शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

जलसंधारणमुळे आनंदवन बनले स्मार्ट

By admin | Updated: March 11, 2017 23:20 IST

नाशिक : ज्यांना समाजानं नाकारलं त्यांना बाबा आमटे यांनी स्वीकारलं. कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनाचा ध्यास बाबांनी घेतला.एका खडकाळ भागात बाबांनी आनंदवन उभे केले.

  नाशिक : ज्यांना समाजानं नाकारलं त्यांना बाबा आमटे यांनी स्वीकारलं. कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनाचा ध्यास बाबांनी घेतला. याच कुष्ठपीडितांच्या फौजफाट्याच्या बळावर एका खडकाळ भागात बाबांनी आनंदवन उभे केले. सध्या आनंदवनात दूरवर केवळ हिरवाईचे कोंदण दिसते आणि मुबलक पाणीसुद्धा. हे केवळ शक्य झाले ते जलसंधारणाच्या प्रभावी कामांमुळेच. आज कुष्ठरोगी या पाण्यावरच आनंदवनात शेती फुलवित आहे. हे भारतातील पहिले स्मार्ट खेडे असल्याचे प्रतिपादन चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरामधील महारोगी सेवा समितीचे सचिव डॉ. विकास आमटे यांनी केले. जागतिक प्लंबिंग दिनाच्या निमित्ताने ‘जलसंवर्धन’ विषयावर इंडियन प्लंबिंग असोसिएशनच्या वतीने चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यावेळी वास्तुविशारद, अभियंता, बांधकाम व्यावसायिक, जलसंवर्धन विषयाचे अभ्यासक उपस्थित होते. प्रारंभी कौस्तुभ आमटे यांनी दृकश्राव्य यंत्रणेच्या माध्यमातून आनंदवन, सोमनाथमधील जलसंवर्धनाची झालेली कामे आणि त्यामुळे परिसराचे पालटलेले रूप यावर प्रकाशझोत टाकणारी चित्रफीत सादर केली. आमटे यांनी यावेळी जलसंवर्धनाबाबत मार्गदर्शन करताना सांगितले, बाबा आमटे यांनी सर्वप्रथम ‘एन्व्हायरॉन्मेट’ हा शब्द शब्दकोशामधून बाहेर काढला. बाबांना पर्यावरण क्षेत्रात केलेल्या कामामुळे सर्वोच्च आंतरराष्ट्रीय पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे. शेती फुलवायची असेल तर पाण्याशिवाय पर्याय नाही हे बाबांना ठाऊक होते म्हणून आनंदवनाच्या खडकाळ प्रदेशात बाबांनी पहिली विहीर खोदण्यास सुरुवात केली. सतत ४५ दिवस कष्ट उपसल्यानंतर त्यांना सोळा फुटांवर पाण्याची चिन्हे दिसली. पाण्याच्या ओलाव्यामुळे माशा आणि फुलपाखरू त्या खड्ड्याभोवती घोंगवू लागले होते. दोन दिवसांनंतर खड्ड्यात चांगल्या प्रमाणात पाण्याचे डबके साचले, हे चित्र बाबा व त्यांच्या त्या सहा कुष्ठपीडित सहकाऱ्यांसाठी समाधानकारक होते. असोसिएशनच्या वतीने मिलिंद शेटे यांनी आमटे पिता-पुत्रांचे स्वागत केले.