शहरं
Join us  
Trending Stories
1
Laxman Hake: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या
2
आता कोणत्या देशावर हल्ला करणार अमेरिका?; ८०० सैन्य अधिकाऱ्यांची अचानक बैठक, चर्चांना उधाण
3
Kolhapur: अंबाबाई मंदिरात भाविकांची उच्चांकी गर्दी, मणिकर्णिका कुंडाजवळ चेंगराचेंगरी-video
4
Petal Gahlot : अभिमानास्पद! भारताच्या लेकीकडून 'ड्रामेबाज' पाकिस्तानी पंतप्रधानांची पोलखोल; कोण आहेत पेटल गहलोत?
5
Indusind बँकेत १० वर्षांपासून सुरू होता अकाऊंटिंगच्या अनियमिततेचा खेळ; माजी CFO चा गौप्यस्फोट
6
एक ओव्हर आणि मग गायब, फायनलपूर्वी हार्दिक पांड्याला झालं काय? टीम इंडियाचं टेन्शन वाढलं
7
Corona Virus : बापरे! कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनने पुन्हा वाढवलं जगाचं टेन्शन; 'ही' लक्षणं दिसताच सावधान
8
अमेरिकेचा मोठा निर्णय! कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षाचा व्हिसा रद्द करणार, कारण काय सांगितलं?
9
नवरात्री २०२५: कोकणस्थांकडे अष्टमीला असते उकडीच्या मुखवट्याची महालक्ष्मी; काय आहे वैशिष्ट्य?
10
'शरद पवार उलगडलेलं, पण न उमजलेलं कोडं, तर अजित पवार...'; CM फडणवीसांची 'रॅपिड फायर' उत्तरे, शिंदे-ठाकरेंबद्दल काय म्हणाले? 
11
पुराचा धसका! चिखलातील स्वप्नांचा शोध..; पिकेच नाही तर मातीही वाहून गेल्याने भविष्य संकटात
12
विना इनक्रिमेंट १ लाखांपेक्षा अधिक वाढली सॅलरी; रुपया आणि डॉलर्सचा काय आहे याच्याशी संबंध?
13
हृदयद्रावक! खेळता खेळता उकळत्या दुधात पडून दीड वर्षांच्या मुलीचा मृत्यू, मांजरीच्या मागे गेली अन्...
14
सुपर ओव्हरमधील वादावरून श्रीलंकेचे प्रशिक्षक जयसूर्या संतप्त, ICCकडे केली अशी मागणी 
15
भारतीय औषध उद्योगाला ‘ट्रम्प’ झटका! १०.५ अब्ज डॉलरची निर्यात धोक्यात, अमेरिकेलाही बसणार झळ
16
ऑक्टोबरमध्ये शुक्र-शनीची युती; काही राशींना वाट्याला 'राजयोग' तर काहींना 'कर्माचे भोग'
17
अभिषेक शर्मा-अभिषेक बच्चनच्या नावात शोएब अख्तरचा गोंधळ; अभिनेता स्पष्टच म्हणाला- "तुझा आदर करतो, पण..."
18
२५ जण, ६ वाहनं... १ मिनिटात ९ कोटींवर डल्ला; दागिन्यांच्या दुकानात फिल्मी स्टाईल दरोडा
19
'शार्क टँक' फेम अश्नीर ग्रोव्हरला 'बिग बॉस १९'कडून ईमेल, वाइल्ड कार्ड एन्ट्रीची ऑफर; म्हणाला- "आधी सलमान खानला..."
20
TATA च्या बहुप्रतिक्षित आयपीओची तारीख अखेर ठरली, 'या' दिवशी मिळणार गुंतवणूकीची संधी, चेक करा डिटेल्स

दारणातून विसर्ग सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 00:10 IST

नाशिक : जायकवाडी धरणातील तूट भरून काढण्यासाठी दारणा धरणातून सलग तिसऱ्या दिवशीही विसर्ग सुरूच ठेवला असून, गोदावरीतून डोळ्यादेखत पाणी पुढे जात असल्याचे पाहून नाशिक व नगरच्या शेतकºयांनी कोल्हापूर टाइप बंधाºयांच्या ठिकठिकाणी फळ्या टाकून पाणी अडविण्यास सुरुवात केल्याने पाटबंधारे खात्यासमोर नवीनच पेच उभा राहिला आहे.

ठळक मुद्देशेतकºयांनी एकत्र येत फळ्या आडव्या टाकून पाणी अडविण्याचे प्रकार सुरू केले आहे.

