शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

गणेशोत्सवात इको फ्रेंडली पिशव्यांची ‘ऊर्जा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 00:53 IST

आपलं नाशिक अन् माझ्या नाशिकचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक व अन्य शहरांसाठी प्रेरणादायी ठरावा, या उद्देशाने २००७ साली एका लोकप्रतिनिधीने तत्कालीन उपमहापौर असताना ‘ऊर्जा’ नावाचे प्रतिष्ठान स्थापन केले. या प्रतिष्ठानच्या माध्यमातून लाखो नाशिककरांच्या घरातून नदीपात्रात प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये जाणारे निर्माल्य रोखण्यासाठी पहिले पाऊल टाकण्यात आले. त्यासाठी हजारो इको फ्रेण्डली पिशव्या शाळाशाळांमधून घरोघरी पोहचविण्यास सुरुवात झाली.

आपलं नाशिक अन् माझ्या नाशिकचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक व अन्य शहरांसाठी प्रेरणादायी ठरावा, या उद्देशाने २००७ साली एका लोकप्रतिनिधीने तत्कालीन उपमहापौर असताना ‘ऊर्जा’ नावाचे प्रतिष्ठान स्थापन केले. या प्रतिष्ठानच्या माध्यमातून लाखो नाशिककरांच्या घरातून नदीपात्रात प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये जाणारे निर्माल्य रोखण्यासाठी पहिले पाऊल टाकण्यात आले. त्यासाठी हजारो इको फ्रेण्डली पिशव्या शाळाशाळांमधून घरोघरी पोहचविण्यास सुरुवात झाली. प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अजय बोरस्ते यांच्या संकल्पनेतून मागील दहा वर्षांपासून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची चळवळ अखंडितपणे शहरात राबविली जात आहे. प्रतिष्ठानचे सुमारे दोनशेहून अधिक स्वयंसेवक या चळवळीमध्ये स्वयंस्फूर्तीने सहभागी होत योगदान देतात. केवळ पर्यावरणपूरक पिशव्यांचे वाटप करण्यापर्यंतच हे प्रतिष्ठान थांबले नाही, तर भावी पिढीच्या हातातून गणराय कसे घडतील, हा वेगळा विचार केला गेला आणि तत्काळ मागील चार ते पाच वर्षांपासून मनपा व खासगी मराठी माध्यमांच्या शाळांमधून शाडूमातीपासून गणेशमूर्ती तयार करण्याच्या कार्यशाळेचा उपक्रम हाती घेतला. हा उपक्रमदेखील दरवर्षी विविध शाळांमधून ‘ऊर्जा’चे स्वयंसेवक राबविण्याचा यशस्वी प्रयत्न करीत आहे. यामुळे मुलांच्या बौद्धिक विकास होऊन त्यांच्या क लागुणांनाही वाव मिळतो आणि मातीपासून मूर्ती तयार करताना त्यांचा त्या मूर्तीवर जीवही जडतो, त्यामुळे बालगोपाळ हट्ट धरून पालकांना घरी शाडूच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याची मागणी करतात, हे अलीकडे दिसून येत असल्याचे बोरस्ते म्हणाले. यामुळे बहुतांश नाशिककरांच्या घरी शाडूमातीच्या गणरायाची प्रतिष्ठापना होऊ लागली आहे. निर्माल्य संकलन पिशव्या वाटपासोबत निर्माल्य संकलन केंद्रही अनंत चतुर्दशीला स्थापन केले जाते. केंद्रावर संकलित झालेल्या निर्माल्यापासून खतनिर्मितीचा प्रयोग राबविला जातो.