शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शेतपीकांवर धुळीची चादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 19:18 IST

मागील सहा महिन्यांपासुन कासव गतीने सुरु असलेल्या रस्त्याच्या कामामुळे परिसरातील द्राक्षबागांसह शेतपिकांवर धुळीची चादर जमा झाली असून शेतकरी व रहिवाशी मेटाकुटीला आलेला आह

ठळक मुद्देपीके धोक्यात : खेडलेझुंगे परिसरात रस्त्याची कामे संथगतीने

खेडलेझुंगे : मागील सहा महिन्यांपासुन कासव गतीने सुरु असलेल्या रस्त्याच्या कामामुळे परिसरातील द्राक्षबागांसह शेतपिकांवर धुळीची चादर जमा झाली असून शेतकरी व रहिवाशी मेटाकुटीला आलेला आहअवकाळीने शेतकर्यांचे कंबरडे मोडलेले असतांना वातावरणातील दैनंदिन बदलावामुळे हैराण झालेला शेतकरी रस्त्यावरील धुळीमुळे मेटाकुटीला आहेला आहे. औषध फवारण्या करु नही पीकांचे आरोग्य धोक्यात आहे. कारण फवारणी केलेली औषध धुळीकण शोषुन घेतात. त्यामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव मोठ्याप्रमाणावर दिसुन येत आहे. दिवसातुन दोन वेळेस औषध फवारणी करण्यात येत आहे परंतु पिकांवरील रोगाचा प्रादुर्भाव कमी होतांना दिसुन येत नाही.कासवगतीने सुरु असलेल्या रस्त्याच्या कामामुळे परिसरातील पीकांवर धुळीची चादर पसरु न पिकांची मोठ्याप्रमाणावर नुकासन होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग जाणुबुजुन सदरच्या रस्त्याचे काम अंत्यत धीम्यागतीने करत असल्याचा परिसरात चर्चा सुरु आहे. धारणगांव, खेडला, रु ई, कोळगांव, सारोळेथडी परिसरातुन सिन्नर, शिर्डी,अहमदनगर, पुणे सारख्या शहरांकडे जाण्यासाठीचा एकमेव रस्ता आहे. त्यामुळे या रस्त्याने दिवस-रात्र वाहनांची मोठ्याप्रमाणावर वाहतुक सुरु असते. शेतकर्यांची शेतीमाल खरेदी, शेतीसाठी उपयुक्त साहीत्य वाहतुक सुरु च असते. केवळ रस्त्याचे काम संतगतीने होत असल्याने रस्त्यावरील धुळीकण हे पिकांवर बसत आहे. त्यामुळे द्राक्ष व कांद्यासारख्या महागड्या पिकांची अतोनात नुकसान होत आहे. रस्त्यावरील वाहनांच्या ये-जा मुळे उडणार्या धुळीचे कण द्राक्षबाग, कांदे, गव्हु, हरभर, कारल्याच्या बांगावर धुळीची चादर पसरलेली आहे.वातवरणातील सततच्या बदालावामुळे शेतकर्यांचे अतोनात नुकसान होत आहेच. त्यातच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळेही शेतकर्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकासन होत आहे. मागील 6 मिहन्यांपासुन सुरु असलेल्या कामामुळे येथील वाहतुकीस मोठ्याप्रमाणावर अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे शेतकर्यांचे वाहनांचेही मोठ्याप्रमाणावर नुकासन होत आहे. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे रु ई-कोळगांव बस सेवा मागील मिहन्यांपासुन बंद करण्यात आलेली आहे. त्यामुळे परिसरातुन सार्वजनिक बांधकाम विभागावर मोठ्याप्रमाणावर नाराजगी व्यक्त केली जात आहे. पुढील पंधारवाड्यामध्ये सदरील कामे चांगल्या प्रतीमध्ये पुर्ण केले नाही तर गावातील राजकीय पुढारी कठोर पाऊले उचलण्याच्या बेतात आहे.

टॅग्स :Nashikनाशिकagricultureशेती