शहरं
Join us  
Trending Stories
1
फलटण प्रकरणाचा होणार एसआयटीमार्फत तपास; मुख्यमंत्री फडणवीस यांचे पोलिस महासंचालकांना आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०१ नोव्हेंबर २०२५: अचानक धनलाभ, प्रिय व्यक्तींचा सहवास; मन प्रसन्न राहील
3
विरोधकांचा आज मुंबईत निघणार 'सत्याचा मोर्चा'; निवडणूक आयोगाविरोधात करणार कोर्टात याचिका
4
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
5
जिल्हा परिषदांऐवजी आधी नगरपालिकांची निवडणूक; आयोगाकडून घोषणा पुढील आठवड्यात
6
हात बांधले, बंदूक रोखली अन्.. ओलीस नाट्याचा तीन महिन्यांपासून कट; चार दिवसांपासून सुरू होती रंगीत तालीम
7
'दीपक केसरकरांनी अन्याय केला'; आम्ही फेक सीन करत होतो, तो मात्र ते वास्तवात आणत होता...
8
तिसरे अपत्य लपविणाऱ्यास निवडणुकीत बसणार चाप! सप्टेंबर २००१ नंतर जन्मलेले तिसरे अपत्य ठरवेल उमेदवाराला अपात्र
9
अडीच लाख अन् महिन्याच्या रेशनसाठी चिमुकलीचे शोषण; आईच तिला रोज रात्री नराधमाकडे सोपवायची
10
रोहित आर्याने पोलिसांवर गोळी झाडलीच नाही...; गुन्हे शाखेकडून तपास सुरू, अपघाती मृत्यू म्हणून नोंद
11
लोकल प्रवाशांचा उद्या तिन्ही मार्गावर होणार खोळंबा; देखभालीसाठी मध्य, पश्चिम व हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
12
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
13
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
14
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
15
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
16
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
17
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
18
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
19
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
20
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश

शैक्षणिक ॲप आवरा, शिक्षण सावरा अन् शाळा लवकर भरवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:10 IST

जळगाव नेऊर : शासनाचे विविध शैक्षणिक ॲप, त्यात ग्रामीण भागात नेटवर्कची अडचण, अनेक मुलांकडे स्मार्ट फोनचा अभाव यामुळे शिक्षकांबरोबरच ...

जळगाव नेऊर : शासनाचे विविध शैक्षणिक ॲप, त्यात ग्रामीण भागात नेटवर्कची अडचण, अनेक मुलांकडे स्मार्ट फोनचा अभाव यामुळे शिक्षकांबरोबरच ग्रामीण भागातील विद्यार्थी-पालक मेटाकुटीस आले असून, काहींना मोबाइल विकत घेण्याबरोबर, त्यासाठीचा नेट पॅक या खर्चाचा भार पेलणे कठीण झाले असून, पालक शिक्षकांनाच सांगताहेत की मोबाइल शिक्षण नको, शाळाच भरवा.

शासनाच्या शैक्षणिक ॲपमध्ये दीक्षा, वोपा, यू ट्यूब, महाकरिअर पोर्टल, गुरूशाला, क्लीन पास, गुगल मीट, टेलिग्राम, झूम, व्हाॅट्सॲप, बालभारती, टारगेट पिक, गो-टू वेबिनार, शेअर चॅट, काॅइन मास्टर, व्हिडिओ कॉल, कॉन्फरन्स कॉल, व्ही स्कूल या ॲपद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात आहे. वेगवेगळ्या शैक्षणिक संस्था विद्यार्थी गुणवत्तावाढीसाठी प्रयत्नशील आहेत व अध्ययन, अध्यापन अहवाल देणे, सरल अपडेट करणे, स्कूल मास्टर या गोष्टी शिक्षकांना शासनाला पुरवाव्या लागत आहेत.

शासनाबरोबर विविध मोठ्या शैक्षणिक संस्था जसे मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेसारख्या शैक्षणिक गुणवत्ता जोपासणाऱ्या संस्थाही आपापल्या पातळीवरून शिक्षक, विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांच्या ऑनलाइन कार्यशाळा वारंवार घेऊन विविध उपक्रमांद्वारे शिक्षण प्रबोधनाचे कार्यही या लॉकडाऊनच्या शाळा बंद काळात सुरू आहे.

कोरोना संकटात शाळा बंद काळातील शिक्षण मोबाइल शिक्षण सुरू असले तरी पालकांना मोबाइल, तसेच डाटा खर्च खिशाला परवडणारा नाही. प्रत्येक शिक्षक आपापल्या परीने जास्तीत जास्त विद्यार्थ्यांबरोबर संपर्क साधून शिक्षण प्रवाहात सामील करतो आहे. मात्र, वेगवेगळ्या मोबाइल, शैक्षणिक माध्यमे (यू ट्यूब, ॲप) सारख्यांचा अतिरेक होतो की काय, असे दिसते आहे. मोबाइलचा अतिवापर पालकांची डोकेदुखी होत आहे, अशी पालकांमध्ये प्रतिक्रिया असून, विविध ॲप आवरा, शिक्षण सावरा अशी काहीशी भावना ग्रामीण भागात व्यक्त होत आहे. गोंधळलेले पालक-भांबावलेले विद्यार्थी, विविध आदेशाचे पालन करणारे शिक्षक असे ऑनलाइन शिक्षण सुरू आहे.

------------------------

ग्रामीण भागामध्ये नेटवर्कचा प्रॉब्लेम, अशिक्षित पालक यामुळे मोबाइल हाताळणे जिकिरीचे होते. तसेच किमतीचा विचार केल्यास ग्रामीण भागामध्ये उत्पन्नाचा स्रोत कमी असल्यामुळे न परवडणारे आहे. या समस्या विद्यार्थ्यांसमोर असून त्यासाठी शाळा हीच काळाची गरज असून, बहुतांश पालकांकडे स्मार्ट मोबाइल नाही, त्यामुळे मुले वंचित राहतात.

- भीमराज शिंदे, पालक, जळगाव नेऊर.