शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
5
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
6
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
7
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
8
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
9
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
10
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
11
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
12
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
13
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
14
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
15
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
17
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
18
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
19
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
20
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज

हातसडीच्या तांदळाचा कृषि महोत्सवात डंका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 15:41 IST

इगतपुरी तालुका : विषमुक्त शेतीमालाला प्रतिसाद

ठळक मुद्देकृषिमहोत्सवात आदिवासी भागातील शेतक-यांचे ५ पेक्षा जास्त स्टॉल लावण्यात आले आहेत. यामध्ये सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला विषमुक्त तांदूळ, हातसडीचा तांदूळ, बिन पॉलिशचा तांदूळ, वरई, नागली, गुळ, द्राक्ष, मशरूम, पापड, मसाले उपलब्ध आहेत

घोटी : इगतपुरी तालुक्यातील विविध प्रकारचा गावठी तांदूळ, गावठी फळे आणि विषमुक्त अन्य शेतमालाला नाशिकच्या कृषी महोत्सवात प्रचंड प्रतिसाद लाभत आहे. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून नागरिकांनी इगतपुरी तालुक्यातील सेंद्रिय बाजारपेठेला भेट देऊन विक्र मी खरेदी केली.कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आयोजित नाशिक येथील कृषी महोत्सवात इगतपुरीचे विविध शेतकरी गट आणि शेतक-यांमार्फत सेंद्रिय माल उपलब्ध करुन देण्यात आला आहे. इगतपुरी तालुक्यातील डोंगराळ भागातील आदिवासी शेतकरी अजूनही पारंपरिक शेतीच्या माध्यमातून विषमुक्त शेतीची परंपरा पुढे चालवत आहेत. सध्याच्या बदलत्या जीवनशैलीत कीटकनाशके, खते यांच्या भरमसाठ मा-याने शरीर संपदा धोक्यात आली आहे. त्यानुसार इगतपुरी तालुक्यात कृषी खात्याने सेंद्रिय शेतीसाठी प्रबोधन चालविले आहे. कृषिमहोत्सवात आदिवासी भागातील शेतक-यांचे ५ पेक्षा जास्त स्टॉल लावण्यात आले आहेत. यामध्ये सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला विषमुक्त तांदूळ, हातसडीचा तांदूळ, बिन पॉलिशचा तांदूळ, वरई, नागली, गुळ, द्राक्ष, मशरूम, पापड, मसाले उपलब्ध आहेत. आगामी काळात थेट शेतक-यांशी संपर्क साधून सेंद्रिय भाजीपाला मिळवणार असल्याचे सांगण्यात आले. टेरेस आणि घरातल्या घरात सेंद्रिय भाजीपाला पिकवण्याचे सुलभ तंत्र इगतपुरीच्या शेतक-यांनी सांगितले.शेतकरी बचत गट आणि शेतक-यांना इगतपुरीचे तालुका कृषी अधिकारी संजय शेवाळे, पंचायत समितीचे कृषी अधिकारी नंदकुमार अहिरे, विस्तार अधिकारी साहेबु देशमुख, कृषी सहाय्यक हितेंद्र मोरे, सुहास भालेराव, आर. डी. जोशी, प्रदीप नवले, अर्चना सातपुते यांनी मार्गदर्शन केले. या महोत्सवात इगतपुरी तालुक्यातील सेंद्रिय शेती करणारे शेतकरी भाऊसाहेब गायकर, कचरू पाटील शिंदे, रामदास गायकर, भाऊसाहेब शिंदे आदींनी सहभाग घेतला. दरम्यान, कार्यक्र मात भरविर बुद्रुक येथील जय श्रीराम कृषी विज्ञान मंडळाला विशेष पुरस्कार वितरित करण्यात आला.अभूतपूर्व सहभागकृषी महोत्सवाच्या निमित्ताने शेतीनिष्ठ शेतक-यांच्या शेतमालाला बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. सर्वच तालुक्यातील शेतक-यांनी ह्यामध्ये अभूतपूर्व सहभाग घेतला. नागरिकांच्या प्रतिसादामुळे शेतक-यांना उत्स्फूर्तपणे काम करायला आनंद वाटतो आहे.- संजीव पडवळ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नाशिक

टॅग्स :Nashikनाशिकagricultureशेती