शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

मोबदला न मिळाल्याने प्रकल्पग्रस्त शेतकरी आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 16:07 IST

कुशेगाव : बारा वर्षांपूर्वी साठवण तलावासाठी जमीन संपादित

ठळक मुद्देशासनाकडून टोलवाटोलवी करून कोट्यवधी रु पये भरपाई मिळत नसल्याने आक्र मक शेतक-यांनी सहाय्यक जिल्हा जलसंधारण अधिकारी यांची भेट घेऊन कैफियत मांडली.

घोटी : कुशेगाव ता. इगतपुरी येथील साठवण तलावासाठी १२ वर्षांपूर्वी संपादित झालेल्या जमिनीची भरपाई देण्यास शासनाकडून टाळाटाळ होत आहे. शेकडो वेळा प्रयत्न करूनही संपादित झालेल्या ४० ते ४५ एकर जमिनीची अडीच कोटी रु पयांची भरपाई मिळत नसल्याने बाधित आदिवासी शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. मृद आणि जलसंधारण विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय आणि मंत्रालयाच्या खेटा मारून वैतागलेल्या शेतकऱ्यांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे.इगतपुरी तालुक्यातील कुशेगाव येथे साठवण तलावासाठी शासनाने १२ वर्षांपूर्वी ४० ते ४५ एकर जमिनीचे संपादन केले होते. यावेळी शेतकऱ्यांना तातडीने योग्य ती भरपाई देण्याबाबत सांगण्यात आले होते. यावर्षीही या तलावांची जलयुक्त शिवार योजनेमधुन दुरु स्ती करण्यात येत आहे. ह्या भूसंपादनामुळे येथील आदिवासी शेतकरी भूमिहीन झाले असून त्यांना उपजीविकेसाठी रानोमाळ भटकावे लागत आहे. ह्या सर्व जमिनीची एकंदरीत भरपाई अडीच कोटी रु पयांच्या आसपास आहे. ही भरपाई मिळण्यासाठी शेतक-यांनी जिल्हाधिकारी कार्यालय ते मंत्रालयापर्यंत शेकडो वेळा प्रयत्न केले. ह्याबाबतची फाईल गायब असल्याचा शेतक-यांना दाट संशय आहे. त्यामुळे प्रत्येक कार्यालयात त्यांना लाल फितीचा अनुभव येत आहे. वारंवार पाठपुरावा करूनही अद्याप भरपाई देण्याबाबत अंतिम निर्णयाची प्रतीक्षा आहे. शासनाकडून टोलवाटोलवी करून कोट्यवधी रु पये भरपाई मिळत नसल्याने आक्र मक शेतक-यांनी सहाय्यक जिल्हा जलसंधारण अधिकारी यांची भेट घेऊन कैफियत मांडली. त्यांनी याबाबत भूसंपादन खात्याकडे शेतक-यांना पाठवून दिले. तिथेही शेतक-यांना दाद मिळू शकली नाही. परिणामी वैतागलेल्या शेतकºयांनी आता आक्र मक पवित्रा घेतला आहे.

टॅग्स :Nashikनाशिक