शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

कृषिमंत्र्यांनी टोचले पालकमंत्र्यांचे कान

By admin | Updated: March 22, 2015 00:27 IST

कृषिमंत्र्यांनी टोचले पालकमंत्र्यांचे कान

नाशिक : गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी व आत्महत्त्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी वेळ मिळत नसल्याचा आरोप असलेले पालकमंत्री गिरीश महाजन यांनी काल (दि.२१) शेतकऱ्यांमध्ये रोष असल्याचे कारण यंत्रणेने देऊन आपल्याला येथे येऊ दिले नाही, असा खुलासा केला. यावेळी अधिवेशन सुरू असल्याने काही घोषणा अथवा मदत जाहीर करता येणार नाही, असे सांगणाऱ्या पालकमंत्री गिरीश महाजन यांना केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग यांनी नाही मदत तर शेतकऱ्यांना निदान आश्वस्त तरी करा, असे सांगत कान टोचल्याचा प्रकार वनसगाव येथील सभेत घडला.खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग यांना नाशिक जिल्ह्णातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्याबाबत निवेदन दिले होते. त्यानुसार तत्काळ केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग यांनी निफाड तालुक्यातील वनसगाव, सारोळे यांसह काही गावांत पाहणी दौरा केला. यावेळी वनसगाव येथे नुकसानग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर शेतकऱ्यांशी राधामोहन सिंग यांच्यासह महसूल व कृषिमंत्री एकनाथ खडसे आणि जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्णाचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी संवाद साधला. त्यावेळी एकनाथ खडसे यांनी अधिवेशन सुरू असल्याने आपल्याला येथे मदत अथवा काही घोषणा करता येणार नाही. नाही तर हक्कभंग होईल. मात्र, शेतकऱ्यांना सवलत व कर्जमाफीबाबत आवश्यक ती कार्यवाही करता येईल. तोच धागा पकडून पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आपल्याला आता काही मदत जाहीर करता येणार नाही. आपणही गेल्या २५ वर्षांपासून विधानसभेत आहोत. संघर्षातूनच मोठे झाले आहोत. मागील वेळी सिन्नरवरून आपण येथे येणार होतो. मात्र, प्रशासन व पोलीस यंत्रणेने शेतकऱ्यांमध्ये रोष असल्याचे सांगत आपल्याला येऊ दिले नाही. म्हणून आपण आज आल्याचे सांगितले. त्याचवेळी राधामोहन सिंग यांनी मदत नाही, तर निदान शेतकऱ्यांंना आश्वास्त तर करा, असे सांगितल्यानंतर पालकमंत्री गिरीश महाजन यांनी शेतकऱ्यांना लवकरच नुकसानीबाबत आवश्यक ती मदत देण्याचा प्रयत्न करेल, असे सांगितले. यावेळी खासदार हेमंत गोडसे, खासदार डॉ. सुभाष भामरे,आमदार अनिल कदम, माजी आमदार दिलीप बनकर आदि उपस्थित होते.(प्रतिनिधी)