शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
3
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
4
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
5
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
6
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
7
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
8
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
9
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
10
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
11
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
12
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
13
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
14
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
15
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
16
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
17
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
18
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
19
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
20
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी

दारणातून विसर्ग सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 00:10 IST

नाशिक : जायकवाडी धरणातील तूट भरून काढण्यासाठी दारणा धरणातून सलग तिसऱ्या दिवशीही विसर्ग सुरूच ठेवला असून, गोदावरीतून डोळ्यादेखत पाणी पुढे जात असल्याचे पाहून नाशिक व नगरच्या शेतकºयांनी कोल्हापूर टाइप बंधाºयांच्या ठिकठिकाणी फळ्या टाकून पाणी अडविण्यास सुरुवात केल्याने पाटबंधारे खात्यासमोर नवीनच पेच उभा राहिला आहे.

ठळक मुद्देशेतकºयांनी एकत्र येत फळ्या आडव्या टाकून पाणी अडविण्याचे प्रकार सुरू केले आहे.

नाशिक : जायकवाडी धरणातील तूट भरून काढण्यासाठी दारणा धरणातून सलग तिसऱ्या दिवशीही विसर्ग सुरूच ठेवला असून, गोदावरीतून डोळ्यादेखत पाणी पुढे जात असल्याचे पाहून नाशिक व नगरच्या शेतकºयांनी कोल्हापूर टाइप बंधाºयांच्या ठिकठिकाणी फळ्या टाकून पाणी अडविण्यास सुरुवात केल्याने पाटबंधारे खात्यासमोर नवीनच पेच उभा राहिला आहे.गुरुवारपासून नाशिक व नगर जिल्ह्यातील धरणामधून मराठवाड्यासाठी पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील गंगापूर व पालखेड धरणातून पाणी सोडण्याऐवजी दारणा धरणातून पाणी सोडण्याचा अंतिम निर्णय घेण्यात आल्याने त्यानुसार शनिवारी सायंकाळपर्यंत दारणामधून सुमारे १७०० दशलक्ष घनफूट इतके पाणी जायकवाडीसाठी सोडण्यात आले आहे. रात्री ११ वाजेपर्यंत जायकवाडीत ते पोहोचेल, असे पाटबंधारे खात्याच्या अधिकाºयांचे म्हणणे आहे. दारणातून एकीकडे हे पाणी सोडले जात असताना दुसरीकडे मुकणेमधून दारणात पाणी वळते केले जात आहे. जायकवाडीसाठी एकट्या दारणातूनच पाणी सोडण्यात येणार असल्यामुळे आणखी सव्वा टीएमसी पाणी दोन दिवसांत सोडण्यात येणार असल्याचे पाटबंधारे खात्याचे म्हणणे आहे.त्यामुळे जायकवाडीपर्यंत पाणी पोहोचण्यास विलंब होत असून, अशा कोल्हापूर बंधाºयावर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला असला तरी, गावकरी त्यांना जुमानत नसल्याने वादाचे प्रसंग उद्भवू लागले असल्याने पाटबंधारे खात्याची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे दारणाचे पाणी आणखी किती दिवस सोडले जाईल ते जाहीर करण्यास पाटबंधारे खात्याचे अधिकारी राजी नाहीत. संवेदनशील मुद्दापर्जन्यमान कमी झाल्याने पाण्याचा मुद्दा संवेदनशील झाला असून, ठिकठिकाणी पाणी सोडण्याच्या विरोधात आंदोलने होऊ लागली आहेत. अशातच गोदावरीत बांधण्यात येणाºया कोल्हापूर टाइप बंधाºयाच्या फळ्या पाणी सोडण्यापूर्वी काढण्यात आल्या होत्या. आता गोदावरी वाहत असल्याचे पाहून शेतकºयांनी एकत्र येत फळ्या आडव्या टाकून पाणी अडविण्याचे प्रकार सुरू केले आहे.

दारणातून विसर्ग सुरूचनाशिक : जायकवाडी धरणातील तूट भरून काढण्यासाठी दारणा धरणातून सलग तिसऱ्या दिवशीही विसर्ग सुरूच ठेवला असून, गोदावरीतून डोळ्यादेखत पाणी पुढे जात असल्याचे पाहून नाशिक व नगरच्या शेतकºयांनी कोल्हापूर टाइप बंधाºयांच्या ठिकठिकाणी फळ्या टाकून पाणी अडविण्यास सुरुवात केल्याने पाटबंधारे खात्यासमोर नवीनच पेच उभा राहिला आहे.गुरुवारपासून नाशिक व नगर जिल्ह्यातील धरणामधून मराठवाड्यासाठी पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील गंगापूर व पालखेड धरणातून पाणी सोडण्याऐवजी दारणा धरणातून पाणी सोडण्याचा अंतिम निर्णय घेण्यात आल्याने त्यानुसार शनिवारी सायंकाळपर्यंत दारणामधून सुमारे १७०० दशलक्ष घनफूट इतके पाणी जायकवाडीसाठी सोडण्यात आले आहे. रात्री ११ वाजेपर्यंत जायकवाडीत ते पोहोचेल, असे पाटबंधारे खात्याच्या अधिकाºयांचे म्हणणे आहे. दारणातून एकीकडे हे पाणी सोडले जात असताना दुसरीकडे मुकणेमधून दारणात पाणी वळते केले जात आहे. जायकवाडीसाठी एकट्या दारणातूनच पाणी सोडण्यात येणार असल्यामुळे आणखी सव्वा टीएमसी पाणी दोन दिवसांत सोडण्यात येणार असल्याचे पाटबंधारे खात्याचे म्हणणे आहे.त्यामुळे जायकवाडीपर्यंत पाणी पोहोचण्यास विलंब होत असून, अशा कोल्हापूर बंधाºयावर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला असला तरी, गावकरी त्यांना जुमानत नसल्याने वादाचे प्रसंग उद्भवू लागले असल्याने पाटबंधारे खात्याची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे दारणाचे पाणी आणखी किती दिवस सोडले जाईल ते जाहीर करण्यास पाटबंधारे खात्याचे अधिकारी राजी नाहीत. संवेदनशील मुद्दापर्जन्यमान कमी झाल्याने पाण्याचा मुद्दा संवेदनशील झाला असून, ठिकठिकाणी पाणी सोडण्याच्या विरोधात आंदोलने होऊ लागली आहेत. अशातच गोदावरीत बांधण्यात येणाºया कोल्हापूर टाइप बंधाºयाच्या फळ्या पाणी सोडण्यापूर्वी काढण्यात आल्या होत्या. आता गोदावरी वाहत असल्याचे पाहून शेतकºयांनी एकत्र येत फळ्या आडव्या टाकून पाणी अडविण्याचे प्रकार सुरू केले आहे.