शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

अतिवृष्टी आणि लम्पी आजाराचा परिणाम; १९४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणीवर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2022 05:30 IST

निर्णयाकडे लक्ष, जिल्ह्यात ८८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी येत्या रविवारी (दि. १८) मतदान होणार आहे तर उर्वरित १९४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम देखील लागलीच जाहीर झाला आहे.

नाशिक : राज्यात अनेक ठिकाणी लम्पी आजाराने थैमान घातल्याने शेतकऱ्यांची जनावरे धोक्यात आली आहेत तर अतिवृष्टीचाही फटका बसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे राज्यातील ११६६ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम स्थगित होण्याची शक्यता आहे. नाशिक जिल्ह्यातील १९४ ग्रामपंचायतींचा त्यात समावेश आहे.

जिल्ह्यात ८८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी येत्या रविवारी (दि. १८) मतदान होणार आहे तर उर्वरित १९४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम देखील लागलीच जाहीर झाला आहे. जानेवारी २०२१ ते मे २०२२ या कालावधीत मुदत संपलेल्या व जून २०२२ ते सप्टेंबर २०२२ मध्ये मुदत संपुष्टात येणाऱ्या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जाहीर करण्यात आला आहे. राज्यातील ११६६ ग्रामपंचायतींचा कार्यक्रम राज्य आयोगाकडून जाहीर करण्यात आला असून, त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीतील ५, सुरगाण्यातील ६१, त्र्यंबकेश्वरमधील ५७, तर पेठ तालुक्यातील ७१ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

येत्या १३ तारखेला या संदर्भातील अधिसूचना जाहीर केली जाणार आहे, मात्र निवडणुकीच्या नियोजित कार्यक्रमाला ब्रेक लागण्याची दाट शक्यता आहे. राज्यात लम्पी आजारामुळे शेतकऱ्यांची जनावरे धोक्यात आली आहेत. याबराबेरच शेतकऱ्यांच्या शेतीवर आणि दुग्ध उत्पादनावर देखील मोठा परिणाम झाला आहे. अतिवृष्टीमुळे शेतपिकांची देखील चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. अशा वातावरणात निवडणुका घेणे योग्य होणार नसल्याने राज्य शासनाकडून याबाबत फेरविचार सुरू असल्याचे समजते. त्यानुसार येत्या डिसेंबरपर्यंत या निवडणुकांचा कार्यक्रम डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Votingमतदानgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकLumpy Skin Disease Virusलम्पी त्वचारोग