शहरं
Join us  
Trending Stories
1
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
2
भारतीय वृत्तसंस्थेच्या पत्रकाराने भारताच्या आरोपावर प्रश्न विचारला, अन् ट्रम्प यांचे तोंड बंद झाले...
3
RBI Repo Rate: रेपो रेट म्हणजे काय रे भाऊ? तो वाढल्यानं का वाढतो तुमचा EMI? जाणून घ्या
4
Video : दुचाकीवर हेल्मेट घालणं टाळता? हा व्हिडीओ बघाल तर पुढच्यावेळी घरातूनच हेल्मेट घालून बाहेर पडाल! 
5
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
6
ट्रम्प यांनी जपानला फसवलंय, आता भारताची पाळी..; चिनी एक्सपर्टनं अमेरिकेचा असा केला पर्दाफाश
7
प्रियकरासोबत संबंध बनवताना प्रायव्हेट पार्टला इजा; महिलेने मुंबई पोलिसांना गंडवलं, सत्य भलतेच निघाले
8
दुसरा श्रावण गुरुवार: फक्त १० मिनिटे ‘अशी’ स्वामी सेवा करा; चिंतामुक्त व्हा, पुण्यच लाभेल!
9
वाहन विमा नाही? मग भरा पाचपट दंड...! ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरणासाठीही नवीन अटी
10
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा
11
फक्त रशियचां तेल नाही, तर 'या' ३ कारणामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचा तिळपापड; भारताला पुन्हा धमकी
12
'पाच महिन्यात पाच युद्ध थांबवली आता...'; ट्रम्प यांनी पुन्हा घेतले भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे श्रेय
13
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
14
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
15
हिंगोली रेल्वेस्टेशनवरील उभ्या बोगीला आग; संपूर्णतः जळून खाक
16
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार
17
राजा रघुवंशी २.०; बॉयफ्रेंडसोबत थाटायचा होता संसार, पत्नीने पतीला जंगलात बोलावलं अन्...
18
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
19
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
20
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!

साठवण तलावाचा पाणीसाठा संपुष्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 00:23 IST

येवला : शहराला पाणीपुरवठा करणारा ५० दलघफू क्षमतेच्या साठवण तलावाचा तळ उघडा पडला आहे. गंगासागर तलावातील पाण्याची मोजणीदेखील करता येण्याची स्थिती राहिलेली नसल्याने आता शहरवासीयांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची चिन्हे दिसत आहेत. शहराला सात दिवसांआड मिळणारे हे अखेरचे पाणी असणार आहे.

ठळक मुद्देयेवला : शहराच्या पाणीटंचाईच्या तीव्रतेत वाढ

येवला : शहराला पाणीपुरवठा करणारा ५० दलघफू क्षमतेच्या साठवण तलावाचा तळ उघडा पडला आहे. गंगासागर तलावातील पाण्याची मोजणीदेखील करता येण्याची स्थिती राहिलेली नसल्याने आता शहरवासीयांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची चिन्हे दिसत आहेत. शहराला सात दिवसांआड मिळणारे हे अखेरचे पाणी असणार आहे. पालिका आता शहराला केवळ एकदाच पाणी पुरवू शकेल, अशी स्थिती आहे.चार महिन्यांपासून येवला शहरवासीय अगदी काटकसरीने पाणी वापरत आहेत. अंतिम टप्प्यातदेखील आवर्तन येईपर्यत शहरवासीयांना पाणी काटकसरीने वापरावे लागणार आहे.उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे तालुक्यासह शहरात पिण्याच्या पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले असून यापुढेही अजून भयावह चित्र होण्याची भीती व्यक्त होत आहे. साठवण तलावाभोवती असलेल्या असंख्य विहिरींमधील होणारा दररोजचा पाणी उपसा तसेच वाढत्या उष्णतेमुळे होणारे पाण्याचे बाष्पीभवन, जमिनीतील पाण्याचा झिरपा यामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगासागर तलावातील पाणी संपले असून शहरात केवळ एक वेळ पाण्याचा पुरवठा होऊ शकतो अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यानंतर मात्र शहरवासीयांना पुन्हा पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. शहरात आज पाण्याची तीव्रटंचाई निर्माण झाली असून, नागरिक पाण्यासाठी भटकताना दिसत आहेत. पालखेडचे पुढील आवर्तन जूनच्या पहिल्या आठवड्यात मिळणार असल्याची माहिती आहे. आवर्तन सुटल्यानंतरही ९० किलोमीटरपर्यंत चारीलगत असलेले शेकडो डोंगळे यातून होणारी पाणीचोरी व त्यामुळे कमी दाबाने पाणी येवल्यात पोहचते. साठवण तलाव भरून देण्याची पालखेडच्या अधिकाऱ्यांची जबाबदारी असतानाही पुरेसे पाणी मिळत नाही. त्यामुळे मुख्याधिकारींसह पालिका कर्मचाºयांना पाण्यासाठी रात्रीची गस्त घालावी लागते. शहरात नळांना पाणी आल्यानंतर पाण्याची नासाडी होणार नाही याबाबत साठवण तलावात अल्प पाणीसाठा शिल्लक आहे. शहराला पिण्यासाठी रोज ५० लाख लिटर पाणी लागते. साठवण तलावातील पाणी पुढील आवर्तन येईपर्यंत पुरवावे लागणार आहे. पाणी जपून वापरावे. नागरिकांनी जागरूकता दाखविणे गरजेचे आहे.-संगीता नांदुरकर, मुख्याधिकारी, येवला नगर परिषद