शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

शैक्षणिक ॲप आवरा, शिक्षण सावरा अन् शाळा लवकर भरवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:10 IST

जळगाव नेऊर : शासनाचे विविध शैक्षणिक ॲप, त्यात ग्रामीण भागात नेटवर्कची अडचण, अनेक मुलांकडे स्मार्ट फोनचा अभाव यामुळे शिक्षकांबरोबरच ...

जळगाव नेऊर : शासनाचे विविध शैक्षणिक ॲप, त्यात ग्रामीण भागात नेटवर्कची अडचण, अनेक मुलांकडे स्मार्ट फोनचा अभाव यामुळे शिक्षकांबरोबरच ग्रामीण भागातील विद्यार्थी-पालक मेटाकुटीस आले असून, काहींना मोबाइल विकत घेण्याबरोबर, त्यासाठीचा नेट पॅक या खर्चाचा भार पेलणे कठीण झाले असून, पालक शिक्षकांनाच सांगताहेत की मोबाइल शिक्षण नको, शाळाच भरवा.

शासनाच्या शैक्षणिक ॲपमध्ये दीक्षा, वोपा, यू ट्यूब, महाकरिअर पोर्टल, गुरूशाला, क्लीन पास, गुगल मीट, टेलिग्राम, झूम, व्हाॅट्सॲप, बालभारती, टारगेट पिक, गो-टू वेबिनार, शेअर चॅट, काॅइन मास्टर, व्हिडिओ कॉल, कॉन्फरन्स कॉल, व्ही स्कूल या ॲपद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात आहे. वेगवेगळ्या शैक्षणिक संस्था विद्यार्थी गुणवत्तावाढीसाठी प्रयत्नशील आहेत व अध्ययन, अध्यापन अहवाल देणे, सरल अपडेट करणे, स्कूल मास्टर या गोष्टी शिक्षकांना शासनाला पुरवाव्या लागत आहेत.

शासनाबरोबर विविध मोठ्या शैक्षणिक संस्था जसे मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेसारख्या शैक्षणिक गुणवत्ता जोपासणाऱ्या संस्थाही आपापल्या पातळीवरून शिक्षक, विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांच्या ऑनलाइन कार्यशाळा वारंवार घेऊन विविध उपक्रमांद्वारे शिक्षण प्रबोधनाचे कार्यही या लॉकडाऊनच्या शाळा बंद काळात सुरू आहे.

कोरोना संकटात शाळा बंद काळातील शिक्षण मोबाइल शिक्षण सुरू असले तरी पालकांना मोबाइल, तसेच डाटा खर्च खिशाला परवडणारा नाही. प्रत्येक शिक्षक आपापल्या परीने जास्तीत जास्त विद्यार्थ्यांबरोबर संपर्क साधून शिक्षण प्रवाहात सामील करतो आहे. मात्र, वेगवेगळ्या मोबाइल, शैक्षणिक माध्यमे (यू ट्यूब, ॲप) सारख्यांचा अतिरेक होतो की काय, असे दिसते आहे. मोबाइलचा अतिवापर पालकांची डोकेदुखी होत आहे, अशी पालकांमध्ये प्रतिक्रिया असून, विविध ॲप आवरा, शिक्षण सावरा अशी काहीशी भावना ग्रामीण भागात व्यक्त होत आहे. गोंधळलेले पालक-भांबावलेले विद्यार्थी, विविध आदेशाचे पालन करणारे शिक्षक असे ऑनलाइन शिक्षण सुरू आहे.

------------------------

ग्रामीण भागामध्ये नेटवर्कचा प्रॉब्लेम, अशिक्षित पालक यामुळे मोबाइल हाताळणे जिकिरीचे होते. तसेच किमतीचा विचार केल्यास ग्रामीण भागामध्ये उत्पन्नाचा स्रोत कमी असल्यामुळे न परवडणारे आहे. या समस्या विद्यार्थ्यांसमोर असून त्यासाठी शाळा हीच काळाची गरज असून, बहुतांश पालकांकडे स्मार्ट मोबाइल नाही, त्यामुळे मुले वंचित राहतात.

- भीमराज शिंदे, पालक, जळगाव नेऊर.