शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

जलकुंभात पाणीच पोहचत नसल्याने  पांडवनगरी परिसरात पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 00:26 IST

पांडवनगरी, चड्डा पार्क आणि चेतनानगर परिसरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. जलकुंभात पाणीच पोहचत नसल्याने हे जलकुंभ म्हणजे जणूकाही शोभिवंत वस्तू बनत चालल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने याबाबत कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

इंदिरानगर : पांडवनगरी, चड्डा पार्क आणि चेतनानगर परिसरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. जलकुंभात पाणीच पोहचत नसल्याने हे जलकुंभ म्हणजे जणूकाही शोभिवंत वस्तू बनत चालल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने याबाबत कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.  पांडवनगरी ते कलानगरदरम्यान असलेल्या विविध कॉलनी आणि सोसायट्यांना सुमारे बारा वर्षांपासून अत्यंत कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नेहमीच कृत्रिम पाणीटंचाईस सामोरे जावे लागत होते. त्याची दखल घेऊन सुमारे दोन वर्षांपासून पांडवनगरी परिसरात नव्याने जलकुंभाचे बांधकाम सुरू होते. अखेर नवीन जलकुंभाचे बांधकाम पुन्हा झाल्यानंतर सुमारे एक महिन्यापूर्वी सदर जलकुंभातून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला होता. त्यामुळे नव्याचे नऊ दिवस पांडवनगरी ते कलानगर दरम्यान पाणीपुरवठा काही दिवस सुरळीत झाला. परंतु पुन्हा परिस्थिती ‘जैसे थे’ झाली कारण नवीन जलकुंभ असून, तो जलसाठ्याने भरला जात नसल्याने पाणीपुरवठा पुन्हा विस्कळीत झाला आहे. परिसरात अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने जेमतेम पिण्याचे पाणी सुद्धा होत नाही, तर वापरायचे काय? असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. लाखो रु पये खर्च करून नवीन बांधण्यात आलेला जलकुंभ जलसाठीने भरत नसल्याने मनपा आयुक्तांनी तातडीने लक्ष घालून पाणीपुरठा सुरळीत करावा, अशी मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे .आंदोलनानंतरही पाणीपुरवठा सुरळीत नाहीप्रभाग क्र मांक ३०च्या नगरसेवकांनी सुमारे दीडशे महिलांसमवेत बोंबाबोंब आंदोलन केले होते. तसेच प्रभाग सभेतही अनेक वेळा प्रशासनास धारेवर धरले तरीही पाणीपुरवठा सुरळीत होईना, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. नवदुर्गा मित्रमंडळाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष योगेश दिवे, पोपट डावरे, लक्ष्मण गोरे, संजय लोखंडे, कल्पना साळवे, विमल गावंडे यांसह परिसरातील नागरिक आयुक्तांना निवेदन देणार आहेत. गेल्या दहा दिवसांपासून या परिसरात पाणीटंचाई आहे. पाटील गार्डन, महारुद्र कॉलनी, अरुणोदय सोसायटी, कमोदनगर, शास्त्रीनगर, जिल्हा परिषद कॉलनी, देवेंद्र सोसायटी यांसह इंदिरानगर परिसरात पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका