शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
4
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
5
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
6
निलेश साबळेनेच मला बाईचं कॅरेक्टर करायला सांगितलं होतं, भाऊ कदमचा खुलासा
7
भूपतीचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव, जगन म्हणतो शस्त्र ठेवणार नाही ! माओवादी संघटनेतील वाद चव्हाट्यावर
8
१०० वर्षांनी शुभ योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: ६ मूलांकांचे ग्रहण सुटेल; पैसा-लाभ-वरदान!
9
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
10
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
11
हृदयस्पर्शी! "आई-वडिलांना सोडून मुलगी गेली लंडनला"; ८० वर्षांचे आजोबा ट्रेनमध्ये विकतात पदार्थ
12
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
13
GST Rate Cut: ५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
14
Hanuman Temple: 'या' मंदिरात हनुमान निद्रावस्थेत, तरीही केवळ दर्शनाने पूर्ण होते भक्तांची प्रत्येक इच्छा 
15
Vivo Y50i: झटक्यात चार्ज होणार आणि दिर्घकाळ चालणार; विवोचा बजेट स्मार्टफोन बाजारात!
16
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
17
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
18
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
19
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
20
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क

दळवट परिसरात भूकंपाचे धक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 18:21 IST

ग्रामस्थांमध्ये घबराट : ऐन थंडीत रात्र घराबाहेर

ठळक मुद्दे शासनस्तरावरु न याबाबत उपाययोजना करु न दिलासा द्यावा, अशी मागणी या भागातील आदीवासी बांधवांनी केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककळवण : भूकंपप्रवण क्षेत्र असलेल्या दळवटसह परिसरातील पळसदर, सुकापूर, मोहपाडा ,बिलवाडी, देवळीवणी, चिचंपाडा, बोरदैवत, जामलेवणी, देवळीकराड ,खिराड आदी भागात गेल्या रविवार(दि.२७) पासून भूकंपाचे धक्के जाणवल्याने परिसरातील आदिवासी बांधव भयभयीत झाले आहेत. त्यामुळे ऐन थंडीत आदिवासी बांधवांना घराबाहेर रात्र जागून काढावी लागत आहे.बिलवाडी, देवळीवणी, चिचंपाडा , जामलेवणी, देवळीकराड,खिराड येथील आदीवासी बांधव गेल्या तीन दिवसांपासून रात्र घराबाहेर जागून काढत असून त्यात वाढलेल्या थंडीमुळे शेकोटीचा आसरा घ्यावा लागत आहे. रविवारपासून धक्के बसत आहेत. रविवारी रात्री परिसरात भूकंपाचे धक्के बसले मात्र रात्रअसल्याने फारसे लक्षात आले नाही. सकाळी मात्र पुन्हा धक्के बसल्याचे जाणवले. त्यावेळी वीजतारा झोक्यासारख्या हलत होत्या. वीजेचे खांबही हलत होते, काही घरातील भांडे पडली तर पत्र्यांच्या घरांना हादरे बसले. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याचे पंचायत समिती सदस्य जगन साबळे, सरपंच लक्ष्मण गायकवाड, पोपट महाले , हिरामण साबळे, देवीदास साबळे, यादव चव्हाण, धनराज चव्हाण, मनोहर बागूल , सोमनाथ गायकवाड, लहानू साबळे , रंगनाथ भोये , कृष्णा पवार, दौलत पवार ,देवळीवणीचे सरपंच कृष्णा चव्हाण , युवराज चव्हाण यांनी सांगितले.मात्र, या धक्क्याने कुठलेही नुकसान झाले नसल्याचे आदिवासी बांधवांनी सांगितले,दरम्यान जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ जयश्री पवार , जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार, बाजार समिती संचालक डी.एम. गायकवाड, अभोणा शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सोमनाथ सोनवणे यांनी भूकंपाचे धक्के बसलेल्या गावांना भेटी देऊन अधिक माहिती जाणून घेतली. यावेळी त्यांनी भयभीत झालेल्या आदिवासी बांधवांना दिलासा दिला. शासनस्तरावरु न याबाबत उपाययोजना करु न दिलासा द्यावा, अशी मागणी या भागातील आदीवासी बांधवांनी केली आहे.आता तरी लक्ष द्याबिलवाडी, बोरदैवत, देवळीवणी ,चिंचपाडा, खिराड आदी परिसरात भूकंपाचे धक्के बसत आहेत. आदिवासी बांधवांना या भागात बीएसएनएल व अन्य कंपनीची सेवा सुरळीत मिळत नाही. त्यामुळे येथून कुठेही संपर्क करता येत नाही. काही माहिती द्यायची असेल तर बाहेर जावून भ्रमणध्वनी करावा लागतो. अशा परिस्थितीत काही अघटीत घडले तर आम्ही करायचे काय, असा संतप्त सवाल आदिवासी बांधवांनी केला आहे .

टॅग्स :EarthquakeभूकंपNashikनाशिक