शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
3
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
4
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
5
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
6
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
7
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
8
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
9
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
10
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
11
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
12
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
13
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
14
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
15
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
16
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
17
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
18
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
19
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
20
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...

जलकुंभात पाणीच पोहचत नसल्याने  पांडवनगरी परिसरात पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 00:26 IST

पांडवनगरी, चड्डा पार्क आणि चेतनानगर परिसरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. जलकुंभात पाणीच पोहचत नसल्याने हे जलकुंभ म्हणजे जणूकाही शोभिवंत वस्तू बनत चालल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने याबाबत कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

इंदिरानगर : पांडवनगरी, चड्डा पार्क आणि चेतनानगर परिसरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. जलकुंभात पाणीच पोहचत नसल्याने हे जलकुंभ म्हणजे जणूकाही शोभिवंत वस्तू बनत चालल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने याबाबत कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.  पांडवनगरी ते कलानगरदरम्यान असलेल्या विविध कॉलनी आणि सोसायट्यांना सुमारे बारा वर्षांपासून अत्यंत कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नेहमीच कृत्रिम पाणीटंचाईस सामोरे जावे लागत होते. त्याची दखल घेऊन सुमारे दोन वर्षांपासून पांडवनगरी परिसरात नव्याने जलकुंभाचे बांधकाम सुरू होते. अखेर नवीन जलकुंभाचे बांधकाम पुन्हा झाल्यानंतर सुमारे एक महिन्यापूर्वी सदर जलकुंभातून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला होता. त्यामुळे नव्याचे नऊ दिवस पांडवनगरी ते कलानगर दरम्यान पाणीपुरवठा काही दिवस सुरळीत झाला. परंतु पुन्हा परिस्थिती ‘जैसे थे’ झाली कारण नवीन जलकुंभ असून, तो जलसाठ्याने भरला जात नसल्याने पाणीपुरवठा पुन्हा विस्कळीत झाला आहे. परिसरात अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने जेमतेम पिण्याचे पाणी सुद्धा होत नाही, तर वापरायचे काय? असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. लाखो रु पये खर्च करून नवीन बांधण्यात आलेला जलकुंभ जलसाठीने भरत नसल्याने मनपा आयुक्तांनी तातडीने लक्ष घालून पाणीपुरठा सुरळीत करावा, अशी मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे .आंदोलनानंतरही पाणीपुरवठा सुरळीत नाहीप्रभाग क्र मांक ३०च्या नगरसेवकांनी सुमारे दीडशे महिलांसमवेत बोंबाबोंब आंदोलन केले होते. तसेच प्रभाग सभेतही अनेक वेळा प्रशासनास धारेवर धरले तरीही पाणीपुरवठा सुरळीत होईना, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. नवदुर्गा मित्रमंडळाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष योगेश दिवे, पोपट डावरे, लक्ष्मण गोरे, संजय लोखंडे, कल्पना साळवे, विमल गावंडे यांसह परिसरातील नागरिक आयुक्तांना निवेदन देणार आहेत. गेल्या दहा दिवसांपासून या परिसरात पाणीटंचाई आहे. पाटील गार्डन, महारुद्र कॉलनी, अरुणोदय सोसायटी, कमोदनगर, शास्त्रीनगर, जिल्हा परिषद कॉलनी, देवेंद्र सोसायटी यांसह इंदिरानगर परिसरात पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका