शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

स्थिर सरकारच्या काळात देशाच्या प्रगतीचा वेग चांगला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 16:12 IST

येवला : ज्या काळात देशात शांतता व स्थिर सरकार होती त्या काळात प्रगतीचा वेग चांगला होता पण ज्यावेळी संमिश्र सरकारे आली त्यावेळी आपल्या देशाला आर्थिक संकटाना सामोरे जावे लागले असे प्रतिपादन ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ.विनायक गोविलकर यांनी केले.

ठळक मुद्दे वि.म. गोविलकर: सेनापती तात्या टोपे व्याख्यानमाला

येवला :ज्या काळात देशात शांतता व स्थिर सरकार होती त्या काळात प्रगतीचा वेग चांगला होता पण ज्यावेळी संमिश्र सरकारे आली त्यावेळी आपल्या देशाला आर्थिक संकटाना सामोरे जावे लागले असे प्रतिपादन ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ.विनायक गोविलकर यांनी केले.सेनापती तात्या टोपे व्याख्यानमालेचे अखेरचे पुष्प गुंफतांना कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी अ‍ॅड. दिलीप कुलकर्णी होते तर प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार मारोतराव पवार,डॉ.एस.के.पाटील उपस्थित होते.याप्रसंगी नेत्ररोगतज्ञ डॉ.शशिकांत गायकवाड,सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता चंद्रहर्ष आव्हाड याना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. .डॉ.गोविलकर यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात सन १९४७ते २०१८ या काळात भारताच्या आर्थिक प्रगतीचे विश्लेषण केले.१९४७ ते १९७५,१९७५ ते १९९१, १९९१ ते २००९ , २००९ ते २०१४ व २०१४ ते २०१८ या ५ टप्यात भारताच्या आर्थिक प्रगतीचे वर्णन केले. १९९१ मध्ये विदेशी चलन मिळवण्यासाठी सोने गहाण ठेवावे लागले. १९९१,मध्ये उत्तम प्रशासक म्हणून पंतप्रधान नरिसहराव यांनी रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर मनमोहनसिंग यांना अर्थमंत्री केले. त्यानंतर देशाची आर्थिक परिस्थिती सुरळीत झाली. पण तेच मनमोहनिसंग पंतप्रधान झाल्यानंतर प्रशासनावर पकड न राहिल्याने २००९ -२०१४ या कालखंडात अनेक आर्थिक घोटाळे उजेडात आले. २०१४ मध्ये सत्तांतर होऊन २५ वर्षानंतर देशात स्थिर सरकार आल्याने देशाचा आर्थिक प्रगतीचा मंदावलेला वेग पुन्हा प्रगतीपथावर आला. आता जगातील तिसरी आर्थिक महासत्ता म्हणून भारत उदयास आला आहे. लवकरच जगातील आर्थिक सत्तेत फेरबदल होऊन भारत पहिल्या क्र मांकावर येईल असे भाकीत त्यांनी केले. प्रास्ताविक साहेबराव सैद यांनी तर आभार धनंजय कुलकर्णी यांनी व्यक्त केले.व्याख्यानमाला यशस्वी होण्यासाठी किशोर सोनवणे, नगरसेवक प्रवीण बनकर, पुरु षोत्तम रहाणे, एम.पी. गायकवाड, बाळासाहेब रहाणे, अशोक कुळधर. रघुनाथ खैरनार, गोविंद भोरकडे, जयंत पेठकर, श्रीकांत खंदारे, नारायण क्षीरसागर, प्रमोद पाटील, विजय आहेर आदींनी परिश्रम घेतले.

स्थिर सरकारच्या काळात देशाच्या प्रगतीचा वेग चांगलावि.म. गोविलकर: सेनापती तात्या टोपे व्याख्यानमालायेवला :ज्या काळात देशात शांतता व स्थिर सरकार होती त्या काळात प्रगतीचा वेग चांगला होता पण ज्यावेळी संमिश्र सरकारे आली त्यावेळी आपल्या देशाला आर्थिक संकटाना सामोरे जावे लागले असे प्रतिपादन ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ.विनायक गोविलकर यांनी केले.सेनापती तात्या टोपे व्याख्यानमालेचे अखेरचे पुष्प गुंफतांना कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी अ‍ॅड. दिलीप कुलकर्णी होते तर प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार मारोतराव पवार,डॉ.एस.के.पाटील उपस्थित होते.याप्रसंगी नेत्ररोगतज्ञ डॉ.शशिकांत गायकवाड,सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता चंद्रहर्ष आव्हाड याना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. .डॉ.गोविलकर यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात सन १९४७ते २०१८ या काळात भारताच्या आर्थिक प्रगतीचे विश्लेषण केले.१९४७ ते १९७५,१९७५ ते १९९१, १९९१ ते २००९ , २००९ ते २०१४ व २०१४ ते २०१८ या ५ टप्यात भारताच्या आर्थिक प्रगतीचे वर्णन केले. १९९१ मध्ये विदेशी चलन मिळवण्यासाठी सोने गहाण ठेवावे लागले. १९९१,मध्ये उत्तम प्रशासक म्हणून पंतप्रधान नरिसहराव यांनी रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर मनमोहनसिंग यांना अर्थमंत्री केले. त्यानंतर देशाची आर्थिक परिस्थिती सुरळीत झाली. पण तेच मनमोहनिसंग पंतप्रधान झाल्यानंतर प्रशासनावर पकड न राहिल्याने २००९ -२०१४ या कालखंडात अनेक आर्थिक घोटाळे उजेडात आले. २०१४ मध्ये सत्तांतर होऊन २५ वर्षानंतर देशात स्थिर सरकार आल्याने देशाचा आर्थिक प्रगतीचा मंदावलेला वेग पुन्हा प्रगतीपथावर आला. आता जगातील तिसरी आर्थिक महासत्ता म्हणून भारत उदयास आला आहे. लवकरच जगातील आर्थिक सत्तेत फेरबदल होऊन भारत पहिल्या क्र मांकावर येईल असे भाकीत त्यांनी केले. प्रास्ताविक साहेबराव सैद यांनी तर आभार धनंजय कुलकर्णी यांनी व्यक्त केले.व्याख्यानमाला यशस्वी होण्यासाठी किशोर सोनवणे, नगरसेवक प्रवीण बनकर, पुरु षोत्तम रहाणे, एम.पी. गायकवाड, बाळासाहेब रहाणे, अशोक कुळधर. रघुनाथ खैरनार, गोविंद भोरकडे, जयंत पेठकर, श्रीकांत खंदारे, नारायण क्षीरसागर, प्रमोद पाटील, विजय आहेर आदींनी परिश्रम घेतले.