शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
2
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
3
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
4
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
5
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
6
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
7
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
8
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
9
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
10
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
11
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
12
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
13
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
14
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
15
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
16
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश
17
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
19
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
20
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती

रोपेच नसल्याने शेतकरी देताहेत कांदा बियाणे पेरणीला पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 17:49 IST

राजापूर : अवेळी झालेल्या जोरदार मुसळधार पावसाने परिसरातील शेतकऱ्यांकडे कांदा रोपेच शिल्लक राहिले नाही. परिणामी शेतकरी वर्गाने वेगवेगळे प्रयोग राबवून कांदा पेरणीला पसंती दिली आहे.

ठळक मुद्देलाल कांदा लागवडीस उशिर होत आहे.

राजापूर : अवेळी झालेल्या जोरदार मुसळधार पावसाने परिसरातील शेतकऱ्यांकडे कांदा रोपेच शिल्लक राहिले नाही. परिणामी शेतकरी वर्गाने वेगवेगळे प्रयोग राबवून कांदा पेरणीला पसंती दिली आहे.यावर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लाल कांदा लागवडीसाठी क्षेत्र राखीव ठेवले, पण गेली दोन महिनाभरापासून उष्ण, दमट वातावरण तर कधी मुसळधार पाऊस, यामुळे लाल कांदा रोपे झोडपली गेली. रोंपावर बुरशीजन्य रोग पडला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकºयांचे कांदा रोपे जमिनीतच सडली. अनेक शेतकºयांनी रोपच शिल्लक न राहिल्याने नांगर घातला तर काही शेतकºयांनी त्याच जमिनीत पुन्हा बियाणे पेरणी केली. साधारणत: सप्टेंबर, आॅक्टोंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात लाल कांदा लागवड होत असते. पण या वर्षी मात्र शेतकºयांना कांदा लागवडीसाठी रोपे तयार होत नसल्याने लाल कांदा लागवडीस उशिर होत आहे. मोठ्या प्रमाणात शेतकºयांनी खर्च करु नही रोपे नष्ट झाल्याने शेतकºयांनी यावर उपाय शोधत ट्रॅक्टरने पेरणी यंत्राच्या सहाय्याने कांदा बियाणे पेरणीवर भर दिला आहे.कमी वेळात, कमी खर्चात आणि कमी मशागतीत कांदा लागवड होत आहे. हजारो रु पये खर्चाची बचत होऊन वेळ वाचत आहे. सारे पाडणे, वाफे बांधणे हा खर्च वाचून थेट कांदा लागवड होत असल्याने परिसरात शेतकºयांनी यंत्राच्या सहाय्याने कांदा बियाणे पेरणी करण्याला पंसती देत आहे.मागील वर्षी आम्ही चार एकर शेतात लाल व उन्हाळ कांद्याची ट्रॅक्टरने कांदा पेरणी केली होती व कांद्याचे उत्पादन चांगले निघाले होते. यावर्षी कांदा पेरणी केली. यामुळे वेळ व पैशाची बचत झाली आहे.- काशिनाथ चव्हाण, शेतकरी, राजापूर. 

टॅग्स :agricultureशेतीonionकांदा