शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
3
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
4
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
5
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
6
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
7
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
8
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
9
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
10
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
11
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
12
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
13
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
14
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
15
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
16
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
17
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
18
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
19
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
20
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र

शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले

By admin | Updated: December 3, 2015 21:50 IST

खरिपाचे नुकसान : कांदा भिजून खराब झाल्याने ‘दुष्काळात तेरावा महिना’

खामखेडा : नाशिक जिल्ह्यात पंधरा दिवसांपूर्वी बेमोसमी पावसाने तीन-चार दिवस धुमाकूळ घातल्याने शेतपिकांचे अतोनात नुकसान झाले असून, शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. या पावसाचा रब्बी पिकांना फायदा होणार असला तरी खरिपाचे नुकसान रब्बीने भरून निघणार नाही अशी परिस्थिती आहे. खरे तर खरिपाच्या प्रारंभापासूनच पावसाने शेतकऱ्यांची कसोटी पाहिली आहे. आणि आता शेतकऱ्यांची खरी परीक्षा निसर्गाचा लहरीपणा पाहत आहे.पंधरा दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह बेमोसमी पावसाने झोडपून काढले होते. त्यामुळे हाताशी आलेल्या खरिपाच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मुळातच पावसाळ्यात समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे नदी-नाले, धरणे कोरडी होती. त्यामुळे भूगर्भातील जलाशयाच्या पातळीत पाहिजे त्या प्रमाणात वाढ झाली नव्हती. अशा परिस्थितीत शेतकऱ्याने बी-बियाणे खर्च करत खरिपाची जणू परीक्षा दिली. उत्पादन किती निघते यावर पुढील गोष्टी ठरणार आहेत. कर्जाचा डोंगर मात्र सरेल अशी आशा वाटत नसल्याचा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. दरवर्षी दिवाळीआधी खरीप पिकांची काढणी होत असे. तसेच दिवाळीअगोदर पोळ कांद्याची काढणी होऊन कांदा विकला जात असे. दिवाळी सणासाठी शेतकऱ्यांच्या हातात दोन पैसे येत असल्याने तेवढाच दिलासा मिळत होता. परंतु चालू वर्षी पावसाअभावी उशिरा लागवड झाल्याने दिवाळीनंतर लाल कांदा तयार झाला. जो काही काढून तयार केला होता, तो या बेमोसमी पावसाने पूर्णपणे भिजून गेल्याने खराब झाला. शेतातील काढणीस आलेला कांदा शेतातच सडू लागल्याने हा कांदा कवडीमोल भावाने विकला जात आहे. कांद्याची आवक वाढल्याने कांद्याचे भाव फारच कमी झाले आहेत. त्यामुळे उत्पादन खर्च भरून निघतो की नाही याची चिंता बळीराजाला पडली आहे.देवळा, कळवण, सटाणा, मालेगाव या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात डाळिंबाच्या बागा होत्या. या अल्पशा पाण्यावर येणाऱ्या डाळिंबाने शेतकऱ्याला भरपूर पैसा व सुबत्ता दिली होती. परंतु डाळींबबागांवर तेल्या रोगाने थैमान घातल्याने चार-पाच वर्षे या बागांवर अतिरिक्त पैसा खर्च झाल्याने शेतकरीवर्ग मेटाकुटीस आला होता. शेवटी नाइलाजाने डाळिंबाच्या बागा उपटून फेकण्यात आल्या. उत्पादन खर्चही न मिळाल्याने कर्जबाजारीपणा वाढला. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उन्हाळ कांद्याची लागवड करण्यास प्रारंभ केला आहे. शेतकऱ्यांकडे खरिपाचा कांदा फारसा नाही. त्यामुळे दिवाळीनंतर आहे त्या पाण्यावर उन्हाळी कांदा लागवडीची शेतकरी तयारी करीत असतो. मात्र गेल्या पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या बेमोसमी पावसाने लागवडीस आलेली व नाजूक अवस्थेत असलेली रोपे पावसाने झोडपली गेली. त्यामुळे ही रोपे आता पिवळी पडून खराब होऊ लागली आहेत. त्यामुळे उन्हाळी कांद्याच्या क्षेत्रात घट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.चालू वर्षी उशिरा झालेल्या पावसामुळे खरिपाची पेरणी उशिरा झाली. पर्यायाने बाजरी, मका आदि पिकांची कापणी उशिरा झाली. शेतात उघड्यावर पडलेला मका व बाजरीचा कडबा या अवकाळी पावसामुळे भिजून खराब झाला आहे. त्यामुळे चाऱ्याची टंचाई आतापासूनच भासू लागली आहे. आता पुढील नियोजन कसे करावे याची चिंता शेतकऱ्याला सतावते आहे. आत्महत्त्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदतीची मागणीमालेगाव तालुक्यातील आत्महत्त्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना तातडीने शासकीय मदत देऊन सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणी मालेगाव तालुका काँग्रेस कमिटीतर्फे अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर प्रदेश कॉँग्रेस कार्यकारिणी सदस्य डॉ. तुषार शेवाळे, तालुका कॉँग्रेस अध्यक्ष डॉ. राजेंद्र ठाकरे यांच्या सह्या आहेत. मालेगावी थंडीच्या दिवसात उकाडागिसाका : मालेगाव शहर परिसरात यंदा नागरिकांना भर हिवाळ्यात उन्हाचा सामना करावा लागत असून, गुलाबी थंडीऐवजी उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत. त्यामुळे लोकांनी गेल्यावर्षी कपाटात बंद करून ठेवलेले उबदार कपडे अद्याप बाहेर काढलेले नाहीत. दरवर्षी नोेव्हेंबर महिन्यातच थंडीचा सामना करावा लागत असतो. (वार्ताहर)