शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
3
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
4
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
5
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
6
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
7
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
8
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
9
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
10
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
11
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
12
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
13
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
14
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
15
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
16
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
17
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
20
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?

मनपाच्या अहवालाअभावी रखडले गावठाण क्लस्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 00:26 IST

शहरातील गावठाणांचा पुनर्विकास क्लस्टरच्या माध्यमातून करण्यासाठी शासनाने प्रस्ताव तयार केला असून, त्यासाठी महापालिकेकडून वाढीव चटई क्षेत्र दिल्यास होणाऱ्या आघातांचा, परिणामांचा अहवाल सादर करण्यास गेल्या वर्षी सांगितले होते.

नाशिक : शहरातील गावठाणांचा पुनर्विकास क्लस्टरच्या माध्यमातून करण्यासाठी शासनाने प्रस्ताव तयार केला असून, त्यासाठी महापालिकेकडून वाढीव चटई क्षेत्र दिल्यास होणाऱ्या आघातांचा, परिणामांचा अहवाल सादर करण्यास गेल्या वर्षी सांगितले होते. मात्र वर्ष सरले तरी असा कोणताही अहवाल अद्याप तयारच झालेला नाही. गेल्या वर्षी पावसाळ्यात जुन्या नाशिकमध्ये झालेल्या दुर्घटनेनंतर या विषयाने उचल खाल्ली होती, परंतु आता या पावसाळ्याच्या तोंडावरच चर्चा सुरू झाली असून, नगररचना विभागाने महासभेत विषय मांडला आहे.विशेष म्हणजे गेल्यावर्षी जुन्या नाशिकमध्ये वाडा कोसळून दोन जण ठार झाल्यानंतर प्रशासनाने निविदा मागवल्या, परंतु त्याला प्रतिसाद न मिळाल्याने पुन्हा कोणतीच कार्यवाही केलेली नाही. आता महासभेवर सल्लागार संस्था नियुक्त करण्यासाठी प्रस्ताव मांडण्यात आल्याने उदासीनतेविषयी तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.नाशिक महापालिकेत २३ खेडी गाव समाविष्ट असून, गावठाण किंवा गाभा क्षेत्र सर्वच ठिकाणी आहेत. दाट वस्तीसाठीचे नियमदेखील वेगळे आहेत. अरुंद रस्ते, उंच सखल भागामुळे पाणी, गटारींच्या असुविधा अशा अनेक अडचणींमुळे त्यांचा पुनर्विकास करताना जादा चटई क्षेत्र देण्याची मागणी होत आहे. मात्र, केवळ ज्यादा चटई क्षेत्र देऊन हा विषय सुटणार नाही तर क्लस्टर म्हणजेच समुच्चय विकास करण्यासाठी राज्य शासनाने नियोजन केले आहे. तथापि, गावठाणासारख्या दाट वस्तीच्या भागात चटई क्षेत्र वाढवून दिले तर त्याचे अनुकूल किंवा प्रतिकूल कोणते परिणाम होऊ शकतील याबाबत आघात मूल्यमापन अहवाल (इंपॅक्ट असेसमेंट रिपोर्ट) देण्याचे आदेश शासनाने दिले होते. त्यानुसार महापालिकेने निविदा मागवल्या, त्यावर चार ते पाच संस्थांनी सुरुवातीला स्वारस्य दाखवले नंतर ते मात्र कोणीच उत्सुकता दर्शविली नाही. महापालिकेच्या नगररचना अधिकाऱ्यांच्या शह- काटशहाच्या खेळीत गावठाण भागातील जिव्हाळ्याच्या विषयाकडे लक्षच दिले गेले नाही आणि आता येत्या महासभेवर यासंदर्भातील प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.महापालिकेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा विषय टाळला जात असताना लोकप्रतिनिधीदेखील मौन बाळगून आहेत. त्यामुळे आता पुन्हा पावसाळ्यात संकटाला तोंड द्यायचे काय? असा प्रश्न जुन्या नाशकातील नागरिकांना पडला आहे.सिंगापूर नाही की क्लस्टर नाहीमहापालिकेत लोकप्रतिनिधींची राजवट लागू झाल्यानंतर सर्वप्रथम गावठाणाचे सिंगापूर करण्याची घोषणा करण्यात आली होती. परंतु पुढे काहीच झाले नाही. माजी मुख्यमंत्री (कै.) विलासराव देशमुख यांनी चटई क्षेत्र वाढवून देण्यासाठी घोषणा केली होती. मात्र त्याचा पाठपुरावा झाला नाही. तेव्हापासून आत्तापर्यंत कोणत्याही प्रकारचा गावठाण विकास झालेला नाही.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक