शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

उमेदवारांसाठी दसरा ठरला फलदायी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2019 00:41 IST

नाशिक : ‘दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा’ असे ज्याचे वर्णन केले जाते, त्या दसरा सणापासूनच खऱ्या अर्थाने निवडणुकीच्या प्रचाराला वेग देण्याची वेळ इच्छुकांवर आली आहे. त्यामुळे महानगरासह जिल्हाभरातील इच्छुकांच्या हक्काच्या कार्यकर्त्यांना सकाळपासूनच प्रचाराला लागण्यास सांगण्यात आल्याने सर्वच इच्छुकांचे निकटचे कार्यकर्ते घरचं तोरण बांधून सकाळपासूनच उमेदवारांच्या कार्यालयात जमा होऊन प्रचाराला लागले. सुट्टीचा दिवस असल्याने बहुतांश नागरिक घरीच असण्याच्या संधीचा लाभ उठवत उमेदवारांनी प्रचार केल्याने मतांच्या सोन्यात भर घालण्यासाठी उमेदवारांसाठी दसरा फलदायी ठरला.

ठळक मुद्दे दसरा सणापासूनच खऱ्या अर्थाने निवडणुकीच्या प्रचाराला वेग

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : ‘दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा’ असे ज्याचे वर्णन केले जाते, त्या दसरा सणापासूनच खऱ्या अर्थाने निवडणुकीच्या प्रचाराला वेग देण्याची वेळ इच्छुकांवर आली आहे. त्यामुळे महानगरासह जिल्हाभरातील इच्छुकांच्या हक्काच्या कार्यकर्त्यांना सकाळपासूनच प्रचाराला लागण्यास सांगण्यात आल्याने सर्वच इच्छुकांचे निकटचे कार्यकर्ते घरचं तोरण बांधून सकाळपासूनच उमेदवारांच्या कार्यालयात जमा होऊन प्रचाराला लागले. सुट्टीचा दिवस असल्याने बहुतांश नागरिक घरीच असण्याच्या संधीचा लाभ उठवत उमेदवारांनी प्रचार केल्याने मतांच्या सोन्यात भर घालण्यासाठी उमेदवारांसाठी दसरा फलदायी ठरला.या दशकात राजकारण आणि प्रचाराचे सगळेच रंग बदलले आहेत. बदलत्या काळात वॉररूम आणि आॅनलाइन प्रचाराला जास्त महत्त्व मिळाले आहे. हे खरे असले तरी निकटचे कार्यकर्ते, तळमळीचे कार्यकर्ते तसेच नातेसंबंधातल्या कार्यकर्त्यांचे महत्त्व यत्किंचितही कमी झालेले नाही. किंबहुना पूर्वीसारखे पक्षाच्या हक्काच्या कार्यकर्त्यांची वानवा झालेली असताना अशा हक्काच्या, घरच्या कार्यकर्त्यांचे महत्त्व अधिकच वाढले आहे.साडेतीन मुहूर्तांपैकी एक समजला जाणारा दसºयासारख्या आनंदाचा दिवस आपल्या कुटुंबासह आनंदात व्यतित करावा, अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. मात्र, प्रचाराचा ज्वर वाढविण्यासाठी तसेच सर्व कुटुंबीय घरी एकत्रित मिळण्यासाठी दसºयाचा सुट्टीचा दिवस उपयुक्त असल्याने कार्यकर्त्यांसह उमेदवार देखील सकाळपासूनच गल्लोगल्ली फिरून संपर्क अभियान राबवू लागले. काही मतदारांनी घेतली फिरकीकाही उमेदवार गल्लोगल्लीतील रस्त्यांवरून फिरत मतदारांना आवाहन करीत होते, तर काहीजण प्रत्यक्ष घरोघरी फिरूनदेखील प्रचार करीत होते. अशावेळी मतदारांच्या घरातून उमेदवारांना शुभेच्छांसह आपट्याची पाने अर्थात सोने देऊन शुभेच्छादेखील दिल्या जात होत्या. मात्र, दोन-चार ठिकाणी काही चतुर मतदारांनी उमेदवारांनाच आम्ही तुमच्या सोन्याची वाट पाहतोय, असे सांगत ऐन प्रचारातदेखील उमेदवारांची फिरकी घेतल्याच्या घटना घडल्या.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Dasaraदसरा