शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

दुबार पेरणीचे संकट टळले!

By admin | Updated: July 14, 2017 18:09 IST

जूनच्या पावसावर विसंबून पेरणी केलेल्या, परंतु तीन आठवडे पाठ फिरविलेल्या पावसाच्या दमदार पुनरागमनाने जिल्ह्यावर कोसळलेले दुबार पेरणीचे संकट टळले

नाशिक : जूनच्या पावसावर विसंबून पेरणी केलेल्या, परंतु तीन आठवडे पाठ फिरविलेल्या पावसाच्या दमदार पुनरागमनाने जिल्ह्यावर कोसळलेले दुबार पेरणीचे संकट टळले असून, शुक्रवारी मध्यरात्रीपासून संततधार लावलेल्या पावसाने चांगलेच झोडपून काढल्याने जिल्ह्यात गत वर्षाप्रमाणे सरासरी ४० टक्के पावसाची नोंद करण्यात आली आहे. शुक्रवारी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात ७५७ मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद करण्यात आली असून, सर्वाधिक पावसाची नोंद इगतपुरी तालुक्यात करण्यात आली आहे. त्याखालोखाल त्र्यंबकेश्वर येथे १२५, सुरगाण्याला १११ व पेठला ८८ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. नाशिक शहरातही ४८ मिलीमीटर पाऊस झाला. शुक्रवारच्या पावसाने जिल्ह्यातील नांदगाव वगळता सर्वच तालुक्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात हजेरी लावल्यामुळे पेरणीनंतर पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, विशेष करून पावसाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पेठ, सुरगाणा, इगतपुरी व त्र्यंबकेश्वर या चार तालुक्यांतील भाताची आवणी अडचणीत सापडली होती. जूनमध्ये समाधानकारक पाऊस झाल्याने त्या भरवश्यावर शेतकऱ्यांनी भाताची आवणी केली, परंतु रोपे तयार झाल्यानंतर भात लावणीसाठी पाहिजे त्या प्रमाणात पाऊस नसल्याने शेतकऱ्यांची झोप उडाली. अशीच परिस्थिती मका, सोयाबीन, बाजरीची पेरणी केलेल्या शेतकऱ्यांची झाली होती. जूनमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणीला प्राधान्य दिले होते. पेरणीनंतर पाण्याची गरज असताना जवळपास तीन आठवडे पावसाने दडी मारल्यामुळे पिके धोक्यात आली होती. त्यामुळे गुरुवारपासून सुरू झालेल्या पावसाने शुक्रवारी मध्यरात्रीपासून संपूर्ण जिल्ह्यातच पुनरागमन केल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. जिल्ह्यात जुलै महिन्यात पावसाची सरासरी ५६७१ मिलीमीटर इतकी असून, गेल्या पंधरा दिवसांत जिल्ह्यात २६४७ मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे. जून व जुलैचा एकूण पाऊस पाहता जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीच्या तुलनेत ४० टक्के पाऊस नोंदविला गेला आहे. गेल्या वर्षी याच काळात जिल्ह्यात ४० टक्के इतका पाऊस झाला होता. त्यामुळे गेल्या आठवड्यात कमी पाऊस झाल्यामुळे व्यक्त होणारी चिंता दूर झाली आहे.