शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

एस.टी.च्या आडमुठेपणामुळे विद्यार्थी बस सवलतीपासून वंचित

By श्याम बागुल | Updated: November 24, 2018 17:32 IST

अपु-या पावसामुळे जिल्ह्यातील दहा तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, त्यात नाशिक, चांदवड, सिन्नर, मालेगाव, बागलाण, देवळा, नांदगाव, इगतपुरी या तालुक्यांचा तसेच निफाड व येवला तालुक्यातील १७ मंडळांचा समावेश आहे. या तालुक्यांमध्ये पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्याबरोबर शेतक-यांकडील वसुलीला स्थगिती,

ठळक मुद्देदुष्काळी दिलासा : नाशिक शहराचा समावेश करण्यास नकार 

नाशिक : राज्य सरकारने दुष्काळी परिस्थिती जाहीर केलेल्या तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विविध उपाययोजना लागू करून सोयीसवलती दिल्या असल्या तरी, नाशिक दुष्काळी तालुक्यांत समावेश असलेल्या नाशिक महापालिका हद्दीतील विद्यार्थ्यांना मात्र मोफत बस पास देण्यास एस.टी. महामंडळाने नकार दिला आहे. दुष्काळी योजनांची अंमलबजावणीची जबाबदारी शासनाने जिल्हाधिकाºयांवर निश्चित केलेली असून, त्यांचा आदेश मानण्यासदेखील महामंडळ तयार नसल्यामुळे त्याचा फटका शहरातील हजारो शाळकरी, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना बसला आहे.अपु-या पावसामुळे जिल्ह्यातील दहा तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, त्यात नाशिक, चांदवड, सिन्नर, मालेगाव, बागलाण, देवळा, नांदगाव, इगतपुरी या तालुक्यांचा तसेच निफाड व येवला तालुक्यातील १७ मंडळांचा समावेश आहे. या तालुक्यांमध्ये पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्याबरोबर शेतक-यांकडील वसुलीला स्थगिती, वीजदरात सवलत, रोहयो कामांना प्राधान्य, शेतसारा वसुली माफ, विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क माफ, विद्यार्थ्यांना बस पास सवलत अशा विविध उपाययोजना करून जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. दुष्काळी उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जिल्हाधिकाºयांवर निश्चित करण्यात आलेली असून, त्यांनी संबंधित खात्यांशी संपर्क व संवाद साधून त्याचा लाभ जनतेपर्यंत पोहोचतो की नाही यावर लक्ष द्यायचे आहे. उपरोक्त योजनांची अंमलबजावणी सुरू झाल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात असला तरी, एस.टी. महामंडळाने विद्यार्थ्यांना बस पास सवलत योजनेबाबत काढलेल्या आदेशात शैक्षणिक, तांत्रिक तसेच व्यावसायिक शिक्षण घेणा-या उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून वसूल करण्यात येत असलेली बस पास सवलतीची रक्कम नोव्हेंबर ते एप्रिल २०१९ पर्यंत येऊ नये, असे नमूद करतानाच सदरची सवलत शहरी बस सेवेसाठी लागू असणार नसल्याचे म्हटले आहे.एस.टी. महामंडळाच्या या निर्णयाने नाशिक जिल्ह्यातील सुमारे ५५ हजार विद्यार्थ्यांना बस पास सवलतीचा लाभ होणार असला तरी, नाशिक महापालिकेच्या हद्दीतील विद्यार्थ्यांना मात्र त्यापासून वंचित रहावे लागणार आहे. दुष्काळी तालुक्यात नाशिक तालुक्याचाही समावेश असून, त्यात नाशिकसह तालुक्यातील ९० गावांचा समावेश असतानाही एस. टी. महामंडळाने महापालिका हद्द वगळली आहे. या संदर्भात विभाग नियंत्रकांकडे जिल्हा प्रशासनाने विचारणा केल्यावर त्यांनी वरिष्ठ कार्यालयाकडे बोट दाखविले आहे. नाशिक शहरातील हजारो विद्यार्थी दररोज शहर बसने प्रवास करीत असून, त्यांना मात्र आता वंचित रहावे लागत आहे.

टॅग्स :GovernmentसरकारNashikनाशिक