शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

तीन राज्यांच्या निकालामुळे समता परिषद फार्मात

By श्याम बागुल | Updated: December 13, 2018 15:42 IST

तुरुंगातून जामिनावर सुटल्यानंतर छगन भुजबळ यांनी राष्टÑवादी पक्षाचे प्रत्येक व्यासपीठ तर गाजवलेच, परंतु अखिल भारतीय समता परिषदेच्या संघटन विस्तारातही गुंतवून घेतले असून, त्यातूनच राज्यातील बीड, श्रीगोंदा, शहादा, सोनगीर या ठिकाणी समता मेळावे घेऊन मरगळलेल्या सैनिकांमध्ये जीव फुकला आहे.

ठळक मुद्देसोमवारी बैठक : राष्टÑीय राजकारणात भुजबळांना महत्व

श्याम बागुलनाशिक : नुकत्याच झालेल्या पाच राज्यांपैकी तीन प्रमुख राज्यांमध्ये कॉँग्रेसला मिळालेल्या यशात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचाही खारीचा वाटा असल्याचे निवडणूक निकालावरून स्पष्ट झाले असून, परिषदेचे मध्य प्रदेशचे राज्य अध्यक्ष सिद्धार्थ कुशवाह, तर राजस्थानात दोन आमदारही समता विचाराचेच निवडून आल्याने समता परिषद फार्मात आली आहे. येत्या सोमवारी मुंबईत राज्य कार्यकारिणीची बैठक होणार असल्याने या बैठकीत भुजबळ यांच्या राष्टÑीय राजकारणातील प्रवेशाबाबत चर्चा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.तुरुंगातून जामिनावर सुटल्यानंतर छगन भुजबळ यांनी राष्टÑवादी पक्षाचे प्रत्येक व्यासपीठ तर गाजवलेच, परंतु अखिल भारतीय समता परिषदेच्या संघटन विस्तारातही गुंतवून घेतले असून, त्यातूनच राज्यातील बीड, श्रीगोंदा, शहादा, सोनगीर या ठिकाणी समता मेळावे घेऊन मरगळलेल्या सैनिकांमध्ये जीव फुकला आहे. नजीकच्या काळात सांगोला, वैजापूर, परभणी याठिकाणी मेळावे घेण्याची तयारी समता परिषदेने चालविली असताना, दुसरीकडे मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगड या तीन राज्यांत कॉँग्रेसला मिळालेल्या यशात बहुतांशी मतदारसंघात समता परिषदेने मोठा हातभार लावल्याची माहिती समोर येऊ लागली आहे. चार वर्षांपूर्वी मध्य प्रदेशातील सतना येथे समता परिषदेची मुहूर्तमेढ रोवणारे सिद्धार्थ कुशवाह हे मूळचे कॉँग्रेसी असले तरी, त्यांनी समतेचा झेंडा हाती घेतल्यामुळे त्यांच्यावर मध्य प्रदेशाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यांनी सतना व लगतच्या जिल्ह्यांमध्ये समता परिषदेचा विस्तार केला, परिणामी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सतनासह आजूबाजूच्या विधानसभा मतदारसंघात कॉँग्रेसच्या विजयात समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी स्वत: झोकून घेतले होते. त्यामुळे मध्य प्रदेशच्या मंत्रिमंडळात सिद्धार्थ कुशवाह यांची वर्णी लागण्याची शक्यता निर्माण झाली असून, अशाच प्रकारे राजस्थानमध्येदेखील समता परिषदेच्या पुढाकाराने दोन जागांवर विजय मिळाला आहे. छतीसगढमध्ये भाजपाच्या विरोधात वातावरण निर्मितीत समता परिषदेने मोठा हातभार लावल्याचा दावा समता सैनिक करू लागले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर एनडीएपासून नुकतीच फारकत घेतलेले बिहारचे राष्ट्रीय लोकसमता पार्टीचे अध्यक्ष व समता परिषदेचे माजी प्रदेशाध्यक्ष उपेंद्र कुशवाह यांनी बुधवारी पुण्यात छगन भुजबळ यांची भेट घेऊन आगामी राजकीय वाटचालीबाबत तब्बल दोन तास चर्चा केली त्यात बिहारच्या लोकसभा निवडणुकीत समता परिषद रिंगणात उतरण्याची तयारीच्या दृष्टीने चर्चा झाली. गेल्या निवडणुकीत कुशवाह यांच्यासह चार खासदार बिहारमधून समता परिषदेच्या झेंड्याखाली निवडून आले होते.

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिक