शहरं
Join us  
Trending Stories
1
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका पुढे गेल्या...! ग्रामीण भागातील निवडणुकीचे बिगुल कधी वाजणार? सर्वोच्च न्यायालयाने दिली नवी मुदत
2
Sangli Municipal Election 2026: पोलीस बंदोबस्तात पैसे वाटपाचा आरोप, मिरजेत अजितदादा-शरद पवार गटाचे कार्यकर्ते भिडले
3
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीचे दर नव्या उच्चांकावर; चांदी २.६५ लाखांच्या पार, सोन्यातही मोठी तेजी, पटापट चेक करा नवे दर
4
इस्रोला मोठा धक्का! PSLV-C62 मोहीमेत अडथळा; लष्करी सामर्थ्य, 'नाविक' प्रणालीसाठी गंभीर संकट
5
एवढा भाव वाढल्यावर चांदीत पैसा गुंतवावा का; चांदीची चमक वाढतेय... कारण काय?
6
"तपोवनाची जागा कायम खुलीच राहील"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
7
"लोक बेशुद्ध पडले, भाषण का थांबवलं नाही?"; चेंगराचेंगरी प्रकरणी CBI कडून थलपती विजयची चौकशी
8
मोठी बातमी! जामिनावर सुटताच परभणी संविधान विटंबना प्रकरणातील आरोपीने संपवलं जीवन
9
'इराणनंतर आता आमचा नंबर लावताय का?'; किम जोंग उनचा अमेरिकेवर हल्लाबोल! नेमकं काय झालं?
10
इराणमध्ये हिंसक आंदोलन, लोक रस्त्यावर उतरले; पाकिस्तानला धडकी, शहबाज शरीफांची झोप का उडाली?
11
IND vs NZ: एकदिवसीय क्रिकेटमध्ये टीम इंडियाच किंग; बलाढ्य संघांना जमलं नाही, ते करून दाखवलं!
12
BSNL चा धमाका: वर्षभरासाठी रिचार्जची कटकट संपली! 'या' प्लॅनमध्ये दररोज मिळतोय ३GB डेटा आणि बरंच काही
13
मुले खेळत असताना दोन दगडासारख्या वस्तू पेटत पेटत जमिनीवर पडल्या; भंडाऱ्यात खळबळ, मुले थेट पालकांकडे पळाली... 
14
मराठवाड्यात सत्तेचा सोहळा; २५८४ उमेदवारांकडून २४९ कोटींचा खर्च..!
15
८ वा वेतन आयोग : मूळ पगार दुप्पट होणार? 'फिटमेंट फॅक्टर'नुसार तुमचा पगार नेमका किती वाढू शकतो?
16
"माझा पराभव होणे आणि शिवसेनेचा पूर्णपणे पराभव होणे, यात मोठा फरक, ते 'वैफल्यग्रस्त'"; रावसाहेब दानवेंची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका
17
Inflation Impact in India: २० वर्षांनंतर किती असेल १ लाख रुपयांचं मूल्य, समजून घ्या महागाईचं संपूर्ण गणित
18
Makar Sankranti 2026: कोणत्या राशींवर यंदा 'संक्रांत'? कोणाला मिळणार यश आणि कोणाला सावधानतेचा इशारा?
19
अवघ्या जगभराची पासवर्डची कटकट संपणार, पण भारताची....! गुगल-मायक्रोसॉफ्ट आणतायत 'Passkey' सिस्टम
20
संतापजनक! लेकीला प्रियकरासोबत 'तसल्या' अवस्थेत पाहिलं अन् चिडलेल्या कुटुंबानं बेदम मारलं; दोघांचा मृत्यू 
Daily Top 2Weekly Top 5

दुबार पेरणीचे संकट टळले!

By admin | Updated: July 14, 2017 18:09 IST

जूनच्या पावसावर विसंबून पेरणी केलेल्या, परंतु तीन आठवडे पाठ फिरविलेल्या पावसाच्या दमदार पुनरागमनाने जिल्ह्यावर कोसळलेले दुबार पेरणीचे संकट टळले

नाशिक : जूनच्या पावसावर विसंबून पेरणी केलेल्या, परंतु तीन आठवडे पाठ फिरविलेल्या पावसाच्या दमदार पुनरागमनाने जिल्ह्यावर कोसळलेले दुबार पेरणीचे संकट टळले असून, शुक्रवारी मध्यरात्रीपासून संततधार लावलेल्या पावसाने चांगलेच झोडपून काढल्याने जिल्ह्यात गत वर्षाप्रमाणे सरासरी ४० टक्के पावसाची नोंद करण्यात आली आहे. शुक्रवारी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात ७५७ मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद करण्यात आली असून, सर्वाधिक पावसाची नोंद इगतपुरी तालुक्यात करण्यात आली आहे. त्याखालोखाल त्र्यंबकेश्वर येथे १२५, सुरगाण्याला १११ व पेठला ८८ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. नाशिक शहरातही ४८ मिलीमीटर पाऊस झाला. शुक्रवारच्या पावसाने जिल्ह्यातील नांदगाव वगळता सर्वच तालुक्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात हजेरी लावल्यामुळे पेरणीनंतर पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, विशेष करून पावसाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पेठ, सुरगाणा, इगतपुरी व त्र्यंबकेश्वर या चार तालुक्यांतील भाताची आवणी अडचणीत सापडली होती. जूनमध्ये समाधानकारक पाऊस झाल्याने त्या भरवश्यावर शेतकऱ्यांनी भाताची आवणी केली, परंतु रोपे तयार झाल्यानंतर भात लावणीसाठी पाहिजे त्या प्रमाणात पाऊस नसल्याने शेतकऱ्यांची झोप उडाली. अशीच परिस्थिती मका, सोयाबीन, बाजरीची पेरणी केलेल्या शेतकऱ्यांची झाली होती. जूनमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणीला प्राधान्य दिले होते. पेरणीनंतर पाण्याची गरज असताना जवळपास तीन आठवडे पावसाने दडी मारल्यामुळे पिके धोक्यात आली होती. त्यामुळे गुरुवारपासून सुरू झालेल्या पावसाने शुक्रवारी मध्यरात्रीपासून संपूर्ण जिल्ह्यातच पुनरागमन केल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. जिल्ह्यात जुलै महिन्यात पावसाची सरासरी ५६७१ मिलीमीटर इतकी असून, गेल्या पंधरा दिवसांत जिल्ह्यात २६४७ मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे. जून व जुलैचा एकूण पाऊस पाहता जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीच्या तुलनेत ४० टक्के पाऊस नोंदविला गेला आहे. गेल्या वर्षी याच काळात जिल्ह्यात ४० टक्के इतका पाऊस झाला होता. त्यामुळे गेल्या आठवड्यात कमी पाऊस झाल्यामुळे व्यक्त होणारी चिंता दूर झाली आहे.