शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

सरकारकडून आर्थिक धोरणांची प्रभावी अंमलबजावणी- गोविलकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 20:35 IST

नाशिक : सत्ताधारी सरकारकडून अर्थव्यवस्थेच्य बळकटीकरणाकडे आणि विकासाकडे विशेष लक्ष पुरविले जात आहे. आर्थिक धोरणांची प्रभावी अंमलबजावणी होत असल्याने देशाचे राष्ट्रीय उत्पनात वाढ झाली आहे. तसेच अर्थव्यवस्था वेगाने विकसीत होत असल्याचा निर्वाळा जागतिक बॅँके ने अहवालात दिला आहे, असे प्रतिपादन अर्थतज्ज्ञ विनायक गोविलकर यांनी केले.आयमा नाशिक व लघुउद्योग भारती यांच्या ...

ठळक मुद्दे ‘मोदिनॉमिक्स’ पुस्तकामधील आढावा अर्थव्यवस्था विकसीत करण्यावर भर

नाशिक : सत्ताधारी सरकारकडून अर्थव्यवस्थेच्य बळकटीकरणाकडे आणि विकासाकडे विशेष लक्ष पुरविले जात आहे. आर्थिक धोरणांची प्रभावी अंमलबजावणी होत असल्याने देशाचे राष्ट्रीय उत्पनात वाढ झाली आहे. तसेच अर्थव्यवस्था वेगाने विकसीत होत असल्याचा निर्वाळा जागतिक बॅँके ने अहवालात दिला आहे, असे प्रतिपादन अर्थतज्ज्ञ विनायक गोविलकर यांनी केले.आयमा नाशिक व लघुउद्योग भारती यांच्या संयुक्त विद्यमाने गंगापुररोडवरील शंकराचार्य संकु लात बुधवारी (दि.२९) आयोजित व्याख्यानात ‘मोदिनॉमिक्स...आर्थिक दृष्टिकोनातील स्थित्यंतर’ या विषयावर गोविलकर बोलत होते. यावेळी व्यासपिठावर लघुउद्योग भारतीचे विभागीय अध्यक्ष एम.जी.कुलकर्णी, शहराध्यक्ष संजय महाजन, निमाचे हरिशंकर बॅनर्जी उपस्थित होते. यावेळी गोविलकर यांनी आपल्या ‘मोदिनॉमिक्स’ पुस्तकामधील आढावा सादर करताना देशाची अर्थव्यवस्था आणि त्यामध्ये होत गेलेले सकारात्मक बदल याविषयी चर्चा केली. ते म्हणाले, १९७७-१९९१ या कालखंडात सरकार स्थिर न राहिल्यामुळे देशाच्या आर्थिक धोरणांकडे दुर्लक्ष झाले. देशावर मोठे आर्थिक संकट ओढावले. २००८साली आलेल्या जागतिक मंदीच्या संकटातून सावरण्यासाठी अर्थतज्ज्ञांनी लोकांची क्रयशक्ती वाढवावी, सरकारने खर्च करावा, असा पर्याय सुचविला. तो आजतागायत लागू आहे. तेव्हा सरकारने खर्च करण्यास सुरूवात केली; मात्र हा खर्च सर्वाधिक कल्याणकारी कामांवर करण्यात आला हे दुर्दैव. कारण कल्याणकारी कामांवर खर्च होऊ लागल्याने भ्रष्टाचाराला मोठा वाव मिळाला आणि २०१४पर्यंत वित्तीय शिस्तीकडेही दुर्लक्ष झाले. २जी, ३जी, कॉमनवेल्थसारखे घोटाळे उघडकीस आले. देशाचे माजी पंतप्रधान व अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहनसिंग यांच्या काळात आर्थिक धोरणांची अंमलबजावणी प्रभावीपणे झाली नाही. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था मजबूत होऊ शकली नाही. केवळ धोरणे दर्जेदार असून चालत नाही तर त्यांच्या अंमलबजावणीकडेही लक्ष दिले गेले पाहिजे, असे यावेळी गोविलकर यांनी सांगितले.अर्थव्यवस्था विकसीत करण्यावर भर२०१४ पासून आजपर्यंत राष्ट्रीय अर्थव्यवस्था अधिक विकसीत करण्यावर या सरकारने भर दिला. शेतीच्या तीन प्रश्नांपैकी उत्पादनवाढीचा प्रश्न मार्गी लावण्यास सरकारला यश आल्याचे त्यांनी यावेळक्ष अधोरेखित केले. याप्रसंगी त्यांनी बोलताना सरकारच्या विविध योजनांचा आढावा घेतला.

टॅग्स :BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीEconomyअर्थव्यवस्था