शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

रंगात रंगणार दत्त पालखी सोहळा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 22:39 IST

कसबे सुकेणे : महानुभाव पंथीयांचे प्रमुख तीर्थस्थळ व संपूर्ण राज्यात प्रति गाणगापूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या मौजे सुकेणे येथील दत्त यात्रोत्सवास शुक्रवारपासून (दि.१३, रंगपंचमी) प्रारंभ होत आहे. सप्तरंगात रंगणाऱ्या या पालखी सोहळ्यावर कोरोनो या संसर्गजन्य आजाराच्या भीतीचे सावट असले तरीही जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागातून भाविक दाखल झाले आहेत.

ठळक मुद्देश्रीक्षेत्र मौजे सुकेणे : दत्त यात्रोत्सवास प्रारंभ, तयारी पूर्ण, भाविकांचा उत्साह; वाढीव पोलीस बंदोबस्त

लोकमत न्यूज नेटवर्ककसबे सुकेणे : महानुभाव पंथीयांचे प्रमुख तीर्थस्थळ व संपूर्ण राज्यात प्रति गाणगापूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या मौजे सुकेणे येथील दत्त यात्रोत्सवास शुक्रवारपासून (दि.१३, रंगपंचमी) प्रारंभ होत आहे. सप्तरंगात रंगणाऱ्या या पालखी सोहळ्यावर कोरोनो या संसर्गजन्य आजाराच्या भीतीचे सावट असले तरीही जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागातून भाविक दाखल झाले आहेत.मौजे सुकेणेची दत्त यात्रा संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. रंगाची यात्रा म्हणून ही यात्रा राज्यभरात ओळखली जाते. श्रीक्षेत्र मौजे सुकेणे हे महानुभाव पंथीयांचे प्रमुख तीर्थस्थळ असून, याठिकाणी चक्रधर स्वामींचा एक दिवसाचा मुक्काम होता. या यात्रेला पेशवेकालीन परंपरा असून, दत्त प्रभू पालखीपुढे उधळणारा रंग हा प्रसाद म्हणून भाविक अंगावर घेतात, अशी येथे श्रद्धा आहे.पाच दिवस चालणाºया या यात्रेत संपूर्ण देशातील महानुभाव पंथीय भाविक सहभागी होतात. याठिकाणी विडा अवसर, नारळ, ही पूजा देवाला भाविक आवर्जून वाहतात व नवसपूर्ती करतात. यात्रेत रेवडी, गुढीपाडव्याचे गोड हार-कडे, गोडीशेव, जिलेबी याची मोठ्या प्रमाणात विक्र ी होते.यात्रेच्या पूर्वसंध्येला राज्याच्या विविध भागातून यात्रेकरू भाविक, महानुभाव संत-महंत व व्यावसायिक डेरेदाखल झाल्याने श्रीक्षेत्र मौजे सुकेणे गजबजले आहे.पालखीपुढे रंगांची उधळण चार दिवस चालणाºया उत्सवास दि. १३ मार्चपासून रंगपंचमीपासून दत्त पालखी सोहळ्याने प्रारंभ होत आहे. रंगपंचमीच्या दिवशी दुपारी पूर्व महाप्रवेशद्वारातून मान्यवरांच्या हस्ते पालखी, चरणांकित स्थान यांची महापूजा होणार असून, त्यानंतर पालखीचे प्रस्थान होणार आहे. या यात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे पालखीपुढे रंगांची होणारी उधळण आणि भाविकांचा जल्लोष पाहण्यासारखा असतो. सुमारे दीड ते दोन लाख भाविक पालखी सोहळ्यात सहभागी होतात. सुमारे तेरा तास हा सोहळा रंगपंचमीच्या दुपारपासून ते दुसºया दिवशी पहाटेपर्यंत सप्तरंगात न्हाऊन निघतो. नाशिक, मुंबई, ठाणे, औरंगाबाद, जळगाव, धुळे, नगर आणि गुजरात राज्यातील भाविक या यात्रेत सहभागी होतात.सुकेणेत अवरले चैतन्यपर्व भैरवनाथ-जोगेश्वरी, दवप्रभू यांची यात्रा आणि दावशावली बाबा यांचा उरूस असा सलग पाच दिवसांचा उत्सव होत असल्याने सध्या परिसर दुमदुमला आहे. गावातील रस्ते, मंदिरे, बाजारपेठ विद्युत रोषणाईने झळाळले असून, बाहेरगावचे भाविक आणि व्यावसायिक डेरेदाखल झाल्याने चैतन्य पर्व निर्माण झाले आहे.ग्रामपालिकेकडून जय्यत तयारी, मंदिराला विद्युत रोषणाई, सुरक्षेसाठी सीसीटीव्ही दत्त मंदिर संस्थान आणि ग्रामपालिका प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. यात्रेकरू भाविकांना जागा, पाणी, विजेची व्यवस्था तसेच बाणगंगा नदीपात्राची स्वच्छता करून दरवर्षीप्रमाणे नदीपात्रातही रहाट पाळणे, व्यावसायिकांना जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती सरपंच सुरेखा चव्हाण व उपसरपंच सचिन मोगल यांनी दिली. दत्त मंदिर संस्थानाच्या वतीने पालखी सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, मंदिराला रंगरंगोटी, विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.४मंदिरात भाविकांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्हीकॅमेरे तैनात करण्यात आले आहेत. संपूर्ण मंदिर परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त राहणार आहे.४भाविकांना सुलभ दर्शनासाठी महिला व पुरु षांसाठी एकेरी दर्शन रांगेची व्यवस्था दत्त मंदिराने केली आहे, अशी माहिती महंत पूज्य मनोहरशास्त्री सुकेणेकर, बाळकृष्णराज सुकेणेकर, अर्जुनराज सुकेणेकर, पूज्य राजधरराज सुकेणेकर व सुकेणकर संत परिवाराने दिली.कोरोनामुळे स्वच्छता पाळण्याच्या सूचना आरोग्य विभागाच्या सूचनेप्रमाणे यात्राकाळात भाविकांनी वैयक्तिक स्वच्छता पाळावी, भाविकांनी मास्क वापरावे, कुठल्याही वस्तूला हात लावल्यानंतर सतत स्वच्छ हात धुवावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

टॅग्स :nifadनिफाडTempleमंदिर