शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

गणेशोत्सवात इको फ्रेंडली पिशव्यांची ‘ऊर्जा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 00:53 IST

आपलं नाशिक अन् माझ्या नाशिकचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक व अन्य शहरांसाठी प्रेरणादायी ठरावा, या उद्देशाने २००७ साली एका लोकप्रतिनिधीने तत्कालीन उपमहापौर असताना ‘ऊर्जा’ नावाचे प्रतिष्ठान स्थापन केले. या प्रतिष्ठानच्या माध्यमातून लाखो नाशिककरांच्या घरातून नदीपात्रात प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये जाणारे निर्माल्य रोखण्यासाठी पहिले पाऊल टाकण्यात आले. त्यासाठी हजारो इको फ्रेण्डली पिशव्या शाळाशाळांमधून घरोघरी पोहचविण्यास सुरुवात झाली.

आपलं नाशिक अन् माझ्या नाशिकचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक व अन्य शहरांसाठी प्रेरणादायी ठरावा, या उद्देशाने २००७ साली एका लोकप्रतिनिधीने तत्कालीन उपमहापौर असताना ‘ऊर्जा’ नावाचे प्रतिष्ठान स्थापन केले. या प्रतिष्ठानच्या माध्यमातून लाखो नाशिककरांच्या घरातून नदीपात्रात प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये जाणारे निर्माल्य रोखण्यासाठी पहिले पाऊल टाकण्यात आले. त्यासाठी हजारो इको फ्रेण्डली पिशव्या शाळाशाळांमधून घरोघरी पोहचविण्यास सुरुवात झाली. प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अजय बोरस्ते यांच्या संकल्पनेतून मागील दहा वर्षांपासून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची चळवळ अखंडितपणे शहरात राबविली जात आहे. प्रतिष्ठानचे सुमारे दोनशेहून अधिक स्वयंसेवक या चळवळीमध्ये स्वयंस्फूर्तीने सहभागी होत योगदान देतात. केवळ पर्यावरणपूरक पिशव्यांचे वाटप करण्यापर्यंतच हे प्रतिष्ठान थांबले नाही, तर भावी पिढीच्या हातातून गणराय कसे घडतील, हा वेगळा विचार केला गेला आणि तत्काळ मागील चार ते पाच वर्षांपासून मनपा व खासगी मराठी माध्यमांच्या शाळांमधून शाडूमातीपासून गणेशमूर्ती तयार करण्याच्या कार्यशाळेचा उपक्रम हाती घेतला. हा उपक्रमदेखील दरवर्षी विविध शाळांमधून ‘ऊर्जा’चे स्वयंसेवक राबविण्याचा यशस्वी प्रयत्न करीत आहे. यामुळे मुलांच्या बौद्धिक विकास होऊन त्यांच्या क लागुणांनाही वाव मिळतो आणि मातीपासून मूर्ती तयार करताना त्यांचा त्या मूर्तीवर जीवही जडतो, त्यामुळे बालगोपाळ हट्ट धरून पालकांना घरी शाडूच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याची मागणी करतात, हे अलीकडे दिसून येत असल्याचे बोरस्ते म्हणाले. यामुळे बहुतांश नाशिककरांच्या घरी शाडूमातीच्या गणरायाची प्रतिष्ठापना होऊ लागली आहे. निर्माल्य संकलन पिशव्या वाटपासोबत निर्माल्य संकलन केंद्रही अनंत चतुर्दशीला स्थापन केले जाते. केंद्रावर संकलित झालेल्या निर्माल्यापासून खतनिर्मितीचा प्रयोग राबविला जातो.