शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
2
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
3
Operation Sindoor Live Updates: स्फोटाचा आवाजांमुळे अमृतसरमध्ये रात्रभर ब्लॅक आऊट; पोलिस म्हणतात काहीच सापडले नाही
4
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
6
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
7
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
8
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
9
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
10
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
11
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
12
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
13
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
14
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
15
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
16
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
17
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
18
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
19
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
20
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 

सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने घाणीचे साम्राज्य

By admin | Updated: November 24, 2014 23:51 IST

नांदूरशिंगोटे : स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी; आजारांत वाढ

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातल्या नांदूरशिंगोटे येथे सांडपाण्याचा व्यवस्थित निचरा होत नसल्याने गावात घाणीचे साम्राज्य व दुर्गंधी पसरली आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून गावात स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य दीपक बर्के यांनी केली आहे. सुमारे आठ हजार लोकसंख्या असलेल्या नांदूरशिंगोटेतील समस्यांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. तालुकाभरात ‘स्वच्छ भारत अभियान’ राबविले जात असतांना नांदूरशिंगोटे गावात घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याचा आरोप बर्के यांनी केला आहे. ग्रामपंचायतीकडे तीन सफाई कामगार असूनही जागोजागी कचऱ्याचे ढिगारे, तुंबलेल्या गटारींमुळे दुर्गंधी पसरली आहे. हजारो रुपये ग्राम स्वच्छतेवर खर्च करुनही गावात घाणीचे साम्राज्य असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. निमोण नाका, बसस्थानक, अचानक चौक, रेणुका माता मंदिराजवळील तलाव, मातंग वस्ती, विकास सोसायटीच्या पाठीमागचा भाग, अंगणवाडी आदि भागातील गटारी तुंबल्याने पाणी रस्त्यावर येऊ लागले आहे. प्लॅस्टिक पिशव्या, कचरा यामुळे गटारींतून पाण्याचा निचरा होत नाही. दर आठवड्याला गटारींची सफाई होत नसल्याने ही परिस्थिती ओढवल्याचा आरोप बर्के यांनी केला आहे. अनेक ठिकाणच्या कचराकुंड्या कचऱ्याने भरल्या आहेत.निमोणनाका परिसरातील साई अ‍ॅटोमोबाईल्स दुकानासमोर गटारी तुंबल्याने याठिकाणी दुर्गंधी व डासांचे प्रमाण वाढले आहे. शिर्डी, कोपरगाव, लोणी, निमोण, वावी आदि भागात जाण्यासाठी प्रवाशांना याच ठिकाणी थांबावे लागते. मात्र, गटारी तुंबल्याने रस्ता ओलांडणेही अवघड बनले आहे. गावातील सर्वच गटारींतील सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ग्रामपंचायतीने तातडीने स्वच्छता मोहीम हाती घेऊन तुंबलेल्या गटारी प्रवाहीत कराव्यात. गटारींवर प्रतिबंधात्मक औषधांची फवारणी करावी. आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याची मागणी बर्के यांच्यासह दत्ता सानप, बाळासाहेब वाक्चौरे, रामदास सानप, विकास संस्थेचे अध्यक्ष कैलास बर्के, संदीप शेळके, संजय शेळके, नागेश शेळके, मनोज उगले, भारत दराडे, बाळासाहेब कांगणे आदिंसह ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)