शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

अमावास्या, संक्रांतीमुळे शेतकऱ्यांची बाजार समितीकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पंचवटी : एकविसाव्या शतकात माणूस उत्तरोत्तर प्रगती करत असला तरी ग्रामीण भागात अजूनही अंधश्रद्धा पाळली जात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पंचवटी : एकविसाव्या शतकात माणूस उत्तरोत्तर प्रगती करत असला तरी ग्रामीण भागात अजूनही अंधश्रद्धा पाळली जात असून, त्याला बळीराजादेखील अपवाद ठरलेला नाही. नवीन वर्षातील सणाची सुरूवात करणाऱ्या मकर संक्रांतीनिमित्त येणाऱ्या अमावास्या, भोगी व करीदिनामुळे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. संक्रांतीच्या सणामुळे गेल्या दोन दिवसांपासून बाजार समितीत कांद्याची आवकच झाली नसल्याने बाजार आवार ओस पडले आहे.

बुधवारीही अमावास्येचा अंमल असल्याने बाजाराच्या दिवशीदेखील बाजार समितीत केवळ बटाटा व लसूण विक्रीसाठी आले होते. तर बहुतांशी कांदा आडतदार व व्यापाऱ्यांची शटर डाऊन असल्याचे दिसून आले. कांदा बाजारभाव टिकून असला तरी, गेल्या आठवड्यात अवकाळी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचा कांदा भिजल्याने कांद्याचे दर अजून वाढतील, अशी शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांनी कांदा विक्रीला आणला नाही, असे कारण सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र मंगळवारी आलेली अमावास्या त्यानंतर बुधवारच्या दिवशी संक्रात भोगी असल्याने वाहनचालकदेखील मालवाहतूक करण्यासाठी नकार देतात.

त्यामुळेच कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांदा विक्रीला आणला नाही. नववर्षातील पहिलीच अमावास्या त्यात संक्रांत व त्यानंतर कर आल्याने नवीन वर्षात आर्थिक व्यवहारावर संक्रांत येऊ नये तसेच व्यवहार करताना काही वाद झाले तर नववर्षाच्या प्रारंभीपासून कटकट मागे लागायला नको, या अंधश्रद्धेच्या भावनेतून मागील दोन दिवसांपासून शेतकऱ्यांनी बाजार समितीत कांदा विक्रीसाठी आणला नसल्याची माहिती काही व्यापाऱ्यांनी खासगीत दिली. गुरुवारी मकर संक्रांत व त्यानंतर शुक्रवारच्या दिवशी कर असल्याने अजून तरी दोन दिवस बाजार समितीतील कांदा बाजारात आवक होण्याची शक्यता कमीच असल्याचे बाजार समिती सुत्रांनी सांगितले.

इन्फो बॉक्स

अंधश्रद्धेचा बाजार

अमावास्येच्या दिवशी दर महिन्याला जिल्ह्यातील काही ठिकाणी असलेल्या बाजार समितीत कांदा व्यवहार पूर्णपणे बंद असतात. संक्रांतमुळे जिल्ह्यातील वणी येथील कांदा मार्केट शनिवारपर्यंत तर अमावास्येच्या दिवशी लासलगाव येथील कांदा मार्केट देखील बंद राहात असल्याचे बाजार समितीच्या सुत्रांनी सांगितले. अमावास्या तसेच मकर संक्रांत, भोगी, कर यादिवशी कांदा बाजारात कांद्याची आवक होत नसल्याने बळीराजादेखील अंधश्रद्धेच्या बाजारात गुंफला गेल्याचे म्हटले जात आहे.