शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
3
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
4
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
5
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
6
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
7
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
8
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
9
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
10
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
11
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
12
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
13
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
14
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
15
'AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध नाही...', राज्यसभेत पर्यावरण राज्यमंत्र्यांचे उत्तर
16
बंदुकीच्या धाकावर अल्पवयीन मुला-मुलीला शारीरिक संबंधास पाडले भाग; MMS बनवून पैसे उकळले
17
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
18
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
19
गुडन्यूज! 'लाफ्टर क्वीन' भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई, 'गोला'नंतर आता मुलगा की मुलगी?
20
"तू घाणेरडे Video बघतोस, आमच्याकडे डेटा...", DCP असल्याचं सांगून तरुणाला ४६ हजारांचा गंडा
Daily Top 2Weekly Top 5

दाट धुक्यामुळे बळीराजांवर अस्मानी संकटाचा घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2020 00:02 IST

लखमापूर : दिंडोरी तालुक्यात सध्या संध्याकाळ पासुन ते दहा वाजेपर्यंत पाणी मिश्रित दाट धुके पडत असल्यामुळे बळीराजांवर पुन्हा अस्मानी संकटाचा घाला निर्माण झाल्याने बळीराजांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

ठळक मुद्देबळीराजांची चिंता वाढली : दिंडोरी तालुक्याला माथेरानचे स्वरूप

लखमापूर : दिंडोरी तालुक्यात सध्या संध्याकाळ पासुन ते दहा वाजेपर्यंत पाणी मिश्रित दाट धुके पडत असल्यामुळे बळीराजांवर पुन्हा अस्मानी संकटाचा घाला निर्माण झाल्याने बळीराजांच्या चिंतेत वाढ झाली आहे.गेल्या तीन ते चार दिवसांपासुन दाट धुके पडत असल्याने रब्बी हंगामातील पिकांना मोठ्या प्रमाणावर धोका निर्माण झाला आहे. सध्या थंडीचे प्रमाण कमी व पाणी मिश्रित दाट धुके हे रब्बी हंगामातील नवीन समीकरण तयार झाल्याने पिके कशी वाचवयचे ही समस्या आ वासुन उभी राहिली आहे.२०१४-१५ या वर्षी अशाच स्वरूपाचे वातावरण निर्माण झाले होते. त्या ही वेळेस रब्बी हंगामाच होता. तेव्हा गहु, हरभरा, ऊस, कांदा व इतर नगदी पिके पुर्णपणे नष्ट झाली होती.त्यामुळे बळीराजांवर आर्थिक संकट कोसळले होते. दिवसेंदिवस वातावरणातील बदल हा शेतकरी वर्गाच्या प्रगतीला खिळ घालत असल्यामुळे शेती करणे शेतकरी वर्गाला एक प्रकारे आवाहन ठरत आहे. वातावरणातील बदल जर असाच होत राहिला तर बळीराजां कर्जाच्या डोंगरांला बाहेर पडू शकत नाही. असे विचार सध्या जाणकार शेतकरी वर्गातुन व्यक्त केले जात आहे.रब्बी हंगामाच्या सुरुवातील पोषक वातावरण होते. परंतु नंतर मात्र पेरण्या संपल्यानंतर व उगवण प्रक्रिया मध्यांवर आल्यानंतर रब्बी हंगामातील पिकांवर वातावरणातील बदलावाचे गडद अस्मानी संकट निर्माण झाल्याने मेटाकुटीला आलेला जगाचा पोशिंदा बळीराजां आता यामुळे चारी मुंड्या चित होतो कि काय ? अशी भीती दिंडोरी तालुक्यातील शेतकरी वर्गाला वाटु लागली आहे.खरीप हंगाम कोरोनामुळे व परतीच्या पावसाने वाया गेला. त्यामुळे जवळचे सर्वच भांडवल संपून गेलेले असतांना मिळेल त्या ठिकाणीहुन भांडवल उभे करत रब्बी हंगामावर अपेक्षा एकवटून कंबर खचलेल्या बळीराजाला बदलत्या वातावरणाचा व दव आणि दाट धुक्याचा परिणाम होऊ नये म्हणून दिवस रात्र एककरून रब्बी पिके वाचवण्यासाठी धडपड करावी लागत आहे.त्यात दिवसा वीज बंद व रात्री वीज चालू या धोरणामुळे शेतकरी वर्गाची डोके दुखी अजूनच वाढत आहे. सध्या दिंडोरी तालुक्यात बिबट्या वाघ व भुरट्या चोरांचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणात वाढल्याने शेतकरी वर्ग संकटांच्या दरीत सापडला आहे.तालुक्यात सध्या दव आणि दाट धुके पडत असल्यामुळे त्यांचा परिणाम द्राक्षे, कांदा , टमाटा, ऊस व सर्व प्रकारचा भाजीपाला व इतर नगदी पिके यांच्यावर विविध रोगांचा प्रादुर्भाव रूपाने दिसत आहे. त्यात करपा, मिलीबग, चिकटा, डावणी, घडांना तडे जाणे, घडामध्ये पाणी थांबल्याने घड कुंजण्याचे प्रमाणात वाढ होण्याची शक्यता निर्माण झाल्याने तसेच खर्च जास्त व उत्पन्न कवडी मोल हे उलटे समीकरण निर्माण झाल्याने शेतकरी वर्ग पुर्णपणे हतबल झाला आहे.बळीराजांला सध्या टमाटा पिकांने चांगली साथ दिली आहे. टमाट्यामुळे झालेले नुकसान भरून निघण्यासाठी थोड्या फार प्रमाणावर हात भार लागत असल्यामुळे शेतकरी वर्ग तग धरून आहे. पण आता या दाट धुके व वातावरणातील बदलाव यांचा नगदी भांडवल मिळुन देणाऱ्या टमाटा पिकांवर होत असल्यामुळे बळीराजांच्या तोंडाचे पाणी पळाले आहे. (२० लखमापूर)

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी