शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

दिंडोरी तालुक्यात ४३६२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांची ई-पीक नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2020 16:41 IST

दिंडोरी : राज्यातील ई-पीक पाहणीचा पथदर्शी प्रकल्प दिंडोरी तालुक्यात राबविण्यात येत असून, जुलैअखेरपर्यंत ३६१९ शेतकऱ्यांच्या ४३६२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांची ई-पीक नोंदणी झाली असल्याची माहिती प्रांताधिकारी डॉ. संदीप आहेर, तहसीलदार कैलास पवार यांनी दिली.

ठळक मुद्दे पिकाचा फोटो अपलोड करायचा आहे. ही नोंद तलाठीला आॅनलाइन दिसणार

दिंडोरी : राज्यातील ई-पीक पाहणीचा पथदर्शी प्रकल्प दिंडोरी तालुक्यात राबविण्यात येत असून, जुलैअखेरपर्यंत ३६१९ शेतकऱ्यांच्या ४३६२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांची ई-पीक नोंदणी झाली असल्याची माहिती प्रांताधिकारी डॉ. संदीप आहेर, तहसीलदार कैलास पवार यांनी दिली.नाशिक विभागातून दिंडोरी तालुक्याची ई-पीक पाहणी नोंदणीसाठी पथदर्शी प्रकल्प म्हणून निवड झालेली आहे. तालुक्यात हा प्रकल्प फेब्रुवारी २०१९ पासून राबवण्यात येत आहे. तालुक्यात एकूण ६७,०६४ पैकी ५६,४२६ खातेदारांची आतापर्यंत प्राथमिक नोंदणी झालेली आहे. तालुक्यातील सर्व तलाठी व कृषी सहायक तसेच जिल्हा व तालुकास्तरावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे राज्यस्तरीय प्रशिक्षण नुकतेच पार पडले. राज्यस्तरावरून या प्रकल्पाचे प्रमुख मार्गदर्शक व राज्याचे माजी मुख्य सचिव डॉ. जयंतकुमार बांठीया, संभाजी कडू पाटील, प्रकल्प सल्लागार रामदास जगताप, राज्य समन्वयक, ई-फेरफार प्रकल्प जमाबंदी आयुक्त कार्यालय, पुणे यांनी मार्गदर्शन केले. दिंडोरी तालुक्याचे ई-पीक पाहणी कामकाजाचे सूक्ष्म नियोजन करण्यासाठी अधिकाºयांसमवेत आढावा बैठक पार पडली. दिंडोरी तालुक्यातील पोलीसपाटील, कोलवाल, कृषिमित्र, मोबाइलदूत, स्वस्त धान्य दुकानदार, ई-सेतु केंद्रधारक व शेतकरी गटांनाही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मोबाइल अ‍ॅपवर पीक-पाहणी करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. चालू वर्षाच्या खरीप हंगामातील पीक पाहणीला सुरुवात झाली असून, या वर्षीच्या खरीप हंगामातील संपूर्ण पीक पाहणी ही फक्त मोबाइल अ‍ॅपच्या माध्यमातून केली जाणार असल्याने सर्व शेतकºयांनी आपल्या पिकांची नोंदणी स्वत: करणे आवश्यक आहे, असे कळविण्यात आले आहे.ई-पीक नोंदणीप्रक्रि याशेतकºयांनी मोबाइलवर ई-पीक पाहणी अ‍ॅपद्वारे आपल्या पिकांची नोंदणी करावयाची असून, आपल्या पिकाचा फोटो अपलोड करायचा आहे. ही नोंद तलाठीला आॅनलाइन दिसणार असून, त्यांनी मान्यता देताच सातबारा उताºयावर आॅनलाइन नोंद होणार आहे.ई-पीक नोंदणीचे फायदेआॅनलाइन नोंदणीमुळे अचूक व गतीने माहिती संकलित होणार आहे. या माहितीचा उपयोग शासनाला कृषी धोरण आखताना होणार असून, पीककर्ज, पीकविमा कर्जमाफी, नैसर्गिक आपत्तीचे नियोजन, शासकीय खरेदी केंद्रावर शेतमाल खरेदी-विक्र ी करणे या कामकाजात सुलभता आणण्यास व तलाठी यांच्याकडील कामाचा बोजा कमी करण्यास मदत होणार आहे.

टॅग्स :agricultureशेतीGovernmentसरकार