शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात अन्यत्र जाणाऱ्या चाकरमान्यांंची कोंडी

By admin | Updated: August 25, 2015 23:37 IST

कुंभमेळा : रस्ते बंद असल्याने नोकरीच्या ठिकाणी कसे जाणार?

नाशिक : सिंंहस्थ कुंभमेळ्यातील पर्वणी एकच दिवस असताना पोलीस यंत्रणेने मात्र तीन दिवस रस्ते करकचून बंद करण्याच्या पोलीस यंत्रणेचा फटका नाशिक आणि चाकरमान्यांना मोठ्या प्रमाणात बसणार आहे. नाशिक शहरात सार्वजनिक सुटी सक्तीने दिली जात असली तरी ग्रामीण भागातील शासकीय आणि खासगी आस्थापना सुरूच राहणार आहे. त्यामुळे अशावेळी नोकरीच्या ठिकाणी कसे जायचे असा प्रश्न चाकरमान्यांना पडला आहे. पोलिसांच्या अतिदक्षता नियोजनामुळे कर्मचाऱ्यांना दांडी मारावी लागेल किंवा अनेकांना तर एक दिवसाच्या पगारावर पाणी सोडावे लागणार आहे.येत्या २९ तारखेला पहिली पर्वणी असून, दुसरी पर्वणी १३ तारखेला आहे. या दोन्ही पर्वण्या एकाच दिवशी असून, अन्य दोन पर्वण्या मात्र स्वतंत्र आहे. तीन दिवसांच्या पर्वण्यांसाठी पोलिसांनी नाशिक शहरात कुंभमेळ्या व्यतिरिक्त काहीच घडणार नाही अशी तजबीज करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे पर्वणीच्या आदल्या दिवसांपासूनच रस्ते बंद राहणार असून, पर्वणीच्या दुसऱ्या दिवशी ते खुले केले जाणार आहे. त्यामुळे नाशिक शहरातील विशेषत: मध्यवर्ती भागातील व्यवहार बंदच राहण्याची शक्यता आहे. तथापि, अनेक चाकरमाने मुंबईला रेल्वेने अप-डाउन करतात. तसेच दिंडोरी, ओझर, मालेगाव, मनमाड, लासलगाव, निफाड, सिन्नर अशा अनेक भागांत घर आंगण असे अंतर असल्याने तेथे देखील रोज कामासाठी गेल्यानंतर कर्मचारी पुन्हा नाशिकला येतात. इतकेच नव्हे या भागातील अनेक सरकारी, बिनसरकारी कर्मचारी हे रोजच नाशिकमध्ये येतात आणि परत जातात. आता पर्वणीमुळे या कर्मचाऱ्यांना सुट्टी मिळू शकेल; परंतु नाशिक शहराबाहेर त्र्यंबकेश्वर वगळता अन्यत्र कोठेही सुट्टी नाही. परिणामी इगतपुरीला कारखान्यात काम करणारे असो, ओझर, निफाडमधील शैक्षणिक संस्था अथवा मालेगाव, मनमाडमधील शासकीय कार्यालये कर्मचाऱ्यांना सुट्टीच नाही, तर ते कामावर कसे येणार? असा प्रश्न निर्र्माण झाला आहे. बरेच अनेक खासगी आणि शासकीय आस्थापनांनी नाशिकमधून दोन चार कर्मचारी येऊ शकत नाही म्हणून सुट्टी दिलेली नाही, तर कामकाजच चालूच राहणार असल्याने त्यांची मोठी अडचण झाली आहे. मंत्रालयात जाणाऱ्या चाकरमान्यांची अशीच अडचण झाली आहे. नाशिकच्या कानाकोपऱ्यातून रेल्वेस्थानक गाठणे शक्य नसल्याने कामावर कसे जायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा सर्व कर्मचाऱ्यांना एकतर दांडी मारून एक दिवसाच्या वेतनावर पाणी सोडावे लागणार आहे. (प्रतिनिधी)