नाशिक : जायकवाडी धरणातील तूट भरून काढण्यासाठी दारणा धरणातून सलग तिसऱ्या दिवशीही विसर्ग सुरूच ठेवला असून, गोदावरीतून डोळ्यादेखत पाणी पुढे जात असल्याचे पाहून नाशिक व नगरच्या शेतकºयांनी कोल्हापूर टाइप बंधाºयांच्या ठिकठिकाणी फळ्या टाकून पाणी अडविण्यास सुरुवात केल्याने पाटबंधारे खात्यासमोर नवीनच पेच उभा राहिला आहे.गुरुवारपासून नाशिक व नगर जिल्ह्यातील धरणामधून मराठवाड्यासाठी पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील गंगापूर व पालखेड धरणातून पाणी सोडण्याऐवजी दारणा धरणातून पाणी सोडण्याचा अंतिम निर्णय घेण्यात आल्याने त्यानुसार शनिवारी सायंकाळपर्यंत दारणामधून सुमारे १७०० दशलक्ष घनफूट इतके पाणी जायकवाडीसाठी सोडण्यात आले आहे. रात्री ११ वाजेपर्यंत जायकवाडीत ते पोहोचेल, असे पाटबंधारे खात्याच्या अधिकाºयांचे म्हणणे आहे. दारणातून एकीकडे हे पाणी सोडले जात असताना दुसरीकडे मुकणेमधून दारणात पाणी वळते केले जात आहे. जायकवाडीसाठी एकट्या दारणातूनच पाणी सोडण्यात येणार असल्यामुळे आणखी सव्वा टीएमसी पाणी दोन दिवसांत सोडण्यात येणार असल्याचे पाटबंधारे खात्याचे म्हणणे आहे.त्यामुळे जायकवाडीपर्यंत पाणी पोहोचण्यास विलंब होत असून, अशा कोल्हापूर बंधाºयावर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला असला तरी, गावकरी त्यांना जुमानत नसल्याने वादाचे प्रसंग उद्भवू लागले असल्याने पाटबंधारे खात्याची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे दारणाचे पाणी आणखी किती दिवस सोडले जाईल ते जाहीर करण्यास पाटबंधारे खात्याचे अधिकारी राजी नाहीत. संवेदनशील मुद्दापर्जन्यमान कमी झाल्याने पाण्याचा मुद्दा संवेदनशील झाला असून, ठिकठिकाणी पाणी सोडण्याच्या विरोधात आंदोलने होऊ लागली आहेत. अशातच गोदावरीत बांधण्यात येणाºया कोल्हापूर टाइप बंधाºयाच्या फळ्या पाणी सोडण्यापूर्वी काढण्यात आल्या होत्या. आता गोदावरी वाहत असल्याचे पाहून शेतकºयांनी एकत्र येत फळ्या आडव्या टाकून पाणी अडविण्याचे प्रकार सुरू केले आहे.

दारणातून विसर्ग सुरूचनाशिक : जायकवाडी धरणातील तूट भरून काढण्यासाठी दारणा धरणातून सलग तिसऱ्या दिवशीही विसर्ग सुरूच ठेवला असून, गोदावरीतून डोळ्यादेखत पाणी पुढे जात असल्याचे पाहून नाशिक व नगरच्या शेतकºयांनी कोल्हापूर टाइप बंधाºयांच्या ठिकठिकाणी फळ्या टाकून पाणी अडविण्यास सुरुवात केल्याने पाटबंधारे खात्यासमोर नवीनच पेच उभा राहिला आहे.गुरुवारपासून नाशिक व नगर जिल्ह्यातील धरणामधून मराठवाड्यासाठी पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील गंगापूर व पालखेड धरणातून पाणी सोडण्याऐवजी दारणा धरणातून पाणी सोडण्याचा अंतिम निर्णय घेण्यात आल्याने त्यानुसार शनिवारी सायंकाळपर्यंत दारणामधून सुमारे १७०० दशलक्ष घनफूट इतके पाणी जायकवाडीसाठी सोडण्यात आले आहे. रात्री ११ वाजेपर्यंत जायकवाडीत ते पोहोचेल, असे पाटबंधारे खात्याच्या अधिकाºयांचे म्हणणे आहे. दारणातून एकीकडे हे पाणी सोडले जात असताना दुसरीकडे मुकणेमधून दारणात पाणी वळते केले जात आहे. जायकवाडीसाठी एकट्या दारणातूनच पाणी सोडण्यात येणार असल्यामुळे आणखी सव्वा टीएमसी पाणी दोन दिवसांत सोडण्यात येणार असल्याचे पाटबंधारे खात्याचे म्हणणे आहे.त्यामुळे जायकवाडीपर्यंत पाणी पोहोचण्यास विलंब होत असून, अशा कोल्हापूर बंधाºयावर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला असला तरी, गावकरी त्यांना जुमानत नसल्याने वादाचे प्रसंग उद्भवू लागले असल्याने पाटबंधारे खात्याची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे दारणाचे पाणी आणखी किती दिवस सोडले जाईल ते जाहीर करण्यास पाटबंधारे खात्याचे अधिकारी राजी नाहीत. संवेदनशील मुद्दापर्जन्यमान कमी झाल्याने पाण्याचा मुद्दा संवेदनशील झाला असून, ठिकठिकाणी पाणी सोडण्याच्या विरोधात आंदोलने होऊ लागली आहेत. अशातच गोदावरीत बांधण्यात येणाºया कोल्हापूर टाइप बंधाºयाच्या फळ्या पाणी सोडण्यापूर्वी काढण्यात आल्या होत्या. आता गोदावरी वाहत असल्याचे पाहून शेतकºयांनी एकत्र येत फळ्या आडव्या टाकून पाणी अडविण्याचे प्रकार सुरू केले आहे.