शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
4
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
5
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
6
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
7
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
8
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
9
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
10
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
11
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
12
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
13
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
14
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
15
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
16
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
17
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
18
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
19
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
20
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?

दाट धुक्यामुळे बळीराजांवर अस्मानी संकटाचा घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2020 00:02 IST

लखमापूर : दिंडोरी तालुक्यात सध्या संध्याकाळ पासुन ते दहा वाजेपर्यंत पाणी मिश्रित दाट धुके पडत असल्यामुळे बळीराजांवर पुन्हा अस्मानी संकटाचा घाला निर्माण झाल्याने बळीराजांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

ठळक मुद्देबळीराजांची चिंता वाढली : दिंडोरी तालुक्याला माथेरानचे स्वरूप

लखमापूर : दिंडोरी तालुक्यात सध्या संध्याकाळ पासुन ते दहा वाजेपर्यंत पाणी मिश्रित दाट धुके पडत असल्यामुळे बळीराजांवर पुन्हा अस्मानी संकटाचा घाला निर्माण झाल्याने बळीराजांच्या चिंतेत वाढ झाली आहे.गेल्या तीन ते चार दिवसांपासुन दाट धुके पडत असल्याने रब्बी हंगामातील पिकांना मोठ्या प्रमाणावर धोका निर्माण झाला आहे. सध्या थंडीचे प्रमाण कमी व पाणी मिश्रित दाट धुके हे रब्बी हंगामातील नवीन समीकरण तयार झाल्याने पिके कशी वाचवयचे ही समस्या आ वासुन उभी राहिली आहे.२०१४-१५ या वर्षी अशाच स्वरूपाचे वातावरण निर्माण झाले होते. त्या ही वेळेस रब्बी हंगामाच होता. तेव्हा गहु, हरभरा, ऊस, कांदा व इतर नगदी पिके पुर्णपणे नष्ट झाली होती.त्यामुळे बळीराजांवर आर्थिक संकट कोसळले होते. दिवसेंदिवस वातावरणातील बदल हा शेतकरी वर्गाच्या प्रगतीला खिळ घालत असल्यामुळे शेती करणे शेतकरी वर्गाला एक प्रकारे आवाहन ठरत आहे. वातावरणातील बदल जर असाच होत राहिला तर बळीराजां कर्जाच्या डोंगरांला बाहेर पडू शकत नाही. असे विचार सध्या जाणकार शेतकरी वर्गातुन व्यक्त केले जात आहे.रब्बी हंगामाच्या सुरुवातील पोषक वातावरण होते. परंतु नंतर मात्र पेरण्या संपल्यानंतर व उगवण प्रक्रिया मध्यांवर आल्यानंतर रब्बी हंगामातील पिकांवर वातावरणातील बदलावाचे गडद अस्मानी संकट निर्माण झाल्याने मेटाकुटीला आलेला जगाचा पोशिंदा बळीराजां आता यामुळे चारी मुंड्या चित होतो कि काय ? अशी भीती दिंडोरी तालुक्यातील शेतकरी वर्गाला वाटु लागली आहे.खरीप हंगाम कोरोनामुळे व परतीच्या पावसाने वाया गेला. त्यामुळे जवळचे सर्वच भांडवल संपून गेलेले असतांना मिळेल त्या ठिकाणीहुन भांडवल उभे करत रब्बी हंगामावर अपेक्षा एकवटून कंबर खचलेल्या बळीराजाला बदलत्या वातावरणाचा व दव आणि दाट धुक्याचा परिणाम होऊ नये म्हणून दिवस रात्र एककरून रब्बी पिके वाचवण्यासाठी धडपड करावी लागत आहे.त्यात दिवसा वीज बंद व रात्री वीज चालू या धोरणामुळे शेतकरी वर्गाची डोके दुखी अजूनच वाढत आहे. सध्या दिंडोरी तालुक्यात बिबट्या वाघ व भुरट्या चोरांचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणात वाढल्याने शेतकरी वर्ग संकटांच्या दरीत सापडला आहे.तालुक्यात सध्या दव आणि दाट धुके पडत असल्यामुळे त्यांचा परिणाम द्राक्षे, कांदा , टमाटा, ऊस व सर्व प्रकारचा भाजीपाला व इतर नगदी पिके यांच्यावर विविध रोगांचा प्रादुर्भाव रूपाने दिसत आहे. त्यात करपा, मिलीबग, चिकटा, डावणी, घडांना तडे जाणे, घडामध्ये पाणी थांबल्याने घड कुंजण्याचे प्रमाणात वाढ होण्याची शक्यता निर्माण झाल्याने तसेच खर्च जास्त व उत्पन्न कवडी मोल हे उलटे समीकरण निर्माण झाल्याने शेतकरी वर्ग पुर्णपणे हतबल झाला आहे.बळीराजांला सध्या टमाटा पिकांने चांगली साथ दिली आहे. टमाट्यामुळे झालेले नुकसान भरून निघण्यासाठी थोड्या फार प्रमाणावर हात भार लागत असल्यामुळे शेतकरी वर्ग तग धरून आहे. पण आता या दाट धुके व वातावरणातील बदलाव यांचा नगदी भांडवल मिळुन देणाऱ्या टमाटा पिकांवर होत असल्यामुळे बळीराजांच्या तोंडाचे पाणी पळाले आहे. (२० लखमापूर)

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी