शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

दळवट परिसरात भूकंपाचे धक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 18:21 IST

ग्रामस्थांमध्ये घबराट : ऐन थंडीत रात्र घराबाहेर

ठळक मुद्दे शासनस्तरावरु न याबाबत उपाययोजना करु न दिलासा द्यावा, अशी मागणी या भागातील आदीवासी बांधवांनी केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककळवण : भूकंपप्रवण क्षेत्र असलेल्या दळवटसह परिसरातील पळसदर, सुकापूर, मोहपाडा ,बिलवाडी, देवळीवणी, चिचंपाडा, बोरदैवत, जामलेवणी, देवळीकराड ,खिराड आदी भागात गेल्या रविवार(दि.२७) पासून भूकंपाचे धक्के जाणवल्याने परिसरातील आदिवासी बांधव भयभयीत झाले आहेत. त्यामुळे ऐन थंडीत आदिवासी बांधवांना घराबाहेर रात्र जागून काढावी लागत आहे.बिलवाडी, देवळीवणी, चिचंपाडा , जामलेवणी, देवळीकराड,खिराड येथील आदीवासी बांधव गेल्या तीन दिवसांपासून रात्र घराबाहेर जागून काढत असून त्यात वाढलेल्या थंडीमुळे शेकोटीचा आसरा घ्यावा लागत आहे. रविवारपासून धक्के बसत आहेत. रविवारी रात्री परिसरात भूकंपाचे धक्के बसले मात्र रात्रअसल्याने फारसे लक्षात आले नाही. सकाळी मात्र पुन्हा धक्के बसल्याचे जाणवले. त्यावेळी वीजतारा झोक्यासारख्या हलत होत्या. वीजेचे खांबही हलत होते, काही घरातील भांडे पडली तर पत्र्यांच्या घरांना हादरे बसले. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याचे पंचायत समिती सदस्य जगन साबळे, सरपंच लक्ष्मण गायकवाड, पोपट महाले , हिरामण साबळे, देवीदास साबळे, यादव चव्हाण, धनराज चव्हाण, मनोहर बागूल , सोमनाथ गायकवाड, लहानू साबळे , रंगनाथ भोये , कृष्णा पवार, दौलत पवार ,देवळीवणीचे सरपंच कृष्णा चव्हाण , युवराज चव्हाण यांनी सांगितले.मात्र, या धक्क्याने कुठलेही नुकसान झाले नसल्याचे आदिवासी बांधवांनी सांगितले,दरम्यान जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ जयश्री पवार , जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार, बाजार समिती संचालक डी.एम. गायकवाड, अभोणा शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सोमनाथ सोनवणे यांनी भूकंपाचे धक्के बसलेल्या गावांना भेटी देऊन अधिक माहिती जाणून घेतली. यावेळी त्यांनी भयभीत झालेल्या आदिवासी बांधवांना दिलासा दिला. शासनस्तरावरु न याबाबत उपाययोजना करु न दिलासा द्यावा, अशी मागणी या भागातील आदीवासी बांधवांनी केली आहे.आता तरी लक्ष द्याबिलवाडी, बोरदैवत, देवळीवणी ,चिंचपाडा, खिराड आदी परिसरात भूकंपाचे धक्के बसत आहेत. आदिवासी बांधवांना या भागात बीएसएनएल व अन्य कंपनीची सेवा सुरळीत मिळत नाही. त्यामुळे येथून कुठेही संपर्क करता येत नाही. काही माहिती द्यायची असेल तर बाहेर जावून भ्रमणध्वनी करावा लागतो. अशा परिस्थितीत काही अघटीत घडले तर आम्ही करायचे काय, असा संतप्त सवाल आदिवासी बांधवांनी केला आहे .

टॅग्स :EarthquakeभूकंपNashikनाशिक