होत असल्याने देशाचे राष्ट्रीय उत्पनात वाढ झाली आहे. तसेच अर्थव्यवस्था वेगाने विकसीत होत असल्याचा निर्वाळा जागतिक बॅँके ने अहवालात दिला आहे, असे प्रतिपादन अर्थतज्ज्ञ विनायक गोविलकर यांनी केले.आयमा नाशिक व लघुउद्योग भारती यांच्या ...

ठळक मुद्दे ‘मोदिनॉमिक्स’ पुस्तकामधील आढावा अर्थव्यवस्था विकसीत करण्यावर भर

नाशिक : सत्ताधारी सरकारकडून अर्थव्यवस्थेच्य बळकटीकरणाकडे आणि विकासाकडे विशेष लक्ष पुरविले जात आहे. आर्थिक धोरणांची प्रभावी अंमलबजावणी होत असल्याने देशाचे राष्ट्रीय उत्पनात वाढ झाली आहे. तसेच अर्थव्यवस्था वेगाने विकसीत होत असल्याचा निर्वाळा जागतिक बॅँके ने अहवालात दिला आहे, असे प्रतिपादन अर्थतज्ज्ञ विनायक गोविलकर यांनी केले.आयमा नाशिक व लघुउद्योग भारती यांच्या संयुक्त विद्यमाने गंगापुररोडवरील शंकराचार्य संकु लात बुधवारी (दि.२९) आयोजित व्याख्यानात ‘मोदिनॉमिक्स...आर्थिक दृष्टिकोनातील स्थित्यंतर’ या विषयावर गोविलकर बोलत होते. यावेळी व्यासपिठावर लघुउद्योग भारतीचे विभागीय अध्यक्ष एम.जी.कुलकर्णी, शहराध्यक्ष संजय महाजन, निमाचे हरिशंकर बॅनर्जी उपस्थित होते. यावेळी गोविलकर यांनी आपल्या ‘मोदिनॉमिक्स’ पुस्तकामधील आढावा सादर करताना देशाची अर्थव्यवस्था आणि त्यामध्ये होत गेलेले सकारात्मक बदल याविषयी चर्चा केली. ते म्हणाले, १९७७-१९९१ या कालखंडात सरकार स्थिर न राहिल्यामुळे देशाच्या आर्थिक धोरणांकडे दुर्लक्ष झाले. देशावर मोठे आर्थिक संकट ओढावले. २००८साली आलेल्या जागतिक मंदीच्या संकटातून सावरण्यासाठी अर्थतज्ज्ञांनी लोकांची क्रयशक्ती वाढवावी, सरकारने खर्च करावा, असा पर्याय सुचविला. तो आजतागायत लागू आहे. तेव्हा सरकारने खर्च करण्यास सुरूवात केली; मात्र हा खर्च सर्वाधिक कल्याणकारी कामांवर करण्यात आला हे दुर्दैव. कारण कल्याणकारी कामांवर खर्च होऊ लागल्याने भ्रष्टाचाराला मोठा वाव मिळाला आणि २०१४पर्यंत वित्तीय शिस्तीकडेही दुर्लक्ष झाले. २जी, ३जी, कॉमनवेल्थसारखे घोटाळे उघडकीस आले. देशाचे माजी पंतप्रधान व अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहनसिंग यांच्या काळात आर्थिक धोरणांची अंमलबजावणी प्रभावीपणे झाली नाही. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था मजबूत होऊ शकली नाही. केवळ धोरणे दर्जेदार असून चालत नाही तर त्यांच्या अंमलबजावणीकडेही लक्ष दिले गेले पाहिजे, असे यावेळी गोविलकर यांनी सांगितले.अर्थव्यवस्था विकसीत करण्यावर भर२०१४ पासून आजपर्यंत राष्ट्रीय अर्थव्यवस्था अधिक विकसीत करण्यावर या सरकारने भर दिला. शेतीच्या तीन प्रश्नांपैकी उत्पादनवाढीचा प्रश्न मार्गी लावण्यास सरकारला यश आल्याचे त्यांनी यावेळक्ष अधोरेखित केले. याप्रसंगी त्यांनी बोलताना सरकारच्या विविध योजनांचा आढावा घेतला.

टॅग्स :BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीEconomyअर्थव्यवस्था