शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
2
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
3
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
4
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
5
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
6
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
7
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
8
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
9
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
10
नागपूर: 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड; पुण्यातील व्यक्तीच्या घरावर घेतलं कर्ज, ५ कोटींचा गंडा
11
Ganesh Chaturthi 2025: मराठी कलाकारांच्या घरी झाले बाप्पाचे आगमन, पाहा फोटो
12
जैशला पुनरुज्जीवित करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न; मसूदच्या दहशतवाद्यांसाठी काय करतंय पाक सरकार?
13
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल
14
"ज्यांनी बिहारींना शिवीगाळ केली, त्यांना..."; भाजपाचा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल
15
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
16
Ganesh Visarjan 2025: बाप्पा दीड दिवसांतच का चालला? असं चिमुकल्यांनी विचारलं, तर द्या 'हे' शास्त्रोक्त उत्तर!
17
ग्रीन टी की ब्लॅक टी... वजन कमी करण्यापासून ते हृदयाच्या आरोग्यासाठी, जास्त फायदेशीर काय?
18
५५ वर्षांची आई आणि १७ मुले! हे कुटुंब कसं चालवतंय आपला उदरनिर्वाह?
19
जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पाऊस; भारताने पुन्हा दाखवली माणुसकी, पाकिस्तानला दिला मोठा इशारा!
20
गोविंदाने पत्नी सुनीतासोबत साजरी केली गणेश चतुर्थी, घटस्फोटांच्या अफवांना लावला पूर्णविराम

अमावास्या, संक्रांतीमुळे शेतकऱ्यांची बाजार समितीकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पंचवटी : एकविसाव्या शतकात माणूस उत्तरोत्तर प्रगती करत असला तरी ग्रामीण भागात अजूनही अंधश्रद्धा पाळली जात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पंचवटी : एकविसाव्या शतकात माणूस उत्तरोत्तर प्रगती करत असला तरी ग्रामीण भागात अजूनही अंधश्रद्धा पाळली जात असून, त्याला बळीराजादेखील अपवाद ठरलेला नाही. नवीन वर्षातील सणाची सुरूवात करणाऱ्या मकर संक्रांतीनिमित्त येणाऱ्या अमावास्या, भोगी व करीदिनामुळे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. संक्रांतीच्या सणामुळे गेल्या दोन दिवसांपासून बाजार समितीत कांद्याची आवकच झाली नसल्याने बाजार आवार ओस पडले आहे.

बुधवारीही अमावास्येचा अंमल असल्याने बाजाराच्या दिवशीदेखील बाजार समितीत केवळ बटाटा व लसूण विक्रीसाठी आले होते. तर बहुतांशी कांदा आडतदार व व्यापाऱ्यांची शटर डाऊन असल्याचे दिसून आले. कांदा बाजारभाव टिकून असला तरी, गेल्या आठवड्यात अवकाळी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचा कांदा भिजल्याने कांद्याचे दर अजून वाढतील, अशी शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांनी कांदा विक्रीला आणला नाही, असे कारण सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र मंगळवारी आलेली अमावास्या त्यानंतर बुधवारच्या दिवशी संक्रात भोगी असल्याने वाहनचालकदेखील मालवाहतूक करण्यासाठी नकार देतात.

त्यामुळेच कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांदा विक्रीला आणला नाही. नववर्षातील पहिलीच अमावास्या त्यात संक्रांत व त्यानंतर कर आल्याने नवीन वर्षात आर्थिक व्यवहारावर संक्रांत येऊ नये तसेच व्यवहार करताना काही वाद झाले तर नववर्षाच्या प्रारंभीपासून कटकट मागे लागायला नको, या अंधश्रद्धेच्या भावनेतून मागील दोन दिवसांपासून शेतकऱ्यांनी बाजार समितीत कांदा विक्रीसाठी आणला नसल्याची माहिती काही व्यापाऱ्यांनी खासगीत दिली. गुरुवारी मकर संक्रांत व त्यानंतर शुक्रवारच्या दिवशी कर असल्याने अजून तरी दोन दिवस बाजार समितीतील कांदा बाजारात आवक होण्याची शक्यता कमीच असल्याचे बाजार समिती सुत्रांनी सांगितले.

इन्फो बॉक्स

अंधश्रद्धेचा बाजार

अमावास्येच्या दिवशी दर महिन्याला जिल्ह्यातील काही ठिकाणी असलेल्या बाजार समितीत कांदा व्यवहार पूर्णपणे बंद असतात. संक्रांतमुळे जिल्ह्यातील वणी येथील कांदा मार्केट शनिवारपर्यंत तर अमावास्येच्या दिवशी लासलगाव येथील कांदा मार्केट देखील बंद राहात असल्याचे बाजार समितीच्या सुत्रांनी सांगितले. अमावास्या तसेच मकर संक्रांत, भोगी, कर यादिवशी कांदा बाजारात कांद्याची आवक होत नसल्याने बळीराजादेखील अंधश्रद्धेच्या बाजारात गुंफला गेल्याचे म्हटले जात आहे.