शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
2
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
3
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
4
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
5
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
6
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
7
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
8
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
10
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
11
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
12
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
13
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
14
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
15
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP
16
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
17
स्टार क्रिकेटपटूने निवृत्ती घेतली मागे, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करणार पुनरागमन  
18
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
19
"५० हजार देतो, शरीरसंबंध ठेव", मुलाच्या वयाच्या निर्मात्याने अभिनेत्रीकडे केलेली धक्कादायक मागणी
20
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली

साठवण तलावाचा पाणीसाठा संपुष्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 00:23 IST

येवला : शहराला पाणीपुरवठा करणारा ५० दलघफू क्षमतेच्या साठवण तलावाचा तळ उघडा पडला आहे. गंगासागर तलावातील पाण्याची मोजणीदेखील करता येण्याची स्थिती राहिलेली नसल्याने आता शहरवासीयांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची चिन्हे दिसत आहेत. शहराला सात दिवसांआड मिळणारे हे अखेरचे पाणी असणार आहे.

ठळक मुद्देयेवला : शहराच्या पाणीटंचाईच्या तीव्रतेत वाढ

येवला : शहराला पाणीपुरवठा करणारा ५० दलघफू क्षमतेच्या साठवण तलावाचा तळ उघडा पडला आहे. गंगासागर तलावातील पाण्याची मोजणीदेखील करता येण्याची स्थिती राहिलेली नसल्याने आता शहरवासीयांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची चिन्हे दिसत आहेत. शहराला सात दिवसांआड मिळणारे हे अखेरचे पाणी असणार आहे. पालिका आता शहराला केवळ एकदाच पाणी पुरवू शकेल, अशी स्थिती आहे.चार महिन्यांपासून येवला शहरवासीय अगदी काटकसरीने पाणी वापरत आहेत. अंतिम टप्प्यातदेखील आवर्तन येईपर्यत शहरवासीयांना पाणी काटकसरीने वापरावे लागणार आहे.उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे तालुक्यासह शहरात पिण्याच्या पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले असून यापुढेही अजून भयावह चित्र होण्याची भीती व्यक्त होत आहे. साठवण तलावाभोवती असलेल्या असंख्य विहिरींमधील होणारा दररोजचा पाणी उपसा तसेच वाढत्या उष्णतेमुळे होणारे पाण्याचे बाष्पीभवन, जमिनीतील पाण्याचा झिरपा यामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगासागर तलावातील पाणी संपले असून शहरात केवळ एक वेळ पाण्याचा पुरवठा होऊ शकतो अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यानंतर मात्र शहरवासीयांना पुन्हा पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. शहरात आज पाण्याची तीव्रटंचाई निर्माण झाली असून, नागरिक पाण्यासाठी भटकताना दिसत आहेत. पालखेडचे पुढील आवर्तन जूनच्या पहिल्या आठवड्यात मिळणार असल्याची माहिती आहे. आवर्तन सुटल्यानंतरही ९० किलोमीटरपर्यंत चारीलगत असलेले शेकडो डोंगळे यातून होणारी पाणीचोरी व त्यामुळे कमी दाबाने पाणी येवल्यात पोहचते. साठवण तलाव भरून देण्याची पालखेडच्या अधिकाऱ्यांची जबाबदारी असतानाही पुरेसे पाणी मिळत नाही. त्यामुळे मुख्याधिकारींसह पालिका कर्मचाºयांना पाण्यासाठी रात्रीची गस्त घालावी लागते. शहरात नळांना पाणी आल्यानंतर पाण्याची नासाडी होणार नाही याबाबत साठवण तलावात अल्प पाणीसाठा शिल्लक आहे. शहराला पिण्यासाठी रोज ५० लाख लिटर पाणी लागते. साठवण तलावातील पाणी पुढील आवर्तन येईपर्यंत पुरवावे लागणार आहे. पाणी जपून वापरावे. नागरिकांनी जागरूकता दाखविणे गरजेचे आहे.-संगीता नांदुरकर, मुख्याधिकारी, येवला नगर परिषद