शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

साठवण तलावाचा पाणीसाठा संपुष्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 00:23 IST

येवला : शहराला पाणीपुरवठा करणारा ५० दलघफू क्षमतेच्या साठवण तलावाचा तळ उघडा पडला आहे. गंगासागर तलावातील पाण्याची मोजणीदेखील करता येण्याची स्थिती राहिलेली नसल्याने आता शहरवासीयांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची चिन्हे दिसत आहेत. शहराला सात दिवसांआड मिळणारे हे अखेरचे पाणी असणार आहे.

ठळक मुद्देयेवला : शहराच्या पाणीटंचाईच्या तीव्रतेत वाढ

येवला : शहराला पाणीपुरवठा करणारा ५० दलघफू क्षमतेच्या साठवण तलावाचा तळ उघडा पडला आहे. गंगासागर तलावातील पाण्याची मोजणीदेखील करता येण्याची स्थिती राहिलेली नसल्याने आता शहरवासीयांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची चिन्हे दिसत आहेत. शहराला सात दिवसांआड मिळणारे हे अखेरचे पाणी असणार आहे. पालिका आता शहराला केवळ एकदाच पाणी पुरवू शकेल, अशी स्थिती आहे.चार महिन्यांपासून येवला शहरवासीय अगदी काटकसरीने पाणी वापरत आहेत. अंतिम टप्प्यातदेखील आवर्तन येईपर्यत शहरवासीयांना पाणी काटकसरीने वापरावे लागणार आहे.उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे तालुक्यासह शहरात पिण्याच्या पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले असून यापुढेही अजून भयावह चित्र होण्याची भीती व्यक्त होत आहे. साठवण तलावाभोवती असलेल्या असंख्य विहिरींमधील होणारा दररोजचा पाणी उपसा तसेच वाढत्या उष्णतेमुळे होणारे पाण्याचे बाष्पीभवन, जमिनीतील पाण्याचा झिरपा यामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगासागर तलावातील पाणी संपले असून शहरात केवळ एक वेळ पाण्याचा पुरवठा होऊ शकतो अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यानंतर मात्र शहरवासीयांना पुन्हा पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. शहरात आज पाण्याची तीव्रटंचाई निर्माण झाली असून, नागरिक पाण्यासाठी भटकताना दिसत आहेत. पालखेडचे पुढील आवर्तन जूनच्या पहिल्या आठवड्यात मिळणार असल्याची माहिती आहे. आवर्तन सुटल्यानंतरही ९० किलोमीटरपर्यंत चारीलगत असलेले शेकडो डोंगळे यातून होणारी पाणीचोरी व त्यामुळे कमी दाबाने पाणी येवल्यात पोहचते. साठवण तलाव भरून देण्याची पालखेडच्या अधिकाऱ्यांची जबाबदारी असतानाही पुरेसे पाणी मिळत नाही. त्यामुळे मुख्याधिकारींसह पालिका कर्मचाºयांना पाण्यासाठी रात्रीची गस्त घालावी लागते. शहरात नळांना पाणी आल्यानंतर पाण्याची नासाडी होणार नाही याबाबत साठवण तलावात अल्प पाणीसाठा शिल्लक आहे. शहराला पिण्यासाठी रोज ५० लाख लिटर पाणी लागते. साठवण तलावातील पाणी पुढील आवर्तन येईपर्यंत पुरवावे लागणार आहे. पाणी जपून वापरावे. नागरिकांनी जागरूकता दाखविणे गरजेचे आहे.-संगीता नांदुरकर, मुख्याधिकारी, येवला नगर परिषद