शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
4
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
5
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
6
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
7
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
8
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
9
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
10
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
11
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
12
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
13
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
14
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
15
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
16
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
17
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
18
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
19
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
20
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल

पर्यावरणपूरक अंत्यसंस्कार : पंचवटी अमरधाममध्ये दोन मृतदेहांचा यशस्वी अंत्यविधी पहिल्याच प्रयोगातून वाचविले साडेसहाशे किलो लाकूड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 01:24 IST

नाशिक : अंत्येष्टीच्या पारंपरिक दहन पद्धतीलाच अनुसरून शेतकचºयापासून तयार केलेल्या मोक्षकाष्ठ (ब्रिकेट्स) द्वारे पर्यावरणपूरक अंत्यसंस्काराचा प्रभावी यशस्वी पर्याय पुढे आला

ठळक मुद्देपर्यावरणाच्या दृष्टीने शुभ वर्तमानमृतदेहावर मोक्षकाष्ठद्वारे अंत्यसंस्कार

नाशिक : अंत्येष्टीच्या पारंपरिक दहन पद्धतीलाच अनुसरून शेतकचºयापासून तयार केलेल्या मोक्षकाष्ठ (ब्रिकेट्स) द्वारे पर्यावरणपूरक अंत्यसंस्काराचा प्रभावी यशस्वी पर्याय पुढे आला. या धर्तीवर इको फ्रेण्डली लिव्हिंग फाउंडेशनच्या माध्यमातून शहरातील पंचवटी अमरधाममध्ये पहिला पर्यावरणपूरक अंत्यसंस्काराचा प्रयोग राबविला गेला. या प्रयोगाद्वारे एकूण साडेसहाशे किलो जळाऊ लाकूड वाचविण्यास मदत झाली, हे पर्यावरणाच्या दृष्टीने शुभ वर्तमान मानले जात आहे. भारतात दरवर्षी अंदाजे एक कोटी लोक मृत्युमुखी पडतात व त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी वापरल्या जाणाºया लाकडांच्या माध्यमातून जवळपास पंधरा वर्षे वयाची दोन कोटी झाडे कापली जातात. एकूणच पर्यावरणाची यामुळे मोठी हानी होते. या पारंपरिक अंत्यसंस्काराच्या पद्धतीला अस्तित्वात ठेवून मृतदेहावर अंत्यसंस्कार करायचे मात्र त्यासाठी लाकू डऐवजी मोक्षकाष्ठ वापरण्याची संकल्पना नौदलातून सेवानिवृत्त झालेले नागपूरचे विजय लिमये यांनी २०१५ साली पुढे आणली. नागपूर, यवतमाळ, भांडूप या शहरांमध्ये मोक्षकाष्ठद्वारे अंत्यसंस्काराची पद्धत स्वीकारली गेली आहे. या पद्धतीमुळे त्या ठिकाणी अंत्यसंस्कारासाठी लाकडाचा होणारा उपयोग थांबला आहे. नाशिकमध्येदेखील अंत्यसंस्काराची पद्धत जुनीच मात्र त्यासाठी लागणारे इंधन नवे यादृष्टीने प्रयत्न सुरू करण्यात आले आहे. शनिवारी (दि.३) पंचवटी अमरधाममध्ये दोघा कु टुंबीयांनी या पद्धतीचा स्वीकार करत त्यांच्या नातेवाइकांच्या मृतदेहावर मोक्षकाष्ठद्वारे अंत्यसंस्कार केले. यावेळी इको फ्रे ण्डली फाउंडेशनचे लिमये, योगेश शास्त्री, मिलिंद पगारे, जितेंद्र भाबे आदींनी उपस्थित राहून हा प्रयोग कितपत यशस्वी झाला हे पडताळून बघितले.एका मृतदेहासाठी २५० किलो मोक्षकाष्ठएका मृतदेहावर अंत्यसंस्कारासाठी सरकारी नियमानुसार साडेतीनशे किलो लाकूड दिले जाते. यासाठी अंत्यसंस्काराला सुमारे दोन हजार रुपयांचा खर्च येतो व तितकाच खर्च पर्यावरणपूरक मोक्षकाष्ठ वापरून अंत्यसंस्कारासाठीही येतो; मात्र लाकूड वाचते पर्यायाने वृक्षतोडीलाही आळा बसण्यास मदत होते. अमरधाममध्ये पहिल्या प्रयोगात एका मृतदेहावर पर्यावरणपूरक अंत्यसंस्कारासाठी २५० किलो मोक्षकाष्ठ लागले. या प्रयोगातून सुमारे पन्नास वर्षे जुनी दोनी मोठी झाडे वाचल्याचे लिमये म्हणाले. अंत्यसंस्काराची पद्धत जुनीच मात्र इंधन नवे हा बदल स्वीकारला तर भावी पिढीला नक्कीच हरित वसुंधरा सोपविता येईल, असा विश्वास लिमये यांनी व्यक्त केला.