शहरं
Join us  
Trending Stories
1
ही मराठी माणसांच्या नाही तर ठाकरे बंधूंच्या अस्तित्वाची लढाई; एकनाथ शिंदेंचा घणाघात
2
"मला काहून पाडलं? मह्या तोंडाला फेस येतो... माणूस पाहायचा नाही, फक्त...!'; दानवेंचं विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले?
3
“‘टॉयलेट मॅनर्स’ आहेत, त्यांनीच स्लीपर वंदे भारत ट्रेनने प्रवास करावा”; रेल्वे अधिकाऱ्यांची पोस्ट चर्चेत
4
अपहरण झालेल्या चिमुकलीच्या सुटकेसाठी राप्ती सागर एक्स्प्रेस नॉन-स्टॉप २६० किमी धावली!
5
"मुंबईमध्ये 'पाडू' मशीन सरसकट वापरले जाणार नाही, तर..."; राज ठाकरेंच्या संतापानंतर आयुक्त गगराणींचा खुलासा
6
उणे ४०% गुण घेणाऱ्यांनाही मिळणार अ‍ॅडमिशन; NEET PG कट-ऑफ कमी करण्याच्या निर्णयाने वाद
7
बिटकॉइनचा धमाका! ९६ हजार डॉलर्सचा टप्पा ओलांडून २ महिन्यांच्या उच्चांकावर; पुढे काय होईल?
8
टॅरिफचा हत्यार म्हणून वापर करणारे ट्रम्प आपल्याच देशात अडकले, पॉवेल यांच्यावरील तपास पडला भारी
9
Instagram : रील स्टार व्हायचंय? मग चुकूनही दुर्लक्षित करू नका या ५ सेटिंग्ज; व्ह्यूजचा पडेल पाऊस!
10
ICC ODI Rankings: विराट कोहली पुन्हा बनला वनडेचा किंग! हिटमॅन रोहितला बसला फटका
11
मुंबईची निवडणूक निर्णायक ठरणार, मराठी अस्मितेसह या ५ मुद्यांचं भवितव्य निश्चित करणार
12
स्पेनला १५० वर्षांनंतर मिळणार पहिली महाराणी! कोण आहे राजकुमारी लिओनोर? जिच्यासाठी बदलला गेला देशाचा कायदा
13
WPL 2026: Mumbai Indiansच्या सामन्यात दिसली Anaya Bangarची 'ग्लॅमरस' झलक, फोटोंचीही चर्चा
14
कमाल! पहिल्या स्लीपर वंदे भारत ट्रेनचे टाइमटेबल आले; कधी सुटणार, किती थांबे असणार? पाहाच
15
ना OTP, ना PIN! फक्त फिंगरप्रिंट वापरुन बँक खातं होतंय रिकामं; 'आधार स्कॅम'पासून राहा सावध
16
संसदेसह सार्वजनिक ठिकाणांवरून सावरकरांचे फोटो हटवण्याची मागणी, सर्वोच्च न्यायालय याचिकेवर भडकलं; माजी अधिकाऱ्याला सुनावलं
17
मोठी बातमी! निवडणूक आयोग EVM मशीनला 'पाडू' नावाचे नवीन डिव्हाइस जोडणार; राज ठाकरेंच्या आरोपाने नव्या वादाला फोडणी
18
‘भाजपाने राज्यात विषवल्ली जन्माला घातली, मनपा निवडणुकीत ही विषवल्ली कापा’, काँग्रेसचं आवाहन
19
“राहुल गांधींची प्रभू श्रीरामांवर श्रद्धा, आता अयोध्येला जाणार”; काँग्रेस नेते म्हणाले…
20
IND vs NZ : 'लॉटरी' लागली तो बाकावरच! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हमध्ये 'या' खेळाडूची एन्ट्री
Daily Top 2Weekly Top 5

जलकुंभात पाणीच पोहचत नसल्याने  पांडवनगरी परिसरात पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 00:26 IST

पांडवनगरी, चड्डा पार्क आणि चेतनानगर परिसरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. जलकुंभात पाणीच पोहचत नसल्याने हे जलकुंभ म्हणजे जणूकाही शोभिवंत वस्तू बनत चालल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने याबाबत कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

इंदिरानगर : पांडवनगरी, चड्डा पार्क आणि चेतनानगर परिसरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. जलकुंभात पाणीच पोहचत नसल्याने हे जलकुंभ म्हणजे जणूकाही शोभिवंत वस्तू बनत चालल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने याबाबत कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.  पांडवनगरी ते कलानगरदरम्यान असलेल्या विविध कॉलनी आणि सोसायट्यांना सुमारे बारा वर्षांपासून अत्यंत कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नेहमीच कृत्रिम पाणीटंचाईस सामोरे जावे लागत होते. त्याची दखल घेऊन सुमारे दोन वर्षांपासून पांडवनगरी परिसरात नव्याने जलकुंभाचे बांधकाम सुरू होते. अखेर नवीन जलकुंभाचे बांधकाम पुन्हा झाल्यानंतर सुमारे एक महिन्यापूर्वी सदर जलकुंभातून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला होता. त्यामुळे नव्याचे नऊ दिवस पांडवनगरी ते कलानगर दरम्यान पाणीपुरवठा काही दिवस सुरळीत झाला. परंतु पुन्हा परिस्थिती ‘जैसे थे’ झाली कारण नवीन जलकुंभ असून, तो जलसाठ्याने भरला जात नसल्याने पाणीपुरवठा पुन्हा विस्कळीत झाला आहे. परिसरात अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने जेमतेम पिण्याचे पाणी सुद्धा होत नाही, तर वापरायचे काय? असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. लाखो रु पये खर्च करून नवीन बांधण्यात आलेला जलकुंभ जलसाठीने भरत नसल्याने मनपा आयुक्तांनी तातडीने लक्ष घालून पाणीपुरठा सुरळीत करावा, अशी मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे .आंदोलनानंतरही पाणीपुरवठा सुरळीत नाहीप्रभाग क्र मांक ३०च्या नगरसेवकांनी सुमारे दीडशे महिलांसमवेत बोंबाबोंब आंदोलन केले होते. तसेच प्रभाग सभेतही अनेक वेळा प्रशासनास धारेवर धरले तरीही पाणीपुरवठा सुरळीत होईना, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. नवदुर्गा मित्रमंडळाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष योगेश दिवे, पोपट डावरे, लक्ष्मण गोरे, संजय लोखंडे, कल्पना साळवे, विमल गावंडे यांसह परिसरातील नागरिक आयुक्तांना निवेदन देणार आहेत. गेल्या दहा दिवसांपासून या परिसरात पाणीटंचाई आहे. पाटील गार्डन, महारुद्र कॉलनी, अरुणोदय सोसायटी, कमोदनगर, शास्त्रीनगर, जिल्हा परिषद कॉलनी, देवेंद्र सोसायटी यांसह इंदिरानगर परिसरात पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका