शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

अतिवृष्टी आणि लम्पी आजाराचा परिणाम; १९४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणीवर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2022 05:30 IST

निर्णयाकडे लक्ष, जिल्ह्यात ८८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी येत्या रविवारी (दि. १८) मतदान होणार आहे तर उर्वरित १९४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम देखील लागलीच जाहीर झाला आहे.

नाशिक : राज्यात अनेक ठिकाणी लम्पी आजाराने थैमान घातल्याने शेतकऱ्यांची जनावरे धोक्यात आली आहेत तर अतिवृष्टीचाही फटका बसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे राज्यातील ११६६ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम स्थगित होण्याची शक्यता आहे. नाशिक जिल्ह्यातील १९४ ग्रामपंचायतींचा त्यात समावेश आहे.

जिल्ह्यात ८८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी येत्या रविवारी (दि. १८) मतदान होणार आहे तर उर्वरित १९४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम देखील लागलीच जाहीर झाला आहे. जानेवारी २०२१ ते मे २०२२ या कालावधीत मुदत संपलेल्या व जून २०२२ ते सप्टेंबर २०२२ मध्ये मुदत संपुष्टात येणाऱ्या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जाहीर करण्यात आला आहे. राज्यातील ११६६ ग्रामपंचायतींचा कार्यक्रम राज्य आयोगाकडून जाहीर करण्यात आला असून, त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीतील ५, सुरगाण्यातील ६१, त्र्यंबकेश्वरमधील ५७, तर पेठ तालुक्यातील ७१ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

येत्या १३ तारखेला या संदर्भातील अधिसूचना जाहीर केली जाणार आहे, मात्र निवडणुकीच्या नियोजित कार्यक्रमाला ब्रेक लागण्याची दाट शक्यता आहे. राज्यात लम्पी आजारामुळे शेतकऱ्यांची जनावरे धोक्यात आली आहेत. याबराबेरच शेतकऱ्यांच्या शेतीवर आणि दुग्ध उत्पादनावर देखील मोठा परिणाम झाला आहे. अतिवृष्टीमुळे शेतपिकांची देखील चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. अशा वातावरणात निवडणुका घेणे योग्य होणार नसल्याने राज्य शासनाकडून याबाबत फेरविचार सुरू असल्याचे समजते. त्यानुसार येत्या डिसेंबरपर्यंत या निवडणुकांचा कार्यक्रम डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Votingमतदानgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकLumpy Skin Disease Virusलम्पी त्वचारोग