शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले

By admin | Updated: December 3, 2015 21:50 IST

खरिपाचे नुकसान : कांदा भिजून खराब झाल्याने ‘दुष्काळात तेरावा महिना’

खामखेडा : नाशिक जिल्ह्यात पंधरा दिवसांपूर्वी बेमोसमी पावसाने तीन-चार दिवस धुमाकूळ घातल्याने शेतपिकांचे अतोनात नुकसान झाले असून, शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. या पावसाचा रब्बी पिकांना फायदा होणार असला तरी खरिपाचे नुकसान रब्बीने भरून निघणार नाही अशी परिस्थिती आहे. खरे तर खरिपाच्या प्रारंभापासूनच पावसाने शेतकऱ्यांची कसोटी पाहिली आहे. आणि आता शेतकऱ्यांची खरी परीक्षा निसर्गाचा लहरीपणा पाहत आहे.पंधरा दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह बेमोसमी पावसाने झोडपून काढले होते. त्यामुळे हाताशी आलेल्या खरिपाच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मुळातच पावसाळ्यात समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे नदी-नाले, धरणे कोरडी होती. त्यामुळे भूगर्भातील जलाशयाच्या पातळीत पाहिजे त्या प्रमाणात वाढ झाली नव्हती. अशा परिस्थितीत शेतकऱ्याने बी-बियाणे खर्च करत खरिपाची जणू परीक्षा दिली. उत्पादन किती निघते यावर पुढील गोष्टी ठरणार आहेत. कर्जाचा डोंगर मात्र सरेल अशी आशा वाटत नसल्याचा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. दरवर्षी दिवाळीआधी खरीप पिकांची काढणी होत असे. तसेच दिवाळीअगोदर पोळ कांद्याची काढणी होऊन कांदा विकला जात असे. दिवाळी सणासाठी शेतकऱ्यांच्या हातात दोन पैसे येत असल्याने तेवढाच दिलासा मिळत होता. परंतु चालू वर्षी पावसाअभावी उशिरा लागवड झाल्याने दिवाळीनंतर लाल कांदा तयार झाला. जो काही काढून तयार केला होता, तो या बेमोसमी पावसाने पूर्णपणे भिजून गेल्याने खराब झाला. शेतातील काढणीस आलेला कांदा शेतातच सडू लागल्याने हा कांदा कवडीमोल भावाने विकला जात आहे. कांद्याची आवक वाढल्याने कांद्याचे भाव फारच कमी झाले आहेत. त्यामुळे उत्पादन खर्च भरून निघतो की नाही याची चिंता बळीराजाला पडली आहे.देवळा, कळवण, सटाणा, मालेगाव या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात डाळिंबाच्या बागा होत्या. या अल्पशा पाण्यावर येणाऱ्या डाळिंबाने शेतकऱ्याला भरपूर पैसा व सुबत्ता दिली होती. परंतु डाळींबबागांवर तेल्या रोगाने थैमान घातल्याने चार-पाच वर्षे या बागांवर अतिरिक्त पैसा खर्च झाल्याने शेतकरीवर्ग मेटाकुटीस आला होता. शेवटी नाइलाजाने डाळिंबाच्या बागा उपटून फेकण्यात आल्या. उत्पादन खर्चही न मिळाल्याने कर्जबाजारीपणा वाढला. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उन्हाळ कांद्याची लागवड करण्यास प्रारंभ केला आहे. शेतकऱ्यांकडे खरिपाचा कांदा फारसा नाही. त्यामुळे दिवाळीनंतर आहे त्या पाण्यावर उन्हाळी कांदा लागवडीची शेतकरी तयारी करीत असतो. मात्र गेल्या पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या बेमोसमी पावसाने लागवडीस आलेली व नाजूक अवस्थेत असलेली रोपे पावसाने झोडपली गेली. त्यामुळे ही रोपे आता पिवळी पडून खराब होऊ लागली आहेत. त्यामुळे उन्हाळी कांद्याच्या क्षेत्रात घट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.चालू वर्षी उशिरा झालेल्या पावसामुळे खरिपाची पेरणी उशिरा झाली. पर्यायाने बाजरी, मका आदि पिकांची कापणी उशिरा झाली. शेतात उघड्यावर पडलेला मका व बाजरीचा कडबा या अवकाळी पावसामुळे भिजून खराब झाला आहे. त्यामुळे चाऱ्याची टंचाई आतापासूनच भासू लागली आहे. आता पुढील नियोजन कसे करावे याची चिंता शेतकऱ्याला सतावते आहे. आत्महत्त्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदतीची मागणीमालेगाव तालुक्यातील आत्महत्त्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना तातडीने शासकीय मदत देऊन सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणी मालेगाव तालुका काँग्रेस कमिटीतर्फे अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर प्रदेश कॉँग्रेस कार्यकारिणी सदस्य डॉ. तुषार शेवाळे, तालुका कॉँग्रेस अध्यक्ष डॉ. राजेंद्र ठाकरे यांच्या सह्या आहेत. मालेगावी थंडीच्या दिवसात उकाडागिसाका : मालेगाव शहर परिसरात यंदा नागरिकांना भर हिवाळ्यात उन्हाचा सामना करावा लागत असून, गुलाबी थंडीऐवजी उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत. त्यामुळे लोकांनी गेल्यावर्षी कपाटात बंद करून ठेवलेले उबदार कपडे अद्याप बाहेर काढलेले नाहीत. दरवर्षी नोेव्हेंबर महिन्यातच थंडीचा सामना करावा लागत असतो. (वार्ताहर)