शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
4
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
5
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
6
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
7
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
8
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
9
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
10
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
11
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
12
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
13
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
14
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
15
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
16
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
17
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
18
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

दळवट परिसरात भूकंपाचे धक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 18:21 IST

ग्रामस्थांमध्ये घबराट : ऐन थंडीत रात्र घराबाहेर

ठळक मुद्दे शासनस्तरावरु न याबाबत उपाययोजना करु न दिलासा द्यावा, अशी मागणी या भागातील आदीवासी बांधवांनी केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककळवण : भूकंपप्रवण क्षेत्र असलेल्या दळवटसह परिसरातील पळसदर, सुकापूर, मोहपाडा ,बिलवाडी, देवळीवणी, चिचंपाडा, बोरदैवत, जामलेवणी, देवळीकराड ,खिराड आदी भागात गेल्या रविवार(दि.२७) पासून भूकंपाचे धक्के जाणवल्याने परिसरातील आदिवासी बांधव भयभयीत झाले आहेत. त्यामुळे ऐन थंडीत आदिवासी बांधवांना घराबाहेर रात्र जागून काढावी लागत आहे.बिलवाडी, देवळीवणी, चिचंपाडा , जामलेवणी, देवळीकराड,खिराड येथील आदीवासी बांधव गेल्या तीन दिवसांपासून रात्र घराबाहेर जागून काढत असून त्यात वाढलेल्या थंडीमुळे शेकोटीचा आसरा घ्यावा लागत आहे. रविवारपासून धक्के बसत आहेत. रविवारी रात्री परिसरात भूकंपाचे धक्के बसले मात्र रात्रअसल्याने फारसे लक्षात आले नाही. सकाळी मात्र पुन्हा धक्के बसल्याचे जाणवले. त्यावेळी वीजतारा झोक्यासारख्या हलत होत्या. वीजेचे खांबही हलत होते, काही घरातील भांडे पडली तर पत्र्यांच्या घरांना हादरे बसले. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याचे पंचायत समिती सदस्य जगन साबळे, सरपंच लक्ष्मण गायकवाड, पोपट महाले , हिरामण साबळे, देवीदास साबळे, यादव चव्हाण, धनराज चव्हाण, मनोहर बागूल , सोमनाथ गायकवाड, लहानू साबळे , रंगनाथ भोये , कृष्णा पवार, दौलत पवार ,देवळीवणीचे सरपंच कृष्णा चव्हाण , युवराज चव्हाण यांनी सांगितले.मात्र, या धक्क्याने कुठलेही नुकसान झाले नसल्याचे आदिवासी बांधवांनी सांगितले,दरम्यान जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ जयश्री पवार , जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार, बाजार समिती संचालक डी.एम. गायकवाड, अभोणा शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सोमनाथ सोनवणे यांनी भूकंपाचे धक्के बसलेल्या गावांना भेटी देऊन अधिक माहिती जाणून घेतली. यावेळी त्यांनी भयभीत झालेल्या आदिवासी बांधवांना दिलासा दिला. शासनस्तरावरु न याबाबत उपाययोजना करु न दिलासा द्यावा, अशी मागणी या भागातील आदीवासी बांधवांनी केली आहे.आता तरी लक्ष द्याबिलवाडी, बोरदैवत, देवळीवणी ,चिंचपाडा, खिराड आदी परिसरात भूकंपाचे धक्के बसत आहेत. आदिवासी बांधवांना या भागात बीएसएनएल व अन्य कंपनीची सेवा सुरळीत मिळत नाही. त्यामुळे येथून कुठेही संपर्क करता येत नाही. काही माहिती द्यायची असेल तर बाहेर जावून भ्रमणध्वनी करावा लागतो. अशा परिस्थितीत काही अघटीत घडले तर आम्ही करायचे काय, असा संतप्त सवाल आदिवासी बांधवांनी केला आहे .

टॅग्स :EarthquakeभूकंपNashikनाशिक