शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले

By admin | Updated: December 3, 2015 21:50 IST

खरिपाचे नुकसान : कांदा भिजून खराब झाल्याने ‘दुष्काळात तेरावा महिना’

खामखेडा : नाशिक जिल्ह्यात पंधरा दिवसांपूर्वी बेमोसमी पावसाने तीन-चार दिवस धुमाकूळ घातल्याने शेतपिकांचे अतोनात नुकसान झाले असून, शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. या पावसाचा रब्बी पिकांना फायदा होणार असला तरी खरिपाचे नुकसान रब्बीने भरून निघणार नाही अशी परिस्थिती आहे. खरे तर खरिपाच्या प्रारंभापासूनच पावसाने शेतकऱ्यांची कसोटी पाहिली आहे. आणि आता शेतकऱ्यांची खरी परीक्षा निसर्गाचा लहरीपणा पाहत आहे.पंधरा दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह बेमोसमी पावसाने झोडपून काढले होते. त्यामुळे हाताशी आलेल्या खरिपाच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मुळातच पावसाळ्यात समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे नदी-नाले, धरणे कोरडी होती. त्यामुळे भूगर्भातील जलाशयाच्या पातळीत पाहिजे त्या प्रमाणात वाढ झाली नव्हती. अशा परिस्थितीत शेतकऱ्याने बी-बियाणे खर्च करत खरिपाची जणू परीक्षा दिली. उत्पादन किती निघते यावर पुढील गोष्टी ठरणार आहेत. कर्जाचा डोंगर मात्र सरेल अशी आशा वाटत नसल्याचा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. दरवर्षी दिवाळीआधी खरीप पिकांची काढणी होत असे. तसेच दिवाळीअगोदर पोळ कांद्याची काढणी होऊन कांदा विकला जात असे. दिवाळी सणासाठी शेतकऱ्यांच्या हातात दोन पैसे येत असल्याने तेवढाच दिलासा मिळत होता. परंतु चालू वर्षी पावसाअभावी उशिरा लागवड झाल्याने दिवाळीनंतर लाल कांदा तयार झाला. जो काही काढून तयार केला होता, तो या बेमोसमी पावसाने पूर्णपणे भिजून गेल्याने खराब झाला. शेतातील काढणीस आलेला कांदा शेतातच सडू लागल्याने हा कांदा कवडीमोल भावाने विकला जात आहे. कांद्याची आवक वाढल्याने कांद्याचे भाव फारच कमी झाले आहेत. त्यामुळे उत्पादन खर्च भरून निघतो की नाही याची चिंता बळीराजाला पडली आहे.देवळा, कळवण, सटाणा, मालेगाव या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात डाळिंबाच्या बागा होत्या. या अल्पशा पाण्यावर येणाऱ्या डाळिंबाने शेतकऱ्याला भरपूर पैसा व सुबत्ता दिली होती. परंतु डाळींबबागांवर तेल्या रोगाने थैमान घातल्याने चार-पाच वर्षे या बागांवर अतिरिक्त पैसा खर्च झाल्याने शेतकरीवर्ग मेटाकुटीस आला होता. शेवटी नाइलाजाने डाळिंबाच्या बागा उपटून फेकण्यात आल्या. उत्पादन खर्चही न मिळाल्याने कर्जबाजारीपणा वाढला. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उन्हाळ कांद्याची लागवड करण्यास प्रारंभ केला आहे. शेतकऱ्यांकडे खरिपाचा कांदा फारसा नाही. त्यामुळे दिवाळीनंतर आहे त्या पाण्यावर उन्हाळी कांदा लागवडीची शेतकरी तयारी करीत असतो. मात्र गेल्या पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या बेमोसमी पावसाने लागवडीस आलेली व नाजूक अवस्थेत असलेली रोपे पावसाने झोडपली गेली. त्यामुळे ही रोपे आता पिवळी पडून खराब होऊ लागली आहेत. त्यामुळे उन्हाळी कांद्याच्या क्षेत्रात घट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.चालू वर्षी उशिरा झालेल्या पावसामुळे खरिपाची पेरणी उशिरा झाली. पर्यायाने बाजरी, मका आदि पिकांची कापणी उशिरा झाली. शेतात उघड्यावर पडलेला मका व बाजरीचा कडबा या अवकाळी पावसामुळे भिजून खराब झाला आहे. त्यामुळे चाऱ्याची टंचाई आतापासूनच भासू लागली आहे. आता पुढील नियोजन कसे करावे याची चिंता शेतकऱ्याला सतावते आहे. आत्महत्त्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदतीची मागणीमालेगाव तालुक्यातील आत्महत्त्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना तातडीने शासकीय मदत देऊन सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणी मालेगाव तालुका काँग्रेस कमिटीतर्फे अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर प्रदेश कॉँग्रेस कार्यकारिणी सदस्य डॉ. तुषार शेवाळे, तालुका कॉँग्रेस अध्यक्ष डॉ. राजेंद्र ठाकरे यांच्या सह्या आहेत. मालेगावी थंडीच्या दिवसात उकाडागिसाका : मालेगाव शहर परिसरात यंदा नागरिकांना भर हिवाळ्यात उन्हाचा सामना करावा लागत असून, गुलाबी थंडीऐवजी उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत. त्यामुळे लोकांनी गेल्यावर्षी कपाटात बंद करून ठेवलेले उबदार कपडे अद्याप बाहेर काढलेले नाहीत. दरवर्षी नोेव्हेंबर महिन्यातच थंडीचा सामना करावा लागत असतो. (वार्ताहर)